शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वित्त कंपन्यांकडून महिला बचत गटांची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 22:34 IST

सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी महिला स्वयंसाहाय्यता गटांची प्रचंड पिळवणूक केली जात आहे. कंपन्यांकडून होणारा मानसिक छळ व गैरव्यवहाराला कंटाळून गटांतील अनेक महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु या आत्महत्या कौटुंबिक कलहातून झाल्याचा प्रचार सर्वत्र करण्यात आला आहे. राजकीय संबंधांमुळे सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्यांतर्फे राज्यात मनमानी कारभार केला जात आहे, असे खळबळजनक आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : विशेष तपास पथक स्थापन करण्याची विनंती

आॅनलाईन लोकमतनागपूर : सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी महिला स्वयंसाहाय्यता गटांची प्रचंड पिळवणूक केली जात आहे. कंपन्यांकडून होणारा मानसिक छळ व गैरव्यवहाराला कंटाळून गटांतील अनेक महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु या आत्महत्या कौटुंबिक कलहातून झाल्याचा प्रचार सर्वत्र करण्यात आला आहे. राजकीय संबंधांमुळे सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्यांतर्फे राज्यात मनमानी कारभार केला जात आहे, असे खळबळजनक आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे.करण शाहू यांनी ही याचिका दाखल केली आहे. भ्रष्ट व्यावसायिक व राजकारण्यांनी मिळून राज्यात सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपन्यांत काळा पैसा गुंतविण्यात आला आहे. नोटाबंदीनंतर या कंपन्यांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी असंख्य महिला स्वयंसाहाय्यता गटांना बळजबरीने कर्ज वाटप केले. त्यानंतर कर्ज वसूल करण्यासाठी गटांवर अत्याचार सुरू केला. नियमानुसार, महिला स्वयंसाहाय्यता गटांकडून बळजबरीने कर्ज वसूल करता येत नाही. असे असताना कंपन्यांची मनमानी सुरू आहे. रिझर्व्ह बँकेने ही अवैध कृती थांबविण्यासाठी अद्याप काहीच उपाय केले नाहीत. कंपन्यांची कृती मानवाधिकारांचे उल्लंघन करणारी आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.महिला स्वयंसाहाय्यता गटांनी कंपन्यांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत तक्रारी नोंदविल्या आहेत, तसेच यासंदर्भात अनेकदा आंदोलने केली आहेत. परिणामी, राज्य शासनाने डिसेंबर-२०१६ मध्ये प्रकरणाच्या तपासाकरिता विशेष पथक स्थापन करण्याची घोषणा केली होती. परंतु १२ एप्रिल २०१७ रोजी विशेष तपास पथकाऐवजी चार सदस्यीय प्रशासकीय समिती स्थापन करण्याचा जीआर जारी करण्यात आला. या समितीमध्ये तज्ज्ञ सदस्यांचा समावेश नसल्यामुळे सखोल तपास होणे अशक्य आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकेत राज्याचे मुख्य सचिव, महिला व बाल कल्याण विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक अधिकारी व केंद्रीय महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अरविंद वाघमारे कामकाज पाहतील.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर