शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

विना ‘हेल्मेट’ होईल मृत्यूचा ‘चेकमेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:01 IST

‘कोरोना’पासून बचाव व्हावा यासाठी उपराजधानीतील बहुतांश नागरिक व विशेषत: दुचाकीस्वारांकडून ‘मास्क’ घालण्यात येत असल्याचे चित्र आहे. मात्र ‘कोरोना’शी बचाव करत असताना अपघातापासूनदेखील बचाव करणे तितकेच महत्त्वाचे आहे याचा बहुदा अनेकांना विसर पडला आहे.

ठळक मुद्दे‘मास्क’सोबत ‘हेल्मेट’ घालण्याबाबत उदासीनताजागोजागी नियमांचे उल्लंघन : पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’पासून बचाव व्हावा यासाठी उपराजधानीतील बहुतांश नागरिक व विशेषत: दुचाकीस्वारांकडून ‘मास्क’ घालण्यात येत असल्याचे चित्र आहे. मात्र ‘कोरोना’शी बचाव करत असताना अपघातापासूनदेखील बचाव करणे तितकेच महत्त्वाचे आहे याचा बहुदा अनेकांना विसर पडला आहे. ‘लोकमत’ने शहरातील विविध चौकांमध्ये केलेल्या ‘रिअ‍ॅलिटी चेक’मध्ये ‘हेल्मेट’प्रति दुचाकीस्वारांची उदासीनता दिसून आली आहे. अनेक दुचाकीस्वार विना ‘हेल्मेट’च वाहन चालवत असून यासंदर्भात त्यांना जबाबदारीचे भान नसल्याचे चित्र आहे.नागपुरात ‘हेल्मेट’ सक्ती अनेक दिवसांपासून आहेच. शिवाय ‘कोरोना’ काळात शहरात अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात ५ ऑगस्टपासून विविध वाहनात प्रवासी नेण्यासाठी सूट देण्यात आली आहे. दुचाकी चालकासोबत १ जण प्रवास करू शकण्यास मुभा देण्यात आली असून हेल्मेट व मास्क घालणे अनिवार्य आहे. या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते.‘लोकमत’च्या चमूने शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये पाहणी केली असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे. कधी ‘ट्रिपल सीट’ कधी विना ‘हेल्मेट’ वाºयाच्या वेगाशी स्पर्धा करताना मृत्यूलाच आमंत्रण देण्याचा प्रकार सर्रास पहायला मिळाला. काही चौकांमध्ये तर वाहतूक पोलीस ‘मास्क’ नसलेल्यांवर कारवाई करत होते. मात्र ‘हेल्मेट’ न घातलेल्यांना साधी विचारणादेखील होत नव्हती.प्रतापनगर, शंकरनगर चौकप्रतापनगर, शंकरनगर चौकात ‘लोकमत’च्या चमूने पाहणी केली असता अनेक जण विना ‘हेल्मेट’चेच दिसून आले. या चौकात सतत वाहतूक पोलीस तैनात असतात. मात्र कुणावरही कारवाई होत नव्हती.पोलीस दादा, तुम्हीसुद्धा!

कायद्याचे पालन करणे व त्यातून जनतेसमोर आदर्श घालून देणे ही पोलिसांची जबाबदारीच आहे. मात्र शहरातील काही ठिकाणी पोलिसच विना ‘हेल्मेट’ दुचाकी चालविताना ‘लोकमत’च्या चमूला दिसून आले. नियम तोडणाºया सामान्य जनतेवरच कारवाई होत नसताना ‘हेल्मेट’ न घालणाºया पोलिसांना कोण विचारणा करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.बाजारपेठ, गर्दीच्या ठिकाणी ‘हेल्मेट’ नाहीचइतवारी, महाल, गांधीबाग इत्यादी बाजारपेठांच्या भागांमध्ये तर अनेक दुचाकीचालक ना ‘मास्क’, ना ‘हेल्मेट’ असे दिसून आले. या भागात वाहतूक पोलीस असून नसल्यासारखेच असतात. ‘कोरोना’ काळातदेखील बाजारपेठांमध्ये गर्दी वाढते आहे. अशा ठिकाणी जास्त खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र नागरिकांमध्ये यासंदर्भात उदासीनता दिसून आली.और क्या क्या पहने...लॉ कॉलेज चौकात सहा तरुण तीन वेगवेगळ्या दुचाक्यांवर चालले होते. त्यांच्याकडे तोंडावर अर्धवट लावलेले ‘मास्क’ होते, मात्र ‘हेल्मेट’ नव्हते. त्यांना विचारणा केली असता अगोदरच ‘मास्क’ लावून कंटाळा आला आहे. आणखी काय काय घालायचे असे उत्तर त्यांनी दिले.‘हेल्मेट’ चक्क गाडीलाकार्यालय सुरू होण्याच्या वेळेत ‘लोकमत’ चमूने दक्षिण नागपुरातील काही चौकात पाहणी केली असता अजबच प्रकार पहायला मिळाला. चेहº यावर ‘मास्क’ तर दिसून येत होते. शिवाय सोबत ‘हेल्मेट’देखील होते. मात्र ‘हेल्मेट’ डोक्यावर घालायच्या ऐवजी ते गाडीला लटकवले होते.अचानक का थंडावली ‘हेल्मेट’ कारवाई ?‘कोरोना’ काळाच्या अगोदर ‘हेल्मेट’संदर्भात जागोजागी कारवाई व्हायची. मात्र ‘कोरोना’चा संसर्ग सुरू झाल्यानंतर या कारवाईला ब्रेकच लागला. जानेवारी २०१९ ते जून २०२० या कालावधीत हेल्मेट न घालता दुचाकी चालविण्याप्रकरणी १ लाख ७४ हजार ९१२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून २ कोटी ४१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत कारवाई थंडावल्याचेच चित्र होते. अद्यापही तीच स्थिती आहे.‘हेल्मेट’ न घालणे मृत्यूलाच निमंत्रण देण्यासारखेजानेवारी ते जुलै या काळात ३०३ अपघात झाले. त्यात ९१ प्राणांतिक अपघात झाले असून ४४ दुचाकीस्वारांचा समावेश होता. यातील बहुतांश चालकांनी हेल्मेट घातले नसल्याचे किंवा हेल्मेटचा दर्जा योग्य नसल्याचे समोर आले आहे. मार्च ते मे या तीन महिन्यात १३ दुचाकीस्वारांचे अपघातात मृत्यू झाले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर