शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक मलेरिया दिवस: पूर्व विदर्भात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 10:04 IST

आजही पूर्व विदर्भात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येतात. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत ५,८४४ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्दे५,८४४ रुग्णांची नोंदएकट्या गडचिरोलीत ४,७६१ रुग्ण‘अ‍ॅनोफेलिस’ डास चावल्यामुळे होतो प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मलेरिया हा आजार दरवर्षी राज्यात शेकडोंचा जीव घेतल्याशिवाय राहत नव्हता; शिवाय मोठ्या संख्येत रुग्णांचे निदान व्हायचे. परंतु नागपूर आरोग्य विभागाने तत्काळ निदान, औषधोपचार व जनजागृतीवर विशेष भर दिल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णाच्या संख्येत २,६१४ ने घट आली आहे. असे असले तरी राज्याचा विचार केल्यास आजही पूर्व विदर्भात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येतात. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत ५,८४४ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. यात एकट्या गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाच्या ४,७६१ रुग्णांची नोंद आहे.मलेरियाची लागण होणाऱ्या जगातील प्रमुख देशांमध्ये भारताचाही नंबर लागतो. ‘अ‍ॅनोफेलिस’ नावाचा डास चावल्यामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. वाढती लोकसंख्या आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे मलेरिया पसरतो. जगात दरवर्षी ३० ते ५० कोटी नागरिकांना मलेरिया होतो. त्यापैकी हजारो नागरिक मृत्यूच्या खाईत ढकलले जातात. जगात प्रति ३० सेकंदाला एक बालक मलेरियाला बळी पडतो. उपसंचालक नागपूर आरोग्य विभागांतर्गत येणाºया नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये आजही सर्वाधिक रुग्ण दिसून येतात. यात गडचिरोलीसह चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात आजही सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे.

गडचिरोलीत २०१६ मध्ये होते ३२ हजार रुग्णगडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे २०१४-१५ मध्ये २४ हजार ४६९ रुग्ण होते. २०१५-१६ मध्ये यात वाढ होऊन रुग्णांची संख्या ३२ हजार १३६ वर पोहचली. मात्र हिवताप विभागाने या भागात विशेष उपक्रम हाती घेतल्याने २०१६-१७ मध्ये हीच संख्या ६ हजार ८३७ वर आली. तर २०१७-१८ मध्ये हा आकडा ४,७६१वर पोहचला. रुग्ण कमी होत असले तरी राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत हा आकडा सर्वात मोठा आहे. विशेष म्हणजे, २०१५-१६ मध्ये १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद होती ती आता २०१६-१७ मध्ये चारवर आली आहे. गेल्या वर्षीही चारच मृत्यूची नोंद आहे.

गडचिरोलीत हिवताप अधिकारी वाढण्याची गरजगडचिरोली जिल्ह्याचा परिसर मोठा आहे. परंतु येथे एकच जिल्हा हिवताप अधिकारी आहे. यामुळे त्यांच्याकडून संपूर्ण जिल्ह्याचे नियोजन करणे कठीण जात असल्याचे चित्र आहे. तज्ज्ञानुसार, येथे तीन जिल्हा हिवताप अधिकारी दिले तर हे चित्र पालटू शकेल व रुग्णांची संख्या कमी होऊ शकेल.तीन वर्षांत रुग्णांची संख्या झाली कमीगडचिरोलीत २०१६ मध्ये ३२ हजार रुग्ण आढळून आले होते. येथील मलेरियावर नियंत्रण मिळविण्यासाठी वार्षिक जंतू निर्देशांकानुसार गावांचे वर्गीकरण केले. यातील प्रभावित गावांमध्ये जास्तीत जास्त सर्वेक्षण करून उपाययोजना करण्यात आल्या. सोबतच प्रयोगशाळेच्या विकेंद्रीकरणामुळे तत्काळ आजाराचे निदान करून रुग्णाला औषधोपचाराखाली आणले. यामुळे २०१७ मध्ये या जिल्ह्यातील मलेरियाच्या रुग्णांमध्ये ७७ टक्के अशी मोठी घट झाली आहे. तर यावर्षी ३० टक्क्यांनी घट झाली आहे.डॉ. मिलिंद गणवीरसहायक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) नागपूर

टॅग्स :Healthआरोग्य