शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

वर्ल्ड कॉपीराईट डे; प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांमध्ये सजगता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 09:31 IST

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अथक संशोधन व परिश्रमातून तयार झालेल्या बौद्धिक मालमत्तेची वा उत्पादनाची कुणी सहजासहजी नक्कल करू नये साठी ‘कॉपीराईट’ कायद्याचे संरक्षण देण्यात आले आहे. मात्र तंत्रज्ञानाचा उपयोग वाढत असतानाच ‘पायरसी’चे प्रमाणदेखील वाढत असल्याचे दिसून येत आहेत. जागोजागी ‘कॉपीराईट’ कायद्याचा भंग होताना दिसतो.यासंदर्भात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा व ...

ठळक मुद्देतीन वर्षांत ‘पायरसी’चे केवळ पाच गुन्हेराज्यात कशी थांबणार ‘पायरसी’ ?‘कॉपीराईट’चा उघडपणे भंग होत असल्याचे ‘आॅफलाईन’ चित्र

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अथक संशोधन व परिश्रमातून तयार झालेल्या बौद्धिक मालमत्तेची वा उत्पादनाची कुणी सहजासहजी नक्कल करू नये साठी ‘कॉपीराईट’ कायद्याचे संरक्षण देण्यात आले आहे. मात्र तंत्रज्ञानाचा उपयोग वाढत असतानाच ‘पायरसी’चे प्रमाणदेखील वाढत असल्याचे दिसून येत आहेत. जागोजागी ‘कॉपीराईट’ कायद्याचा भंग होताना दिसतो.यासंदर्भात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा व नागरिक या दोहोंमध्येदेखील उदासीनता दिसून येते. २०१४ ते २०१६ या ३ वर्षांच्या कालावधीत ‘पायरसी’च्या प्रकरणात समाविष्ट असलेल्या केवळ ५ जणांविरुद्धच गुन्हे दाखल करण्यात आले. या आकड्यांवर नजर टाकली असता राज्यात ‘कॉपीराईट’ कायद्याबाबत खरोखर जनजागृतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे.प्रदर्शनाअगोदरच ‘लिक’ होणारे चित्रपट, सहजपणे ‘आॅनलाईन’ उपलब्ध होणारी ‘पायरेटेड कॉपी’ इत्यादी प्रकारच्या ‘सायबर’ गुन्ह्यांची चित्रपट उद्योगाने धास्ती घेतली आहे. परंतु ‘पायरसी’ थांबविण्यासाठी अद्यापही फारशी पावले उचलण्यात आलेली नाही. शेकडो संकेतस्थळे आणि शहरांपासून ते ग्रामीण भागांत रस्त्यारस्त्यांवर हा उद्योग खुलेआमपणे सुरू असल्याचे दिसून येते. मात्र कारवाईचे प्रमाण नाममात्र असल्यामुळे कुणावरही वचक राहिलेला नाही.‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार २०१६ साली राज्यभरात ‘सायबर क्राईम’अंतर्गत एकूण २३८० गुन्हे दाखल झाले. यात ‘आयटी अ‍ॅक्ट’अंतर्गत झालेले ३५९ आणि ‘आयपीसी’अंतर्गत दाखल २००६ गुन्ह्यांचा समावेश आहे. यात ‘पायरसी’साठी झालेल्या गुन्ह्याांची संख्या केवळ ३ इतकी आहे. २०१४ ते २०१६ या वर्षांची आकडेवारी पाहिली तर ‘पायरसी’साठी केवळ ५ गुन्हे दाखल झाले.

शहरात बिनदिक्कतपणे ‘कॉपीराईट’चा भंगधरमपेठ, बर्डी, शनिमंदिर परिसर, गांधीबाग, सेंट्रल एव्हेन्यू, मानेवाडा, रेल्वे स्थानक, कॉटन मार्केट या परिसरांसोबत जवळपास सगळीकडेच मोठ्या प्रमाणात चित्रपट, संगीतासोबतच ‘कॉपीराईट’ कायद्याचा भंग करत संगणक सॉफ्टवेअरचीदेखील विक्री होताना दिसून येते. शिवाय अनेक इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्येदेखील बनावट सॉफ्टवेअरची विक्री सुरू असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर संगणकक्षेत्रातीलच काही व्यापाऱ्यांनी दिली.

तक्रारींचेच प्रमाण कमीमागील काही वर्षापासून ‘पायरसी’मुळे चित्रपट उद्योग तसेच ‘सॉफ्टवेअर्स कंपन्या’ हैराण आहे. मात्र ‘पायरसी’च्या प्रकरणात जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत पोलिसांकडून कारवाई करण्यात येत नाही. तक्रारकर्त्यांचे प्रमाण नगण्य असते व पोलीसदेखील स्वत:हून पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे ‘पायरसी’अंतर्गत दाखल होणाºया गुन्ह्यांचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ ‘पायरसी’चे प्रमाण कमी असते असे नाही, असे मत शहरातील ‘सायबर’ तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘कॉपीराईट’ म्हणजे काय?संगीत, नाट्य, कथा, कविता व तत्सम साहित्य व कलाकृती यांच्या संरक्षणासाठी बनविण्यात आलेला कायदा म्हणजे कॉपीराईट अ‍ॅक्ट. चित्रपटकार, नाटककार, साहित्यकार, सिनेमा, संगीतकार यांच्या कामाची नक्कल होऊ नये याकरता ‘कॉपीराईट’चा उपयोग होतो. नवीन काळात संगणक सॉफ्टवेअर्सचादेखील त्यात समावेश करण्यात आला आहे. ‘कॉपीराईट’ कायदा हा मर्यादित कालावधीसाठी असतो.‘ कॉपीराईट’साठी साहित्य किंवा तत्सम गोष्टी ‘ओरिजनल’ हव्यात ही महत्त्वाची अट आहे. आपल्या देशात संगणक सॉफ्टवेअर हे भारतीय कॉपीराईट अ‍ॅक्ट १९५७ अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे. विनापरवाना कुठल्याही सॉफ्टवेअरची विक्री करणे, कॉपी करणे, शेअर करणे या बाबींमुळेदेखील कॉपीराईट कायद्याचा भंग होतो.

टॅग्स :Crimeगुन्हा