शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

जागतिक मूलनिवासी दिन; देशातील ७५ आदिम जमातींचे अस्तित्व संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 11:16 IST

Nagpur News केवळ भारतातीलच ७५ प्रकारच्या आदिम जमाती नामशेष हाेण्याच्या मार्गावर आहेत. मानववंशशास्त्र विभागाचे हे सर्वेक्षण माेठ्या धाेक्याकडे संकेत देणारे आहे.

ठळक मुद्देमानवी उत्पत्तीचा इतिहास पुसला जाण्याची भीती सरकारी उपाययाेजना कुचकामी

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मानवी उत्पत्तीचे असंख्य रहस्य जगभरातील संशाेधकांसाठी कायमच कुतूहलाचा विषय आहेत. जगभरातील आदिम जमातींचा इतिहास हा हजाराे वर्षांपूर्वीच्या मानवी अस्तित्वाशी जुळला असण्यावर संशाेधक ठाम आहेत. मात्र, मानवी उत्क्रांतीचे रहस्य मांडणाऱ्या या आदिम जमातींचे अस्तित्वच संकटात सापडले आहे. केवळ भारतातीलच ७५ प्रकारच्या आदिम जमाती नामशेष हाेण्याच्या मार्गावर आहेत. मानववंशशास्त्र विभागाचे हे सर्वेक्षण माेठ्या धाेक्याकडे संकेत देणारे आहे.

भारतीय आदिम जमातींच्या अस्तित्वाला अनेक कंगाेरे आहेत. अनेक संशाेधने सुरू आहेत, पण प्रश्न या आदिम जमातींच्या अस्तित्वाचा आहे. मानववंशशास्त्र विभागाने दशकभरात केलेल्या सर्वेक्षणानुसार ७५ आदिम जमातींचे अस्तित्व धाेक्यात आले आहे. यातील बहुतेक जमातींची लाेकसंख्या १००० च्याही खाली, तर काही १००च्याही खाली आहे. त्यांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने २००८ पासून कार्यक्रम राबविला आहे. मात्र हे प्रयत्नही कुचकामी ठरताना दिसत आहेत.

 

काही धाेकाग्रस्त प्रजाती व त्यांची संख्या

- महाराष्ट्रातील कतकरी, काेलाम, माडिया गाेंड.

- मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील अबुज माडिया, बैगा, भारिया, हिलकाेरबा, कमाड, सहारिया, बिर्हाेर.

- बिहार व झारखंडच्या असूर, बिर्जिया, हिलखडिया, काेवांस, मालपहाडिया, साैदा पहाडिया, सावर.

- ७५ पैकी १२ जमातींची संख्या ५० हजाराच्यावर हाेती. इतर जमाती १०००च्या खाली आहेत.

- अंदमानमधील ग्रेट अंदामानिज जमातीची लाेकसंख्या २००१च्या गणनेनुसार ४३ व सेंटिलेट्स जमातीची संख्या केवळ ३९ हाेती.

- जरवास २४१ तर ओंग्स जमातीची संख्या ९६ आहे. सहारिया जमातीची ४.५० लाख लाेकसंख्या सर्वाधिक आहे.

 

या जमातींचा मानवी उत्क्रांतीशी संबंध?

मानववंशशास्त्र विभागातर्फे आणखी एक महत्त्वाचे संशाेधन चालले आहे. लाखाे वर्षांपूर्वी मानवाचे आफ्रिकेतून भारतात व नंतर इतरत्र स्थलांतरण झाल्याचे गृहितक आहे. यानुसार भारतीय आदिम जमातींचा पहिल्या मानवाशी संबंध आहे का, यावर संशाेधन सुरू आहे. त्यासाठी सर्व ७५ जमातींचे डीएनए सॅम्पल गाेळा करण्यात आल्याची माहिती विभागाचे संशाेधन सहायक राजकिशाेर महताे यांनी दिली. या डीएनएमधून पूर्वीच्या १६ ते १७ वंशजांची व त्यापूर्वीचीही ओळख करणे शक्य हाेईल.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना