शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

भाजपच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले : सुष्मिता देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:25 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्याचा आरोप अ.भा. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, आसामच्या माजी खासदार सुष्मिता देव यांनी येथे केला.

ठळक मुद्देराज्यात महिलांसाठी नवे धोरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. आंदोलनकर्त्यांविरोधात सरकारची दडपशाही वाढली आहे. आसाममध्ये एनआरसीच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप अ.भा. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, आसामच्या माजी खासदार सुष्मिता देव यांनी येथे केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात महिलांसाठी नवे धोरण जाहीर केले जाणार आहे. यासंबंधीचा अहवाल प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे लवकरच सोपविण्यात येणार असल्याची माहिती दिली.प्रदेश महिला काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची, विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी हॉटेल हरदेव येथे पार पडली. तत्पूर्वी त्यांनी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी विधानसभा निवडणुकीत सक्षम महिलांना अधिकाधिक तिकिटं देण्यासोबतच बूथ पातळीवर संघटन मजबुतीची चर्चा करण्यात आली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एकीकडे बेटी बचाव, बेटी पढाव.. चा नारा देणाऱ्या सरकारच्याच काळात उन्नावसह इतर घटनांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी हे सरकार महिलांना सुरक्षितता देऊ शकत नसल्याचे पुढे आले. राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांची सुरक्षितता हे तीन महत्त्वाचे मुद्दे असून, भाजपचे सरकार या तीनही प्रश्नांवर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.सरकारकडून तळागाळातील महिलांच्या अपेक्षा लेखी स्वरूपात प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश महिला अध्यक्षा चारुलता टोकस यांनी यावेळी दिली. महिला काँग्रेस जनादेश पत्राच्या माध्यमातून घरोघरी संपर्क साधणार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कार्यकर्त्यांचे मनोबल खचल्याची कबुली देतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत तालुका पातळीवर संघटन मजबुतीवर भर दिला जात असून, नव्या पदाधिकाऱ्यांसह पक्ष उभारी घेईल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. प्रत्येक जिल्ह्यात महिलांना तिकीट देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, प्रवक्ते अतुल लोंढे, तक्षशीला वागधरे, संध्या लाखे, प्रज्ञा बडवाईक, डॉ. रिचा जैन, शिल्पा जवादे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.काश्मिरातील परिस्थिती जाणून घेण्याचा नागरिकांना अधिकारपक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांनी काश्मिर संदर्भात कधीही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. पाकविरोधात भूमिका घेताना मी सरकारच्या सोबतच असल्याचे त्यांनी यापुर्वीच जाहीर केले आहे. काश्मिर हा देशातंर्गत विषय असल्याचे काँग्रेस कार्यकारिणीनेही स्पष्ट केले असून काश्मिरात काय चालले आहे हे जाणून घेण्याचा राहुल गांधी व देशातील जनतेला अधिकार असल्याचे सुष्मिता देव यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :WomenमहिलाBJPभाजपा