शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

वर्ल्ड कॉपीराईट डे; प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांमध्ये सजगता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 09:31 IST

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अथक संशोधन व परिश्रमातून तयार झालेल्या बौद्धिक मालमत्तेची वा उत्पादनाची कुणी सहजासहजी नक्कल करू नये साठी ‘कॉपीराईट’ कायद्याचे संरक्षण देण्यात आले आहे. मात्र तंत्रज्ञानाचा उपयोग वाढत असतानाच ‘पायरसी’चे प्रमाणदेखील वाढत असल्याचे दिसून येत आहेत. जागोजागी ‘कॉपीराईट’ कायद्याचा भंग होताना दिसतो.यासंदर्भात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा व ...

ठळक मुद्देतीन वर्षांत ‘पायरसी’चे केवळ पाच गुन्हेराज्यात कशी थांबणार ‘पायरसी’ ?‘कॉपीराईट’चा उघडपणे भंग होत असल्याचे ‘आॅफलाईन’ चित्र

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अथक संशोधन व परिश्रमातून तयार झालेल्या बौद्धिक मालमत्तेची वा उत्पादनाची कुणी सहजासहजी नक्कल करू नये साठी ‘कॉपीराईट’ कायद्याचे संरक्षण देण्यात आले आहे. मात्र तंत्रज्ञानाचा उपयोग वाढत असतानाच ‘पायरसी’चे प्रमाणदेखील वाढत असल्याचे दिसून येत आहेत. जागोजागी ‘कॉपीराईट’ कायद्याचा भंग होताना दिसतो.यासंदर्भात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा व नागरिक या दोहोंमध्येदेखील उदासीनता दिसून येते. २०१४ ते २०१६ या ३ वर्षांच्या कालावधीत ‘पायरसी’च्या प्रकरणात समाविष्ट असलेल्या केवळ ५ जणांविरुद्धच गुन्हे दाखल करण्यात आले. या आकड्यांवर नजर टाकली असता राज्यात ‘कॉपीराईट’ कायद्याबाबत खरोखर जनजागृतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे.प्रदर्शनाअगोदरच ‘लिक’ होणारे चित्रपट, सहजपणे ‘आॅनलाईन’ उपलब्ध होणारी ‘पायरेटेड कॉपी’ इत्यादी प्रकारच्या ‘सायबर’ गुन्ह्यांची चित्रपट उद्योगाने धास्ती घेतली आहे. परंतु ‘पायरसी’ थांबविण्यासाठी अद्यापही फारशी पावले उचलण्यात आलेली नाही. शेकडो संकेतस्थळे आणि शहरांपासून ते ग्रामीण भागांत रस्त्यारस्त्यांवर हा उद्योग खुलेआमपणे सुरू असल्याचे दिसून येते. मात्र कारवाईचे प्रमाण नाममात्र असल्यामुळे कुणावरही वचक राहिलेला नाही.‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार २०१६ साली राज्यभरात ‘सायबर क्राईम’अंतर्गत एकूण २३८० गुन्हे दाखल झाले. यात ‘आयटी अ‍ॅक्ट’अंतर्गत झालेले ३५९ आणि ‘आयपीसी’अंतर्गत दाखल २००६ गुन्ह्यांचा समावेश आहे. यात ‘पायरसी’साठी झालेल्या गुन्ह्याांची संख्या केवळ ३ इतकी आहे. २०१४ ते २०१६ या वर्षांची आकडेवारी पाहिली तर ‘पायरसी’साठी केवळ ५ गुन्हे दाखल झाले.

शहरात बिनदिक्कतपणे ‘कॉपीराईट’चा भंगधरमपेठ, बर्डी, शनिमंदिर परिसर, गांधीबाग, सेंट्रल एव्हेन्यू, मानेवाडा, रेल्वे स्थानक, कॉटन मार्केट या परिसरांसोबत जवळपास सगळीकडेच मोठ्या प्रमाणात चित्रपट, संगीतासोबतच ‘कॉपीराईट’ कायद्याचा भंग करत संगणक सॉफ्टवेअरचीदेखील विक्री होताना दिसून येते. शिवाय अनेक इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्येदेखील बनावट सॉफ्टवेअरची विक्री सुरू असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर संगणकक्षेत्रातीलच काही व्यापाऱ्यांनी दिली.

तक्रारींचेच प्रमाण कमीमागील काही वर्षापासून ‘पायरसी’मुळे चित्रपट उद्योग तसेच ‘सॉफ्टवेअर्स कंपन्या’ हैराण आहे. मात्र ‘पायरसी’च्या प्रकरणात जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत पोलिसांकडून कारवाई करण्यात येत नाही. तक्रारकर्त्यांचे प्रमाण नगण्य असते व पोलीसदेखील स्वत:हून पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे ‘पायरसी’अंतर्गत दाखल होणाºया गुन्ह्यांचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ ‘पायरसी’चे प्रमाण कमी असते असे नाही, असे मत शहरातील ‘सायबर’ तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘कॉपीराईट’ म्हणजे काय?संगीत, नाट्य, कथा, कविता व तत्सम साहित्य व कलाकृती यांच्या संरक्षणासाठी बनविण्यात आलेला कायदा म्हणजे कॉपीराईट अ‍ॅक्ट. चित्रपटकार, नाटककार, साहित्यकार, सिनेमा, संगीतकार यांच्या कामाची नक्कल होऊ नये याकरता ‘कॉपीराईट’चा उपयोग होतो. नवीन काळात संगणक सॉफ्टवेअर्सचादेखील त्यात समावेश करण्यात आला आहे. ‘कॉपीराईट’ कायदा हा मर्यादित कालावधीसाठी असतो.‘ कॉपीराईट’साठी साहित्य किंवा तत्सम गोष्टी ‘ओरिजनल’ हव्यात ही महत्त्वाची अट आहे. आपल्या देशात संगणक सॉफ्टवेअर हे भारतीय कॉपीराईट अ‍ॅक्ट १९५७ अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे. विनापरवाना कुठल्याही सॉफ्टवेअरची विक्री करणे, कॉपी करणे, शेअर करणे या बाबींमुळेदेखील कॉपीराईट कायद्याचा भंग होतो.

टॅग्स :Crimeगुन्हा