शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

महिलांनी प्रतिकाराची मानसिकता बाळगावी

By admin | Updated: February 28, 2015 02:24 IST

महिला-मुलींनी प्रतिकाराची मानसिकता बाळगली तर महिलांवरील अत्याचाराला आळा बसू शकतो, असे परखड मत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले.

नागपूर : महिला-मुलींनी प्रतिकाराची मानसिकता बाळगली तर महिलांवरील अत्याचाराला आळा बसू शकतो, असे परखड मत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले. सर्वोदय आश्रम आणि नागपूर महिला मंचतर्फे स्वातंत्र्य संग्राम सैनिक दमयंतीबाई धर्माधिकारी स्मृती स्त्रीशक्ती जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत आज सर्वोदय आश्रमात महाविद्यालयीन युवतींच्या चिंतन शिबिरात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मीरा खडक्कार (निवृत्त न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय) होत्या. चिंतन शिबिरात, महिलांवरील अत्याचार : कारणे आणि उपाय या विषयावर बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा केल्या जात असल्या तरी पुरुषप्रधान संस्कृतीचाच सर्वत्र वरचष्मा दिसतो. जी महिला किंवा मुलगी पुरुषांच्या सुरात सूर मिसळत असेल ती चांगली. जी नकार देत असेल, प्रतिकार करीत असेल किंवा मतभिन्नता व्यक्त करीत असेल, ती किती वाईट आहे, ते अधोरेखित करण्याची संधी पुरुष मंडळी शोधत असतात. मात्र, सर्वच पुरुष एकसारखेच नसतात, असे स्पष्ट करतानाचा डॉ. गोऱ्हे यांनी महिलांच्या पाठीशी पुरुष कसे भक्कमपणे उभे राहतात, त्याचीही अनेक उदाहरणे सांगितली. निर्भया प्रकरणानंतर महिला हिताचे अनेक कायदे झाले आहेत. त्याची सर्वांना माहिती आणि कडक अंमलबजावणी झाली तर अत्याचाराला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वासही डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला. निवृत्त न्यायमूर्ती मीरा खडक्कार यांनी अध्यक्षीय भाषणातून समाजाने महिलांवरील अत्याचाराकडे केवळ ‘स्त्रीची समस्या’ या दृष्टिकोनातून बघू नये, असे आवाहन केले. संपूर्ण समाज अत्याचारग्रस्त महिलेच्या पाठीशी उभा राहण्याची गरज त्यांनी विशद केली. बरेचसे अत्याचार दारूच्या नशेत झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे दारुबंदीची कडक अंमलबजावणी व्हायला पाहिजे, असे सांगतानाच अत्याचारग्रस्त महिला-मुलींच्या पाठीशी महिलांनी भक्कमपणे उभे राहून एकीचे बळ दाखवावे, असे आवाहनही केले. अत्याचाराचा विषय येतानाच महिला-मुलींच्या पोषाखाचीही चर्चा होते. त्याचे विश्लेषण करताना खडक्कार यांनी संस्कृतीची जोपासना करून महिला-मुलींनी शालीनता कधीच सोडू नये, असा सल्लाही दिला. प्रारंभी डॉ. रूपा कुळकर्णी यांनी प्रास्ताविकातून पाहुण्यांचा परिचय करून देत चिंतन शिबिराचा उद्देश विशद केला. कार्यक्रमाचे संचालन विशाखा बागडे यांनी तर, आभारप्रदर्शन डॉ. कल्पना उपाध्याय यांनी केले. (प्रतिनिधी)