शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

न्याय्य मागण्यांसाठी मजूरांनी स्वत:च सक्षम व्हावे; स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अधिवेशन

By मोरेश्वर मानापुरे | Updated: February 17, 2024 19:02 IST

आर्थिक आणि सांस्कृतिक क्रांती घडविण्यासह मजूरांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे लाया यांनी स्पष्ट केले. 

नागपूर: मजूरांनी स्वत:ची लढाई स्वत:च लढली पाहिजे. त्याकरिता त्याने शिक्षित व्हावे आणि आपल्या पाल्यालाही इंग्रजी भाषेचे ज्ञान देऊन शिक्षित करावे. न्याय्य मागण्यांसाठी मजूरांनी युनियनच्या माध्यमातून एकत्रित लढा देण्याची गरज असल्याचे मत हैदराबादचे सामाजिक विचारवंत आणि लेखक प्रा. कांचा लाया यांनी येथे केले. स्वतंत्र मजदूर युनियनचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात शनिवारपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या उद्घाटनपर सत्रात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. भारतातील मजूरांमध्ये सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्रांती घडविण्यासह मजूरांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे लाया यांनी स्पष्ट केले. 

व्यासपीठावर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील, उपाध्यक्ष डॉ. के.पी. स्वामीनाथन, दिल्ली विद्यापीठाचे असोसिएट प्रा. डॉ. सूरज मंडल, नवी दिल्लीचे डी.सी. कपील, युनियनचे पदाधिकारी ए.व्ही. किरण, एफ.सी. जस्सी, डॉ. दिनेश निबरिया, रमेश मेढी, महेश चंद्रा. एस.के. सचदेव, सुभाषिणी, सागर तायडे उपस्थित होते. प्रा. कांचा लाया म्हणाले, संघटित आणि असंघटित मजूरांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागतो. पण या मजूरांचा आदर होत नाही. ही शोकांतिका आहे. आधी मजूरांच्या हक्कांचे नेतृत्त्व करणाऱ्या कम्युनिष्टांमध्येही ब्राह्मणांना मोठे स्थान होते. त्यांच्या काळातही मजूरांचा छळ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पेरियार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मजूरांनी पाल्यांना शिक्षित करण्याची गरज आहे. या लढ्याच्या माध्यमातून त्यांचे स्थान सुदृढ होईल.

डॉ. सूरज मंडल म्हणाले, खासगीकरणामुळे कामगारांचे शोषण आणि बेरोजगारांची संख्या वाढली आहे. सामाजिक सुरक्षा नाहीच. आरक्षण संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाला गरीब बनविले जात आहे. डॉ. आंबेडकरांनी देशाला ताकद दिली. सत्ताधाऱ्यांकडून ती संपविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संविधान बदलून मनुस्मृति पुन्हा लादण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हक्क अबाधित राखण्यासाठी मजूरांनी आंदोलनाच्या माध्यमातून लढा उभारावा. स्वतंत्र मजदूर युनियन सत्ताधाऱ्यांचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही. नरेंद्र जारोंडे यांनी प्रास्तविक केले तर राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील यांनी आभार मानले. यावेळी स्वतंत्र मजदूर युनियनशी संबंधित विविध संघटनांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर