शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सामाजिक संघटनेशिवाय राजकारण अशक्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:48 IST

आम्ही समाजाला नाही बनवत तर समाज आम्हाला बनवितो. कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालू नये, असे मत मनोज बंड यांनी व्यक्त केले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महावीरनगरातील सैतवाळ जैन संघटन मंडळ युवा शाखेतर्फे पर्युषण पर्वानिमित्त ‘समाजकारण व राजकारण’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून अभिनंदन पळसापुरे हे उपस्थित होते. याशिवाय पुलक मंच परिवाराचे राष्ट्रीय सांस्कृतिक मंत्री मनोज बंड, करिअर मोटिव्हेटर डॉ. नरेन्द्र भुसारी, अखिल दिगंबर सैतवाळ संस्थेचे विदर्भ विभागीय सचिव राजेन्द्र नखाते, प्रशांत मानेकर उपस्थित होते.राजकारण व समाजकारण या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. व्यक्तीची सुरुवात समाजसेवेपासून होते तर शेवट राजकारणाने होतो. समाजसेवेत कार्यकर्ता हा कार्यकर्ताच असतो, तो कधीच माजी कार्यकर्ता होत नाही. समाजसेवेची आवड लहानपणापासून असली पाहिजे. आपण समाजाचे पुढारी, पदाधिकारी बनलो व त्यानंतर पन्नास-शंभर कार्यकर्ते मिळाले तेव्हा त्याच्या मनात येते मी समाजाचा पुढारी झालो, आता कार्यकर्त्यांनी माझे ऐकले पाहिजे. या विचारापासून समाजात राजकारणाची सुरुवात सध्या होते आहे. आता समाजात माझी चलती राहील. आम्ही समाजाला नाही बनवत तर समाज आम्हाला बनवितो. कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालू नये, असे मत मनोज बंड यांनी व्यक्त केले. जोपर्यंत सामाजिक संघटन मजबूत नसेल तोपर्यंत राजकारणावर कोणताही फरक पडणार नाही. समाजाने आपला पुढारी निवडल्यावर त्याला संघटित होऊन पूर्ण सहकार्य केले तर तो राजकारणात प्रभावी कार्य करू शकतो. सामाजिक संघटनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन अभिनंदन पळसापुरे यांनी केले. डॉ. नरेन्द्र भुसारी, राजेन्द्र नखाते, प्रशांत मानेकर यांनीही आपले मत मांडले. कार्यक्रमाचे संचालन नीरज पळसापुरे यांनी तर सिद्धांत नखाते यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सैतवाळ जैन संघटन मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत वेखंडे, प्रकाश मारवडकर, सुभाष मचाले, विनय बंड, प्रशांत सवाने, श्रीकांत मानेकर, विशाल चानेकर, रमेश तुपकर, शरद वेखंडे, धीरज बंड, संयम भुसारी, निखील पळसापुरे, अभिषेक बंड, चैतन्य महाजन उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकPoliticsराजकारण