शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

धर्मनिरपेक्षता, सांप्रदायिकता शब्दाचा उपयोग निव्वळ राजकीय हितापुरताच : कुमार बिश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:04 IST

मागील ७० वर्षात धर्मनिरपेक्षता आणि सांप्रदायिकता या दोन शब्दांचा उपयोग लोकशाहीमध्ये राजकारण्यांनी हवा तेव्हा आणि हवा तसा गरजेप्रमाणे केला, असा आरोप डॉ. कुमार विश्वास यांनी केला.

ठळक मुद्देव्याख्यानातून केला प्रहार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील ७० वर्षात धर्मनिरपेक्षता आणि सांप्रदायिकता या दोन शब्दांचा उपयोग लोकशाहीमध्ये राजकारण्यांनी हवा तेव्हा आणि हवा तसा गरजेप्रमाणे केला, असा आरोप डॉ. कुमार विश्वास यांनी केला.नागपुरातील एका गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘धर्मनिरपेक्षता विरुद्ध सांप्रदायिकता’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. ते म्हणाले, देश एकदा पंथनिरपेक्ष होईल, मात्र धर्मनिरपेक्ष कधीच होऊ शकत नाही. कारण धर्म ही प्रत्येकाची धारणा आहे. सकाळी उठल्यापासूनच्या सर्व क्रिया त्या योगानेच होत असल्याने कुणीही धर्मापासून दूर राहू शकत नाही. धर्मनिरपेक्षता या शब्दाचा दुरुपयोग झाला. धर्म काय आहे हे सांगताना ते म्हणाले, ‘धर्माे धार्यती प्रजा’ अर्थात प्रजा धारण करते, तो धर्म. ‘एको मी बहुस्याम’ अर्थात मी एक असलो तरी अनेक होऊ इच्छितो, ही प्रजेची धारणा असते. म्हणूनच एकाचे अनेक होणे हे धर्म जाणतो.सांप्रदायिकतेबद्दल बोलताना ते म्हणाले, धर्मनिरपेक्षतेसोबतच या शब्दाला महत्त्व आहे. दुसऱ्याच्या जगण्यासाठी जागा निर्माण करण्याची शिकवण प्रत्येक धर्माने दिली आहे. हजरत हसन हुसेन यांच्या बलिदानाची आठवण करून ते म्हणाले, ‘लकुम दीनकुम वलियदीन’ असे हजरत पैगंबरांनी सांगितले. अर्थात स्वत:च्या जगण्यासोबत दुसऱ्यांचा मार्ग प्रशस्त करा. धर्म जगण्यातील ही लवचिकता सांगतो. दुर्गुणांचे दमन करा, असे सर्वच धर्मात सांगितले आहे. दुसºयांना मारा असे कोणताच धर्म सांगत नाही. मात्र चुकीच्या धार्मिक मानसिकता माणसांचाच नाश करतात.धर्मनिरपेक्षता व सांप्रदायिकता या दोन शब्दासोबतच राष्ट्रवाद या शब्दाचाही आपल्या नेत्यांनी हवा तसा मोडून-तोडून वापर केला. जनतेला पद्धतशीरपणे मूर्ख बनवून नेते स्वत: मोठे होत गेले, त्यांच्या अवास्तव रंगविल्या जाणाऱ्या प्रतिमांमुळे देश लहान ठरत गेला.डॉ. बिश्वास म्हणाले, धर्म मानायचाच असेल तर भारत हा स्वत:चा धर्म माना. कृष्ण-रामाला आपल्या स्वार्थानुसार रंगविण्यापेक्षा दुर्जनांचे पतन करणारा, सज्जनांना तारणारा, भरसभेत दुष्ट कंसमामाचा वध करणारा, कालियामर्दन करणारा,मर्यादांचे पालन करणारा दाखवा. अलिकडच्या चित्रपट, मालिकांमधून आम्ही काय बोध घेतो, याचा विचार करा. अराजकता मान्य होण्यासाठी मूठभर माणसे आपल्या मनावर चुकीचे बिंबवित असतील, तर जागे व्हा, असे आवाहन त्यांनी के ले.‘तो’ खांदा १२५ कोटीभारतीय जनतेचाकुमार बिश्वास म्हणाले, चांद्रयान-२ मिशन संदर्भातील अलिकडील घडामोडीत पंतप्रधान मोदी इस्रोमधील शस्त्रज्ञांना भेटले. एका भावूक क्षणी शास्त्रज्ञ डॉ. के. सिवन मोदींच्या खांद्यावर मान ठेऊन रडले. खांदा अश्रूंनी भिजला. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. मात्र तो खांदा भाजपाच्या नरेंद्र मोदींचा नव्हता, एका पंतप्रधानांचाही नव्हता, तर १२५ कोटी देशवासीयांचा होता. हे सर्व भारतीय शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहेत, हा संदेश त्यात होता. पंतप्रधान राजीव गांधी श्रीलंका दौऱ्यावर असताना एका सैनिकाने त्यांच्या खांद्यावर बंदुकीच्या दस्त्याने हल्ला केल्याचीही आठवण बिश्वास यांनी सांगितली. या घटनेनंतर सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग त्यांना भेटायला गेले होते. पत्रकारांनी त्यांना याबद्दल विचारले असता त्यांचे उत्तर होते, मी राजीव गांधींचा खांदा पहायला नव्हे, तर १०० कोटी जनतेचा खांदा पाहायला चाललो.

टॅग्स :SocialसामाजिकPoliticsराजकारण