शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

‘स्वच्छ भारत’चे आधारस्तंभ नागपुरात सुरक्षा साधनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 10:17 IST

‘स्वच्छ भारत मिशन’चे आधारस्तंभ असणारे स्वच्छता कामगार शहरात ग्लोव्हज व मास्क या सुरक्षा साधनाविना कार्य करीत आहेत.

ठळक मुद्देग्लोव्हज, मास्क नाही विविध प्रकारच्या संसर्गाची लागण

मेघा तिवारी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्वच्छ भारत मिशन’चे आधारस्तंभ असणारे स्वच्छता कामगार शहरात ग्लोव्हज व मास्क या सुरक्षा साधनाविना कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या संसर्गाची लागण झाली आहे. महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशनला गालबोट लावणारा हा प्रकार आहे. त्यासाठी जबाबदार कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट कंपनीला यावर जाब विचारणे आवश्यक झाले आहे.धरमपेठ झोनमध्ये कचरा गोळा करणाऱ्या एका कामगारानुसार, त्यांना सुमारे तीन वर्षांपूर्वी ग्लोव्हज व मास्क देण्यात आले होते. त्यानंतर या सुरक्षा साधनांचे वितरण करण्यात आले नाही तसेच कामगारांना स्वच्छता खर्चही दिला जात नाही. दुसऱ्या कामगाराने वेगळाच मुद्दा मांडला. कामगारांना प्रशिक्षण दिले गेले नसल्यामुळे ते ग्लोव्हज व मास्क घालून काम करू शकत नाही. कचरा गोळा करण्याचे काम आरोग्यासाठी धोकादायक आहे. असे असतानाही कामगारांची नियमित वैद्यकीय चाचणी केली जात नाही.अन्य एका स्वच्छता कामगाराने कचरा गोळा करताना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. नागरिक सुका व ओला कचरा वेगळा करीत नाहीत. हे काम कामगारांनाच करावे लागते. दरम्यान, त्यांचा नको त्या वस्तूंनाही स्पर्श होतो. अनेकदा काचाचे तुकडे व अन्य धारदार वस्तूंमुळे कामगारांचे हात कापले जातात. कंपनीच्या ग्लोव्हजमुळे त्यांचा बचाव होत नाही, असे त्यांनी सांगितले.

आरोप चुकीचेकनक रिसोर्सेस मॅनेजमेंट कंपनीने स्वच्छता कामगारांना सर्व प्रकारची सुरक्षा साधने पुरविली आहेत. ग्लोव्हज गेल्यावर्षीच देण्यात आले आहेत. त्यामुळे कामगारांचे सर्व आरोप चुकीचे आहेत.- कमलेश शर्मा, प्रकल्प प्रमुख.

काय म्हणतात डॉक्टर...डॉ. पिनाक दंदे यांनी स्वच्छता कामगारांना होणाऱ्या आजारांची माहिती दिली. मोकळ्या हाताने कचरा हाताळल्यास विविध प्रकारच्या संसर्गाची लागण होते. तसेच, टीबी, हिपेटायटिस, मलेरिया, डेंग्यू, कॉलरा, डायरिया, निमोनिया इत्यादी गंभीर आजार जडतात. परिणामी, स्वच्छता कामगारांची दर सहा महिन्यांनी वैद्यकीय तपासणी व त्यांच्यावर आवश्यक सुरक्षात्मक उपचार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य