शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक हायपरटेन्शन दिन; तुम्हालाही असू शकतो उच्च रक्तदाब 

By सुमेध वाघमार | Updated: May 17, 2023 08:00 IST

Nagpur News जवळपास २०७ दशलक्ष भारतीय उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. भारतीय प्रौढ लोकसंख्येमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण २९ टक्के आहे. प्रत्येक तिसरा प्रौढ भारतीय उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे.

सुमेध वाघमारे

नागपूर : ‘हायपरटेन्शन’ म्हणजे उच्चरक्तदाब हा ‘सायलेंट किलर’ आजार आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र हृदयविकाराचा झटका, किडनीचे आजार आणि ‘स्ट्रोक’ येण्याचा धोका असतो. जवळपास २०७ दशलक्ष भारतीय उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. भारतीय प्रौढ लोकसंख्येमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण २९ टक्के आहे. प्रत्येक तिसरा प्रौढ भारतीय उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे. त्यामुळे तुम्हालाही असू शकतो रक्तदाब, तपासणी केली का, असे थेट आवाहन शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांनी केले आहे.

-केवळ एक चतुर्थांश लोकांना उच्च रक्तदाबाची माहिती -डॉ. हरकुट 

रक्तदाब म्हणजे शरीरातील धमन्यांच्या भिंतीवर रक्ताने निर्माण केलेला दाब होय. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट यांनी सांगितले की, भारतात प्रौढ लोकसंख्येमध्ये ग्रामीण भागात उच्च रक्तदाबाचे प्रमाण २५ टक्के आहे, तर शहरी भागात हे प्रमाण ३३ टक्के आहे. धक्कादायक म्हणजे, ग्रामीण भागात उच्च रक्तदाब झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. लोकसंख्येपैकी केवळ एक चतुर्थांश लोकांना उच्च रक्तदाबाची माहिती आहे. त्यापैकी २५ टक्केच रुग्ण उच्च रक्तदाबावर उपचार घेत आहेत. एका अंदाजानुसार १०० उच्च रक्तदाब रुग्णांपैकी योग्य औषधोपचाराने फक्त एकाचा रक्तदाब पुरेसा नियंत्रित राहतो. यामुळे उच्च रक्तदाबाबद्दल जागरूकता वाढविण्याची व रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपचार घेण्याची गरज आहे.

-उच्च रक्तदाब असलेल्या २० टक्के रुग्णांना मधुमेह - डॉ. बीडकर 

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमेय बीडकर यांनी सांगितले, उच्च रक्तदाब विकाराने ग्रस्त असलेल्या एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांना मधुमेह असतो, तसेच अन्य विकारही ग्रासण्याची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी उच्च रक्तदाबाचे वेळेतच निदान व त्यावर उपचार केले पाहिजेत. उच्च रक्तदाब विकाराने ग्रस्त ३० टक्के रुग्णांना वाढलेल्या ‘बॅड कोलेस्टेरॉल’चा विकार, २५ टक्के रुग्णांना ‘युरिक ॲसिड’ वाढलेले असल्याचा आणि ३५ ते ४० टक्के रुग्णांना लठ्ठपणाचा त्रास असतो. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवला, तर अन्य विकारांपासून दूर राहता येते. रक्तदाब विकार हा जीवनशैलीशी निगडित आहे. त्यामुळे ताणतणावमुक्त व संतुलित जीवनशैली स्वीकारने हा उपचाराचा पहिला टप्पा आहे. आहारातून फॅटयुक्त, तेलयुक्त, फास्ट व जंकफूड, अधिक मीठ असलेले पदार्थ टाळावेत. नियमित व्यायाम करावा. औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल हीच उपचारांची द्विसूत्री आहे.

- ‘ओपीडीत’ येणाऱ्या ५० टक्के रुग्णांना ‘हायपरटेन्शन’- डॉ. देशमुख 

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. पी.पी. देशमुख यांनी सांगितले की, विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) येणाऱ्या ३०० रुग्णांमध्ये जवळपास ५० टक्के रुग्णांमध्ये ‘हायपरटेन्शन’ आढळून येते. अयोग्य जीवनशैली, वाढता ताणतणाव, तंबाखू व दारूच्या व्यसनामुळे हा आजार आता ३० वर्षांच्या तरुणांमध्येही दिसून येत आहे. उपचारासाठी येणाऱ्या बहुसंख्य रुग्णांना, त्यांना उच्च रक्तदाब असल्याची माहिती नसते. जेव्हा उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम दिसू लागतात, तेव्हा ते डॉक्टरांकडे येतात. त्यामुळे वयाच्या विसीनंतर वर्षातून किमान एक वेळा आणि पस्तिशीनंतर दोन वेळा रक्तदाब तपासून घेतला पाहिजे.

-तातडीने रक्तदाब कधी मोजावा

* चालल्यावर चक्कर येत असल्यास

* चालल्यावर दम लागत असल्यास

* परिवारात रक्तदाबाचे रुग्ण असल्यास

* ताणतणावयुक्त जीवनशैली असल्यास

* लठ्ठपणा व मधुमेहाचा त्रास असल्यास

टॅग्स :Healthआरोग्य