शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

दीक्षाभूमीवरील ‘धम्मसंदेश’ म्हणजे राष्ट्रनिर्माणाचे कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 20:42 IST

दीक्षाभूमीवरील धम्मसंदेश अभियान हे खऱ्या  अर्थाने राष्ट्रनिर्माणाचे कार्य होय, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी येथे केले.

ठळक मुद्देप्रदीप आगलावे : अभिनंदन व प्रशस्तीपत्र वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाला एकसंध करायचे असेल तर जाती जोडण्यापेक्षा माणसं जोडणं महत्त्वाचं आहे. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्यांना समतेचे विचार समजतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हेच समतेचे विचार दिले आहेत. संविधानाच्या पानापानावर हे विचार अधोरेखित झालेले आहेत. दीक्षाभूमीवरील ‘धम्मसंदेश-मैत्री व करुणेचा’ हे अभियान नेमके हेच विचार विद्यार्थ्यांमध्ये पेरण्याचे कार्य करतात. तेव्हाच ‘मी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय’ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजते. त्यामुळे दीक्षाभूमीवरील धम्मसंदेश अभियान हे खऱ्या  अर्थाने राष्ट्रनिर्माणाचे कार्य होय, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभाग, धम्मसंदेश अभियान संघ आणि बानाई यांच्या सहकार्याने विविध महविद्यालयातील विद्यार्थ्यांतर्फे दीक्षाभूमीवर ‘धम्मसंदेश मैत्री व करुणेचा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत पथनाट्यांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य विद्यार्थ्यांनी केले. या अभिनव उपक्रमात सहभागी ३०० विद्यार्थी, प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले. तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय सिव्हिल लाईन्स येथे आयोजित या समरंभाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. आगलावे बोलत होते. यावेळी समाजकल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) नीलेश भरणे, डॉ. रमेश शंभरकर, प्रशांत तांबे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी नीलेश भरणे यांनी धम्मसंदेश या अभियानाचे कौतुक केले. समाजासाठी काही करायचे आहे असे अनेक जण बोलतात, पण कृती करताना मात्र फार कमी जण असतात. धम्मसंदेश अशीच कृती करणाऱ्यांचे अभियान आहे.संचालन अरुणा गजभिये यांनी केले. अंकित राऊत यांनी आभार मानले.संविधान लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्यडॉ. सिद्धार्थ गायकवाड यावेळी म्हणाले, धम्मसंदेश हा समाजनिर्मिती व राष्ट्रनिर्माणासोबतच व्यक्तिमत्त्व विकासाचेही कार्य करतो. खरे संविधान काय आहे? हे लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत खरी लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही. धम्मसंदेशाच्या माध्यमातून लोकांपर्यंत संविधान पोहोचविण्याचे कार्य केले जाते.

टॅग्स :nagpurनागपूर