शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवरील ‘धम्मसंदेश’ म्हणजे राष्ट्रनिर्माणाचे कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 20:42 IST

दीक्षाभूमीवरील धम्मसंदेश अभियान हे खऱ्या  अर्थाने राष्ट्रनिर्माणाचे कार्य होय, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी येथे केले.

ठळक मुद्देप्रदीप आगलावे : अभिनंदन व प्रशस्तीपत्र वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाला एकसंध करायचे असेल तर जाती जोडण्यापेक्षा माणसं जोडणं महत्त्वाचं आहे. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्यांना समतेचे विचार समजतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हेच समतेचे विचार दिले आहेत. संविधानाच्या पानापानावर हे विचार अधोरेखित झालेले आहेत. दीक्षाभूमीवरील ‘धम्मसंदेश-मैत्री व करुणेचा’ हे अभियान नेमके हेच विचार विद्यार्थ्यांमध्ये पेरण्याचे कार्य करतात. तेव्हाच ‘मी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय’ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजते. त्यामुळे दीक्षाभूमीवरील धम्मसंदेश अभियान हे खऱ्या  अर्थाने राष्ट्रनिर्माणाचे कार्य होय, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभाग, धम्मसंदेश अभियान संघ आणि बानाई यांच्या सहकार्याने विविध महविद्यालयातील विद्यार्थ्यांतर्फे दीक्षाभूमीवर ‘धम्मसंदेश मैत्री व करुणेचा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत पथनाट्यांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य विद्यार्थ्यांनी केले. या अभिनव उपक्रमात सहभागी ३०० विद्यार्थी, प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले. तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय सिव्हिल लाईन्स येथे आयोजित या समरंभाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. आगलावे बोलत होते. यावेळी समाजकल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) नीलेश भरणे, डॉ. रमेश शंभरकर, प्रशांत तांबे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी नीलेश भरणे यांनी धम्मसंदेश या अभियानाचे कौतुक केले. समाजासाठी काही करायचे आहे असे अनेक जण बोलतात, पण कृती करताना मात्र फार कमी जण असतात. धम्मसंदेश अशीच कृती करणाऱ्यांचे अभियान आहे.संचालन अरुणा गजभिये यांनी केले. अंकित राऊत यांनी आभार मानले.संविधान लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्यडॉ. सिद्धार्थ गायकवाड यावेळी म्हणाले, धम्मसंदेश हा समाजनिर्मिती व राष्ट्रनिर्माणासोबतच व्यक्तिमत्त्व विकासाचेही कार्य करतो. खरे संविधान काय आहे? हे लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत खरी लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही. धम्मसंदेशाच्या माध्यमातून लोकांपर्यंत संविधान पोहोचविण्याचे कार्य केले जाते.

टॅग्स :nagpurनागपूर