शहरं
Join us  
Trending Stories
1
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
2
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
3
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
4
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
5
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
6
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
7
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
8
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
9
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
10
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
11
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
12
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
13
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
14
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
15
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
16
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
17
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
18
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
19
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
20
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
Daily Top 2Weekly Top 5

भाउसाहेबांच्या कार्याकडे विदर्भातील साहित्यिकांनी दुर्लक्ष केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 21:28 IST

देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून भाउसाहेब पंजाबराव देशमुख यांनी देशासोबत विदर्भासाठीही खूप काम केले. मात्र विदर्भातील साहित्यिकांनी भाउसाहेबांच्या व्यक्तित्त्वाला हवा तसा न्याय दिला नाही, त्यामुळे आमच्या पिढीला देखील त्यांच्या जीवनाविषयी फार काही माहिती नाही, अशी खंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देबबनराव देशमुख : ‘सूर्यावर वादळे उठतात’ नाट्यपुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून भाउसाहेब पंजाबराव देशमुख यांनी देशासोबत विदर्भासाठीही खूप काम केले. मात्र विदर्भातील साहित्यिकांनी भाउसाहेबांच्या व्यक्तित्त्वाला हवा तसा न्याय दिला नाही, त्यामुळे आमच्या पिढीला देखील त्यांच्या जीवनाविषयी फार काही माहिती नाही, अशी खंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली.आकांक्षा प्रकाशन व महात्मे-पालोरकर परिवाराच्यावतीने लेखक प्रा. बाळकृष्ण महात्मे लिखित ‘सूर्यावर वादळे उठतात’ या नाट्यपुस्तकाच्या प्रकाशन सोहळ््यात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार जगन वंजारी, मनोहर वानखेडे, डॉ. अरुणा सबाने, डॉ. वंदना महात्मे, निर्मला महात्मे आदी मान्यवर उपस्थित होते. भाऊसाहेबांसारख्या महनीय व्यक्तिबाबत वैदर्भीय लेखकांनी दुर्लक्ष केले, हे दुर्दैव आहे़ अशा पार्श्वभूमीवर प्रा़ बा. द़ महात्मे यांच्या नाट्यपुस्तकातील वादळरुपी प्रसंगांतून भाउसाहेबांचा इतिहास प्रकाशात आला. बहुजनांसाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे ठरणारे असून यातून नव्या पिढीला भाउसाहेबांचे मोठेपण कळेल, असे कौतुकस्वर डॉ. तायवाडे यांनी व्यक्त केले.यावेळी जगन वंजारी यांनीही डॉ. पंजाबराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा दिला. भाउसाहेबांनी वेदावर डिलीट ही पदवी प्राप्त केली होती. त्यांनी त्यांच्या महाविद्यालयात कुसुमावती देशपांडे यांना प्राध्यापक म्हणून नियुक्त केल्यानंतर ब्राम्हण महिलेला निवडल्यावरून त्यांना प्रश्न केले जायचे. त्यावेळी वेदांचा अभ्यास केलेले भाउसाहेब प्रश्नकर्त्यांना, या देशातील कोणत्याच समाजातील स्त्रीला कधी अधिकार मिळाले नाहीत, त्यामुळे कोणतीच स्त्री ब्राम्हण नसून सर्व स्त्रिया शुद्रच आहेत,असे ठामपणे उत्तर देत असल्याची आठवण वंजारी यांनी सांगितली.यावेळी मनोहर वानखेडे यांनी प्रा. बा.द. महात्मे यांच्या स्मृतींना उजाळा दिला़ शिवाजी शिक्षण संस्थेत नोकरीला असताना त्यांचे अनेकदा वाद झाले़, तरीही भाऊसाहेबांविषयीची त्यांची निष्ठा तिळमात्र कमी झाली नाही. प्रा. महात्मे यांचे विचार या नाट्यपुस्तकाद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचतील, ही भावना वानखेडे यांनी व्यक्त केली. बाबांनी लिहिलेल्या या नाटीकेला रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाचे १५ वषार्पूर्वी प्रमाणपत्र प्राप्त झाल्याचे त्यांची मुलगी वंदना महात्मे यांनी सांगितले़ प्रा. महात्मे यांनी लिहलेल्या पंजाबराव देशमुखांवरील या नाटकाला सादरीकरणाची क्षमता निर्माण करून रंगमंचावर सादर करण्यात यावे, अशी ईच्छा गिरीश गांधी यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक अरुणा सबाने यांनी केले़ संचालन चारुशिला महात्मे यांनी केले़ गजानन पालोरकर यांनी आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर