शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

जागतिक हृदयरोग दिन; शंभरातील ३० हृदयरोगाचे रुग्ण चाळिशीच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 07:00 IST

Nagpur News शंभरातील ३० रुग्ण हे चाळिशीच्या आत असल्याचे एका निरीक्षणातून पुढे आल्याचे हृदयरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देतरुणांमध्ये वाढतोय हृदयरोगहार्ट फेल्युअरच्या ५० टक्के रुग्णांचा पहिल्या पाच वर्षांत मृत्यू

सुमेध वाघमारे

नागपूर : अलीकडे वृद्धांपेक्षा तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला आहे. यामुळे, अकाली मृत्यूची प्रकरणे दिसून येत आहेत. अयोग्य जीवनशैली, तणाव, अनियंत्रित उच्चरक्तदाब व मधुमेहामुळे मागील १० वर्षांत हृदयरोगाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. धक्कादायक म्हणजे, यात शंभरातील ३० रुग्ण हे चाळिशीच्या आत असल्याचे एका निरीक्षणातून पुढे आल्याचे हृदयरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (World Heart Day; 30 out of 100 heart disease patients under 40)

भारतात जवळपास दर ३३ सेकंदांनी एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. शिवाय मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत; यामुळे जगभराच्या तुलनेत देशात हृदयविकाराची संख्या वाढत चालली आहे. शिवाय भारतीयांना नैसर्गिकरीत्याच हृदयविकाराची जोखीम आहे; कारण आपल्या रक्तवाहिन्यांचा आकार पाश्चिमात्यांच्या तुलनेत छोटा आहे. शिवाय हृदयाच्या एकाहून अधिक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याचे प्रमाणही अधिक आहे.

हृदयविकाराची जोखीम वेळेत ओळखा - डॉ. हरकुट

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट म्हणाले, शंभरामधून ७० टक्के रुग्ण हे चाळिशीच्या आतील असल्याने तरुणांमध्ये हृदयविकाराची जोखीम वाढली आहे. वेळीच निदान, योग्य उपचार, आहाराचे नियोजन व व्यसनाला दूर ठेवून नियमित व्यायाम केल्यास जिवाचा धोका निश्चितच टाळता येतो. विशेष म्हणजे, अधिक वेळ बसून राहिल्यास हृदयरोग होण्याचा धोका धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीएवढाच असतो. आजच्या जीवनशैलीत आठ तास बसावे लागते. त्यामुळे प्रत्येक खुर्चीवर ‘सीटिंग इज इंज्युरिअस टू हेल्थ...!’ लिहून ठेवणे गरजेचे आहे. सलग खुर्चीवर बसू नये, काही वेळाने अवकाश घ्यावा, मीटिंग्स उभ्याने घेता येतील का, याच्या शक्यता तपासल्या पाहिजेत.

- हार्ट फेल्युअरचा धोका वाढला - डॉ. तिवारी

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नितीन तिवारी म्हणाले, हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर हृदयाला इजा पोहोचल्यास किंवा हृदय कुमकवत झाल्यास अनेकदा ‘हार्ट फेल्युअर’चा धोका वाढतो. यात हृदय पुरेसे रक्त पंप करू शकत नाही. हृदयाचे पंपिंग चेंबर्स (व्हेंट्रिकल्स) कडक होऊ शकतात. काही लोकांमध्ये हृदयाचे स्नायू खराब आणि कमकुवत होऊ शकतात. एका अभ्यासानुसार, ‘हार्ट फेल्युअर’च्या ५० टक्के रुग्णांमध्ये पहिल्या पाच वर्षांत मृत्यू होतो आणि ९० टक्के रुग्णांचा पुढील १० वर्षांत मृत्यू होतो. ‘हार्ट फेल्युअर’ची लक्षणे दीर्घकाळापासून किंवा अचानक तीव्रतेने सुरू होऊ शकतात. यामुळे यात वेळीच निदान व उपचार महत्त्वाचा ठरतो.

हृदयविकारामुळे तरुणांमध्ये अकाली मृत्यू - डॉ. जगताप

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सत्यजित जगताप म्हणाले, अलीकडे वृद्धांपेक्षा तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला आहे. विशेषत: तरुणांमध्ये अकाली मृत्यूची प्रकरणे दिसून येत आहेत. यामागे अनेक तरुण अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खूप तणावातून जातात. तीव्र तणावामुळे रक्तातील ग्लुकोज, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब वाढू शकतो. सततच्या तणावामुळे तो दारू किंवा ड्रग्स किंवा धूम्रपानासारख्या व्यसनांचा बळी ठरतो. यामुळे वजन वाढते आणि धोकादेखील वाढतो.

वयाच्या २० वर्षांनंतर संपूर्ण वैद्यकीय तपासणी आवश्यक - डॉ. संचेती

हृदय शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती म्हणाले, धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह व व्यायामाच्या अभावामुळे कोरोनरी धमन्या कडक होतात. यामुळे अचानक ‘थ्रोम्बोसिस’चा धोका वाढतो. यामुळे वयाच्या २० वर्षांनंतर प्रत्येकाने दरवर्षी संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली पाहिजे. आपला रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉलच्या पातळीवर लक्ष ठेवायला हवे आहे. उंचीनुसार वजन ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. धूम्रपान आणि अल्कोहोल टाळायला हवे. नियमित व्यायाम व योग्य आहार घ्यायला हवा.

टॅग्स :Heart Diseaseहृदयरोग