शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

भाजपच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले : सुष्मिता देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:25 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्याचा आरोप अ.भा. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, आसामच्या माजी खासदार सुष्मिता देव यांनी येथे केला.

ठळक मुद्देराज्यात महिलांसाठी नवे धोरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. आंदोलनकर्त्यांविरोधात सरकारची दडपशाही वाढली आहे. आसाममध्ये एनआरसीच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप अ.भा. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, आसामच्या माजी खासदार सुष्मिता देव यांनी येथे केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात महिलांसाठी नवे धोरण जाहीर केले जाणार आहे. यासंबंधीचा अहवाल प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे लवकरच सोपविण्यात येणार असल्याची माहिती दिली.प्रदेश महिला काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची, विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी हॉटेल हरदेव येथे पार पडली. तत्पूर्वी त्यांनी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी विधानसभा निवडणुकीत सक्षम महिलांना अधिकाधिक तिकिटं देण्यासोबतच बूथ पातळीवर संघटन मजबुतीची चर्चा करण्यात आली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एकीकडे बेटी बचाव, बेटी पढाव.. चा नारा देणाऱ्या सरकारच्याच काळात उन्नावसह इतर घटनांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी हे सरकार महिलांना सुरक्षितता देऊ शकत नसल्याचे पुढे आले. राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांची सुरक्षितता हे तीन महत्त्वाचे मुद्दे असून, भाजपचे सरकार या तीनही प्रश्नांवर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.सरकारकडून तळागाळातील महिलांच्या अपेक्षा लेखी स्वरूपात प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश महिला अध्यक्षा चारुलता टोकस यांनी यावेळी दिली. महिला काँग्रेस जनादेश पत्राच्या माध्यमातून घरोघरी संपर्क साधणार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कार्यकर्त्यांचे मनोबल खचल्याची कबुली देतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत तालुका पातळीवर संघटन मजबुतीवर भर दिला जात असून, नव्या पदाधिकाऱ्यांसह पक्ष उभारी घेईल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. प्रत्येक जिल्ह्यात महिलांना तिकीट देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, प्रवक्ते अतुल लोंढे, तक्षशीला वागधरे, संध्या लाखे, प्रज्ञा बडवाईक, डॉ. रिचा जैन, शिल्पा जवादे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.काश्मिरातील परिस्थिती जाणून घेण्याचा नागरिकांना अधिकारपक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांनी काश्मिर संदर्भात कधीही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. पाकविरोधात भूमिका घेताना मी सरकारच्या सोबतच असल्याचे त्यांनी यापुर्वीच जाहीर केले आहे. काश्मिर हा देशातंर्गत विषय असल्याचे काँग्रेस कार्यकारिणीनेही स्पष्ट केले असून काश्मिरात काय चालले आहे हे जाणून घेण्याचा राहुल गांधी व देशातील जनतेला अधिकार असल्याचे सुष्मिता देव यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :WomenमहिलाBJPभाजपा