शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कामगारांचे अधिकार, काढू नका सरकार : निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 20:28 IST

शुक्रवारी देशभरातील विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी देशव्यापी निषेध आंदोलन करून सरकारला इशारा दिला आहे. उपराजधानीत आयटक संघटनेच्या नेतृत्वात संविधान चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण देश कोरोना महामारीशी झुंज देत आहे. यामुळे बेरोजगारीचे संकट ओढविलेल्या श्रमिकांना हाल सहन करावे लागत आहेत. अशावेळी देशातील १२ राज्यांच्या शासनांनी सरकारांनी कामगार कायद्यात कामगारांवर अन्याय करणारे बदल केले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व गुजरातसारख्या राज्यांनी कामगार कायदेच तीन वर्षासाठी स्थगित करून टाकले तर अनेक राज्यांनी कामाची वेळ आठवरून १२ तासांवर नेली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनात राज्यांनी चालविलेला बदल कामगारांच्या हक्काची पायमल्ली असल्याचा आरोप करीत याविरोधात कामगार संघटनांमध्ये असंतोष उफाळत आहे.शुक्रवारी देशभरातील विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी देशव्यापी निषेध आंदोलन करून सरकारला इशारा दिला आहे. उपराजधानीत आयटक संघटनेच्या नेतृत्वात संविधान चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. आशा सेविका, अंगणवाडी सेविका व गटप्रवर्तकांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते यात सहभागी झाले. आयटकचे महाराष्ट्र सरचिटणीस श्याम काळे यांनी केंद्र व विविध राज्यातील सरकारांवर कामगारविरोधक असण्याची टीका केली. लॉकडाऊनच्या काळात लाखो श्रमिकांचा रोजगार गेला. अनेकांचे वेतन थांबले. अशात कोरोनाशी लढण्याचे आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे कारण पुढे करीत काही राज्य शासनांनी कामगार कायद्यामधील तरतुदींना तीन वर्षांची स्थगिती दिली आहे. म्हणजे या काळात उद्योजक, कंपनी मालकांना कामगार हिताच्या तरतुदी बंधनकारक नसतील. याशिवाय १० पेक्षा जास्त राज्यांनी कामाची वेळ आठ तासावरून बारा तास केली आहे. केंद्र शासनाने ४४ कामगार कायद्याचे चार कोडमध्ये रूपांतर करीत कंपनी मालकांचे हित जोपासले तसेच सर्वच क्षेत्रात खासगीकरणाचे धोरण अवलंबिल्याचा आरोप केला.सहभागी संघटनाशुक्रवारी होणाऱ्या निषेध आंदोलनात इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक), ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक), हिंद मजदूर सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू), ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर, ट्रेड युनियन को-ऑर्डिनेशन सेंटर, ऑल इंडिया सेंटर कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन, सेल्फ एम्प्लॉईड वूमेन्स असोसिएशन, लेबर प्रोग्रेस्व्हि फेडरेशन आदी संघटनांचा सहभाग होता.भर पावसात आंदोलनसकाळी ११ वाजता आंदोलनाचा कॉल देण्यात आला होता. मात्र सकाळपासन पावसाने हजेरी लावली, त्यामुळे आंदोलन विस्कटेल, अशी शक्यता होती. मात्र वेळेवर शहर तसेच आसपासच्या परिसरातील आशा सेविका व अंगणवाडी सेविका संविधान चौकात गोळा झाल्या. आंदोलनात आयटकचे राष्ट्रीय सचिव कॉ. मोहन शर्मा, कॉ. सुकुमार दामले, राज्य सरचिटणीस कॉ. श्याम काळे, ज्योती अंडरसहारे, जयश्री चहांदे , मंगला लोखंडे, घुटके, भाकप नेते अरुण वनकर, अब्दुल सादिक, जयवंत गुरवे, बी. एन. जे . शर्मा, मो. हबीब, उषा चारभे, नलु मेश्राम, युगल रायलु, उषा लोखंडे, शारदा झाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Labourकामगारagitationआंदोलन