शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

राज्यनिर्मितीशिवाय विदर्भाचे भले नाही : श्रीहरी अणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 20:45 IST

विदर्भ राज्याची निर्मिती झाल्याशिवाय विदर्भाचे भले होणार नाही. त्यासाठी रक्तरंजित क्रांती न करता राजकीय मार्गानेच हा लढा लढून वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करावी लागेल, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आघाडीच्या चौथ्या वर्धापन दिनी विदर्भ राज्यनिर्मितीचा ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ राज्याची निर्मिती झाल्याशिवाय विदर्भाचे भले होणार नाही. त्यासाठी रक्तरंजित क्रांती न करता राजकीय मार्गानेच हा लढा लढून वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करावी लागेल, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.विदर्भ राज्य आघाडीचा चौथा वर्धापन दिन आंध्र असोसिएशन सभागृहात पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. श्रीहरी अणे होते. कार्याध्यक्ष अ‍ॅड. नीरज खांदेवाले, पूर्व विदर्भ विभाग प्रमुख अनिल जवादे, सचिव अमोल कठाणे, महासचिव संजय नेरकर, अमोल बोरखडे, सुरेश पारधी, वैभव लोणकर, श्रीकांत थुलकर, इर्ले गुरुजी, मेघा उताणे आदी उपस्थित होते.अ‍ॅड. अणे म्हणाले, सत्ताप्राप्तीसाठीच या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. कारण सामाजिक बदलासाठी आणि विदर्भाची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी हाच मार्ग आहे. निव्वळ आंदोलनाने बदल होणार नाही. आंदोलनाचे परिवर्तन पक्षात करा. पक्ष केवळ निवडणुकीपुरता नसून वर्षभर आंदोलनाच्या रूपाने काम करीत राहील. मैदानात अनेक जुने पक्ष आहेत. त्यामुळे चार वर्षापूर्वी स्थापन झालेला पक्ष जिंकणार की नाही याचा विचार करू नका. आंदोलनासाठी आपल्याला लढावेच लागेल, असे आवाहन त्यांनी केले. रक्तरंजित आंदोलन, जाळपोळ यातून विदर्भनिर्मिती नको. ज्याच्या घरचा तरूण मुलगा जातो, त्यांनाच त्याचे दु:ख ठाऊक असते. निवडणुकीच्या माध्यमातून आपला लढा व्यापक करा.नीरज खांदेवाले म्हणाले, २०१४ मध्ये विदर्भ राज्यनिर्मितीचे नाव घेऊन सत्तेत आलेले आज आश्वासन विसरले आहेत. विदर्भाचा विरोध करणाऱ्या शिवसेनेलाही त्यांनी सोबत घेतले आहे, यावरून त्यांच्या मनात विदर्भनिर्मितीबद्दल किती कळवळा आहे, हे समजून घ्यावे. अमेरिकेतील हाऊडी मोदी कार्यक्रमावरही त्यांनी टीका केली.अनिल जवादे, प्रा.जोगेंद्र गवई, कविता उईके, रामकिशन सिंगनजुडे आदींची यावेळी भाषणे झाली. अ‍ॅड.अनिल गोवारदीपे, अ‍ॅड.आसिफ कुरेशी, अ‍ॅड.शैलेश नारनवरे, अ‍ॅड.आशुतोष पोतनीस, अ‍ॅड.अतुल पांडे, अ‍ॅड.अविनाश काळे यांच्यासह जागृत पालक समितीचा यावेळी सत्कार करण्यात आला. विदर्भभरातून कार्यकर्ते उपस्थित होते.विदर्भनिर्मितीसह ११ ठरावस्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा यासह एकूण ११ ठराव यावेळी पारित करण्यात आले. विधानसभा निवडणुका इव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरून व्हाव्या, विदर्भातील बंद कारखाने सुरू करून बेरोजगारी दूर करावी, गडचिरोली जिल्ह्यातील ११० प्रतिबंधात्मक कलम रद्द करावे आदींचा यात समावेश आहे.

टॅग्स :Shrihri Anneश्रीहरी अणेVidarbhaविदर्भ