शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

वर्ल्ड कॉपीराईट डे; प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांमध्ये सजगता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 09:31 IST

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अथक संशोधन व परिश्रमातून तयार झालेल्या बौद्धिक मालमत्तेची वा उत्पादनाची कुणी सहजासहजी नक्कल करू नये साठी ‘कॉपीराईट’ कायद्याचे संरक्षण देण्यात आले आहे. मात्र तंत्रज्ञानाचा उपयोग वाढत असतानाच ‘पायरसी’चे प्रमाणदेखील वाढत असल्याचे दिसून येत आहेत. जागोजागी ‘कॉपीराईट’ कायद्याचा भंग होताना दिसतो.यासंदर्भात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा व ...

ठळक मुद्देतीन वर्षांत ‘पायरसी’चे केवळ पाच गुन्हेराज्यात कशी थांबणार ‘पायरसी’ ?‘कॉपीराईट’चा उघडपणे भंग होत असल्याचे ‘आॅफलाईन’ चित्र

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अथक संशोधन व परिश्रमातून तयार झालेल्या बौद्धिक मालमत्तेची वा उत्पादनाची कुणी सहजासहजी नक्कल करू नये साठी ‘कॉपीराईट’ कायद्याचे संरक्षण देण्यात आले आहे. मात्र तंत्रज्ञानाचा उपयोग वाढत असतानाच ‘पायरसी’चे प्रमाणदेखील वाढत असल्याचे दिसून येत आहेत. जागोजागी ‘कॉपीराईट’ कायद्याचा भंग होताना दिसतो.यासंदर्भात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा व नागरिक या दोहोंमध्येदेखील उदासीनता दिसून येते. २०१४ ते २०१६ या ३ वर्षांच्या कालावधीत ‘पायरसी’च्या प्रकरणात समाविष्ट असलेल्या केवळ ५ जणांविरुद्धच गुन्हे दाखल करण्यात आले. या आकड्यांवर नजर टाकली असता राज्यात ‘कॉपीराईट’ कायद्याबाबत खरोखर जनजागृतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे.प्रदर्शनाअगोदरच ‘लिक’ होणारे चित्रपट, सहजपणे ‘आॅनलाईन’ उपलब्ध होणारी ‘पायरेटेड कॉपी’ इत्यादी प्रकारच्या ‘सायबर’ गुन्ह्यांची चित्रपट उद्योगाने धास्ती घेतली आहे. परंतु ‘पायरसी’ थांबविण्यासाठी अद्यापही फारशी पावले उचलण्यात आलेली नाही. शेकडो संकेतस्थळे आणि शहरांपासून ते ग्रामीण भागांत रस्त्यारस्त्यांवर हा उद्योग खुलेआमपणे सुरू असल्याचे दिसून येते. मात्र कारवाईचे प्रमाण नाममात्र असल्यामुळे कुणावरही वचक राहिलेला नाही.‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार २०१६ साली राज्यभरात ‘सायबर क्राईम’अंतर्गत एकूण २३८० गुन्हे दाखल झाले. यात ‘आयटी अ‍ॅक्ट’अंतर्गत झालेले ३५९ आणि ‘आयपीसी’अंतर्गत दाखल २००६ गुन्ह्यांचा समावेश आहे. यात ‘पायरसी’साठी झालेल्या गुन्ह्याांची संख्या केवळ ३ इतकी आहे. २०१४ ते २०१६ या वर्षांची आकडेवारी पाहिली तर ‘पायरसी’साठी केवळ ५ गुन्हे दाखल झाले.

शहरात बिनदिक्कतपणे ‘कॉपीराईट’चा भंगधरमपेठ, बर्डी, शनिमंदिर परिसर, गांधीबाग, सेंट्रल एव्हेन्यू, मानेवाडा, रेल्वे स्थानक, कॉटन मार्केट या परिसरांसोबत जवळपास सगळीकडेच मोठ्या प्रमाणात चित्रपट, संगीतासोबतच ‘कॉपीराईट’ कायद्याचा भंग करत संगणक सॉफ्टवेअरचीदेखील विक्री होताना दिसून येते. शिवाय अनेक इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्येदेखील बनावट सॉफ्टवेअरची विक्री सुरू असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर संगणकक्षेत्रातीलच काही व्यापाऱ्यांनी दिली.

तक्रारींचेच प्रमाण कमीमागील काही वर्षापासून ‘पायरसी’मुळे चित्रपट उद्योग तसेच ‘सॉफ्टवेअर्स कंपन्या’ हैराण आहे. मात्र ‘पायरसी’च्या प्रकरणात जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत पोलिसांकडून कारवाई करण्यात येत नाही. तक्रारकर्त्यांचे प्रमाण नगण्य असते व पोलीसदेखील स्वत:हून पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे ‘पायरसी’अंतर्गत दाखल होणाºया गुन्ह्यांचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ ‘पायरसी’चे प्रमाण कमी असते असे नाही, असे मत शहरातील ‘सायबर’ तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘कॉपीराईट’ म्हणजे काय?संगीत, नाट्य, कथा, कविता व तत्सम साहित्य व कलाकृती यांच्या संरक्षणासाठी बनविण्यात आलेला कायदा म्हणजे कॉपीराईट अ‍ॅक्ट. चित्रपटकार, नाटककार, साहित्यकार, सिनेमा, संगीतकार यांच्या कामाची नक्कल होऊ नये याकरता ‘कॉपीराईट’चा उपयोग होतो. नवीन काळात संगणक सॉफ्टवेअर्सचादेखील त्यात समावेश करण्यात आला आहे. ‘कॉपीराईट’ कायदा हा मर्यादित कालावधीसाठी असतो.‘ कॉपीराईट’साठी साहित्य किंवा तत्सम गोष्टी ‘ओरिजनल’ हव्यात ही महत्त्वाची अट आहे. आपल्या देशात संगणक सॉफ्टवेअर हे भारतीय कॉपीराईट अ‍ॅक्ट १९५७ अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे. विनापरवाना कुठल्याही सॉफ्टवेअरची विक्री करणे, कॉपी करणे, शेअर करणे या बाबींमुळेदेखील कॉपीराईट कायद्याचा भंग होतो.

टॅग्स :Crimeगुन्हा