शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गांधीजींच्या अनेक सत्याग्रहांचे साक्षीदार 'टिकेकर भवन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 22:28 IST

महात्मा गांधीजींचे नागपुरातील आणखी एक हक्काचे घर होते, ते म्हणजे धंतोलीतील टिकेकर भवन. टिकेकर बंगला या नावाने हे घर आजही सर्वपरिचित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधीजी यांचे नागपूरशी अतूट नाते होते. सेवाग्रामचा आश्रम होण्यापूर्वीपासूनच ते नागपुरात सातत्याने येत असत. पूनमचंद रांका, जनरल मंचरशा आवारी यांच्या घरी त्यांचा मुक्काम असायचा. यासोबतच महात्मा गांधीजींचे आणखी एक हक्काचे घर होते, ते म्हणजे धंतोलीतील टिकेकर भवन. टिकेकर बंगला या नावाने हे घर आजही सर्वपरिचित आहे.

देशभक्त गणपतराव टिकेकर हे नागपुरातील श्रीमंतांपैकी एक होते. इंग्रजांच्या काळात रेल्वे कॉन्ट्रॅक्टर असलेले गणपतराव यांचे स्वांतत्र्यसंग्रामात भरीव योगदान होते. काँग्रेसला नागपुरात मजबूत करण्याचे काम त्यांनीच केले. नागपुरात प्रसिद्ध अजनी रेल्वे पूल, रेल्वे स्टेशनवरील पूल आणि मोक्षधाम घाटावरील रेल्वे पूल त्यांनीच तयार केला आहे.गणपतराव टिकेकर यांचे घर म्हणजे काँग्रेस वर्किंग कमिटीचे कार्यालयच होते. त्यामुळे त्यांच्या घरी पं. मोतीलाल नेहरू, मीरा बेन, लाला लजपत राय, सरदार पटेल, सरोजिनी नायडू, राजेंद्र प्रसाद, विनोबा भावे, नेताजी सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास, खान अब्दुल गफार खान (सरहद गांधी), आचार्य विनोबा भावे,आदींसह महात्मा गांधी आणि कस्तुरबांचे वास्तव्य असायचे. दरम्यान देशभरात गाजलेला जंगल सत्याग्रह असो की, झेंडा सत्याग्रह, असहयोग आंदोलन असो की मिठाचा सत्याग्रह या आंदोलनाच्या पूर्वीची चर्चा टिकेकर भवनातच रंगायची.बकरीचे दूध आणि उकडलेले खाद्यपदार्थमहात्मा गांधीजी टिकेकर भवनात एकूण चार वेळा थांबले. दोनदा एक-एक महिन्यासाठी तर दोनदा १५-१५ दिवसांचा मुक्काम होता. त्यांच्यासोबत कस्तुरबा गांधी आणि ४० ते ५० नेते-कार्यकर्ते राहायचे. वरच्या माळ्यावर सर्वांची राहण्याची व्यवस्था असायची. महात्मा गांधीजी बकरीचे दूध प्यायचे. त्यामुळे बंगल्यातच ५० बकऱ्या आणून ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय उकडलेले खाद्यपदार्थ त्यांना खाऊ घालण्यात येत असत.सुवर्णदानकाँग्रेसच्या मदतीसाठी महात्मा गांधीजींना सुवर्णदान देण्याचा कार्यक्रम बंगल्याच्या गच्चीवरच आयोजित करण्यात आला. यावेळी गणपतरावजींच्या पत्नीसह बॅरिस्टर अभ्यंकरांच्या पत्नीनेही आपले सोन्याचे कडे दान दिले होते.खादी भंडार आणि टिळक विद्यालयाला जागा दानगणपतराव टिकेकर हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. सीताबर्डी येथील त्यांनी आपला एक प्लॉट खादी ग्रामोद्योग भंडारसाठी दिला. त्याचे उद्घाटन गांधीजींच्या हस्ते करण्यात आले. तसेच धंतोली येथील जागाही शाळेला दान दिली. त्या ठिकाणी टिळक महाविद्यालय उभे आहे. या शाळेचे उद्घाटनही महात्मा गांधीजींच्या हस्ते करण्यात आले.मिठाचा सत्याग्रहमहात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह पुकारला होता. सरोजिनी नायडू नागपुरात आल्या होत्या. त्यांनी समुद्राचे पाणी आणले होते. टिकेकर भवनातच त्या पाण्याचे मीठ तयार करण्यात आले. या मिठाच्या पुड्या तयार करून एक पुडी ५०० रुपयाप्रमाणे विकण्यात आली. गणपतरावजींनी त्याची जबाबदारी उचलली. तो पैसा आंदोलनाला मदत करण्यासाठी देण्यात आला.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूर