शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

जागतिक हायपरटेन्शन दिन; तुम्हालाही असू शकतो उच्च रक्तदाब 

By सुमेध वाघमार | Updated: May 17, 2023 08:00 IST

Nagpur News जवळपास २०७ दशलक्ष भारतीय उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. भारतीय प्रौढ लोकसंख्येमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण २९ टक्के आहे. प्रत्येक तिसरा प्रौढ भारतीय उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे.

सुमेध वाघमारे

नागपूर : ‘हायपरटेन्शन’ म्हणजे उच्चरक्तदाब हा ‘सायलेंट किलर’ आजार आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र हृदयविकाराचा झटका, किडनीचे आजार आणि ‘स्ट्रोक’ येण्याचा धोका असतो. जवळपास २०७ दशलक्ष भारतीय उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. भारतीय प्रौढ लोकसंख्येमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण २९ टक्के आहे. प्रत्येक तिसरा प्रौढ भारतीय उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे. त्यामुळे तुम्हालाही असू शकतो रक्तदाब, तपासणी केली का, असे थेट आवाहन शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांनी केले आहे.

-केवळ एक चतुर्थांश लोकांना उच्च रक्तदाबाची माहिती -डॉ. हरकुट 

रक्तदाब म्हणजे शरीरातील धमन्यांच्या भिंतीवर रक्ताने निर्माण केलेला दाब होय. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट यांनी सांगितले की, भारतात प्रौढ लोकसंख्येमध्ये ग्रामीण भागात उच्च रक्तदाबाचे प्रमाण २५ टक्के आहे, तर शहरी भागात हे प्रमाण ३३ टक्के आहे. धक्कादायक म्हणजे, ग्रामीण भागात उच्च रक्तदाब झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. लोकसंख्येपैकी केवळ एक चतुर्थांश लोकांना उच्च रक्तदाबाची माहिती आहे. त्यापैकी २५ टक्केच रुग्ण उच्च रक्तदाबावर उपचार घेत आहेत. एका अंदाजानुसार १०० उच्च रक्तदाब रुग्णांपैकी योग्य औषधोपचाराने फक्त एकाचा रक्तदाब पुरेसा नियंत्रित राहतो. यामुळे उच्च रक्तदाबाबद्दल जागरूकता वाढविण्याची व रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपचार घेण्याची गरज आहे.

-उच्च रक्तदाब असलेल्या २० टक्के रुग्णांना मधुमेह - डॉ. बीडकर 

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमेय बीडकर यांनी सांगितले, उच्च रक्तदाब विकाराने ग्रस्त असलेल्या एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांना मधुमेह असतो, तसेच अन्य विकारही ग्रासण्याची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी उच्च रक्तदाबाचे वेळेतच निदान व त्यावर उपचार केले पाहिजेत. उच्च रक्तदाब विकाराने ग्रस्त ३० टक्के रुग्णांना वाढलेल्या ‘बॅड कोलेस्टेरॉल’चा विकार, २५ टक्के रुग्णांना ‘युरिक ॲसिड’ वाढलेले असल्याचा आणि ३५ ते ४० टक्के रुग्णांना लठ्ठपणाचा त्रास असतो. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवला, तर अन्य विकारांपासून दूर राहता येते. रक्तदाब विकार हा जीवनशैलीशी निगडित आहे. त्यामुळे ताणतणावमुक्त व संतुलित जीवनशैली स्वीकारने हा उपचाराचा पहिला टप्पा आहे. आहारातून फॅटयुक्त, तेलयुक्त, फास्ट व जंकफूड, अधिक मीठ असलेले पदार्थ टाळावेत. नियमित व्यायाम करावा. औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल हीच उपचारांची द्विसूत्री आहे.

- ‘ओपीडीत’ येणाऱ्या ५० टक्के रुग्णांना ‘हायपरटेन्शन’- डॉ. देशमुख 

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. पी.पी. देशमुख यांनी सांगितले की, विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) येणाऱ्या ३०० रुग्णांमध्ये जवळपास ५० टक्के रुग्णांमध्ये ‘हायपरटेन्शन’ आढळून येते. अयोग्य जीवनशैली, वाढता ताणतणाव, तंबाखू व दारूच्या व्यसनामुळे हा आजार आता ३० वर्षांच्या तरुणांमध्येही दिसून येत आहे. उपचारासाठी येणाऱ्या बहुसंख्य रुग्णांना, त्यांना उच्च रक्तदाब असल्याची माहिती नसते. जेव्हा उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम दिसू लागतात, तेव्हा ते डॉक्टरांकडे येतात. त्यामुळे वयाच्या विसीनंतर वर्षातून किमान एक वेळा आणि पस्तिशीनंतर दोन वेळा रक्तदाब तपासून घेतला पाहिजे.

-तातडीने रक्तदाब कधी मोजावा

* चालल्यावर चक्कर येत असल्यास

* चालल्यावर दम लागत असल्यास

* परिवारात रक्तदाबाचे रुग्ण असल्यास

* ताणतणावयुक्त जीवनशैली असल्यास

* लठ्ठपणा व मधुमेहाचा त्रास असल्यास

टॅग्स :Healthआरोग्य