शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले : सुष्मिता देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:25 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्याचा आरोप अ.भा. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, आसामच्या माजी खासदार सुष्मिता देव यांनी येथे केला.

ठळक मुद्देराज्यात महिलांसाठी नवे धोरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. आंदोलनकर्त्यांविरोधात सरकारची दडपशाही वाढली आहे. आसाममध्ये एनआरसीच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप अ.भा. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, आसामच्या माजी खासदार सुष्मिता देव यांनी येथे केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात महिलांसाठी नवे धोरण जाहीर केले जाणार आहे. यासंबंधीचा अहवाल प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे लवकरच सोपविण्यात येणार असल्याची माहिती दिली.प्रदेश महिला काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची, विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी हॉटेल हरदेव येथे पार पडली. तत्पूर्वी त्यांनी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी विधानसभा निवडणुकीत सक्षम महिलांना अधिकाधिक तिकिटं देण्यासोबतच बूथ पातळीवर संघटन मजबुतीची चर्चा करण्यात आली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एकीकडे बेटी बचाव, बेटी पढाव.. चा नारा देणाऱ्या सरकारच्याच काळात उन्नावसह इतर घटनांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी हे सरकार महिलांना सुरक्षितता देऊ शकत नसल्याचे पुढे आले. राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांची सुरक्षितता हे तीन महत्त्वाचे मुद्दे असून, भाजपचे सरकार या तीनही प्रश्नांवर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.सरकारकडून तळागाळातील महिलांच्या अपेक्षा लेखी स्वरूपात प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश महिला अध्यक्षा चारुलता टोकस यांनी यावेळी दिली. महिला काँग्रेस जनादेश पत्राच्या माध्यमातून घरोघरी संपर्क साधणार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कार्यकर्त्यांचे मनोबल खचल्याची कबुली देतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत तालुका पातळीवर संघटन मजबुतीवर भर दिला जात असून, नव्या पदाधिकाऱ्यांसह पक्ष उभारी घेईल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. प्रत्येक जिल्ह्यात महिलांना तिकीट देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, प्रवक्ते अतुल लोंढे, तक्षशीला वागधरे, संध्या लाखे, प्रज्ञा बडवाईक, डॉ. रिचा जैन, शिल्पा जवादे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.काश्मिरातील परिस्थिती जाणून घेण्याचा नागरिकांना अधिकारपक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांनी काश्मिर संदर्भात कधीही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. पाकविरोधात भूमिका घेताना मी सरकारच्या सोबतच असल्याचे त्यांनी यापुर्वीच जाहीर केले आहे. काश्मिर हा देशातंर्गत विषय असल्याचे काँग्रेस कार्यकारिणीनेही स्पष्ट केले असून काश्मिरात काय चालले आहे हे जाणून घेण्याचा राहुल गांधी व देशातील जनतेला अधिकार असल्याचे सुष्मिता देव यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :WomenमहिलाBJPभाजपा