शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

भाजपच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले : सुष्मिता देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:25 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्याचा आरोप अ.भा. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, आसामच्या माजी खासदार सुष्मिता देव यांनी येथे केला.

ठळक मुद्देराज्यात महिलांसाठी नवे धोरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. आंदोलनकर्त्यांविरोधात सरकारची दडपशाही वाढली आहे. आसाममध्ये एनआरसीच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप अ.भा. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, आसामच्या माजी खासदार सुष्मिता देव यांनी येथे केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात महिलांसाठी नवे धोरण जाहीर केले जाणार आहे. यासंबंधीचा अहवाल प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे लवकरच सोपविण्यात येणार असल्याची माहिती दिली.प्रदेश महिला काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची, विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी हॉटेल हरदेव येथे पार पडली. तत्पूर्वी त्यांनी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी विधानसभा निवडणुकीत सक्षम महिलांना अधिकाधिक तिकिटं देण्यासोबतच बूथ पातळीवर संघटन मजबुतीची चर्चा करण्यात आली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एकीकडे बेटी बचाव, बेटी पढाव.. चा नारा देणाऱ्या सरकारच्याच काळात उन्नावसह इतर घटनांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी हे सरकार महिलांना सुरक्षितता देऊ शकत नसल्याचे पुढे आले. राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांची सुरक्षितता हे तीन महत्त्वाचे मुद्दे असून, भाजपचे सरकार या तीनही प्रश्नांवर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.सरकारकडून तळागाळातील महिलांच्या अपेक्षा लेखी स्वरूपात प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश महिला अध्यक्षा चारुलता टोकस यांनी यावेळी दिली. महिला काँग्रेस जनादेश पत्राच्या माध्यमातून घरोघरी संपर्क साधणार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कार्यकर्त्यांचे मनोबल खचल्याची कबुली देतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत तालुका पातळीवर संघटन मजबुतीवर भर दिला जात असून, नव्या पदाधिकाऱ्यांसह पक्ष उभारी घेईल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. प्रत्येक जिल्ह्यात महिलांना तिकीट देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, प्रवक्ते अतुल लोंढे, तक्षशीला वागधरे, संध्या लाखे, प्रज्ञा बडवाईक, डॉ. रिचा जैन, शिल्पा जवादे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.काश्मिरातील परिस्थिती जाणून घेण्याचा नागरिकांना अधिकारपक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांनी काश्मिर संदर्भात कधीही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. पाकविरोधात भूमिका घेताना मी सरकारच्या सोबतच असल्याचे त्यांनी यापुर्वीच जाहीर केले आहे. काश्मिर हा देशातंर्गत विषय असल्याचे काँग्रेस कार्यकारिणीनेही स्पष्ट केले असून काश्मिरात काय चालले आहे हे जाणून घेण्याचा राहुल गांधी व देशातील जनतेला अधिकार असल्याचे सुष्मिता देव यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :WomenमहिलाBJPभाजपा