शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

विना ‘हेल्मेट’ होईल मृत्यूचा ‘चेकमेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:01 IST

‘कोरोना’पासून बचाव व्हावा यासाठी उपराजधानीतील बहुतांश नागरिक व विशेषत: दुचाकीस्वारांकडून ‘मास्क’ घालण्यात येत असल्याचे चित्र आहे. मात्र ‘कोरोना’शी बचाव करत असताना अपघातापासूनदेखील बचाव करणे तितकेच महत्त्वाचे आहे याचा बहुदा अनेकांना विसर पडला आहे.

ठळक मुद्दे‘मास्क’सोबत ‘हेल्मेट’ घालण्याबाबत उदासीनताजागोजागी नियमांचे उल्लंघन : पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’पासून बचाव व्हावा यासाठी उपराजधानीतील बहुतांश नागरिक व विशेषत: दुचाकीस्वारांकडून ‘मास्क’ घालण्यात येत असल्याचे चित्र आहे. मात्र ‘कोरोना’शी बचाव करत असताना अपघातापासूनदेखील बचाव करणे तितकेच महत्त्वाचे आहे याचा बहुदा अनेकांना विसर पडला आहे. ‘लोकमत’ने शहरातील विविध चौकांमध्ये केलेल्या ‘रिअ‍ॅलिटी चेक’मध्ये ‘हेल्मेट’प्रति दुचाकीस्वारांची उदासीनता दिसून आली आहे. अनेक दुचाकीस्वार विना ‘हेल्मेट’च वाहन चालवत असून यासंदर्भात त्यांना जबाबदारीचे भान नसल्याचे चित्र आहे.नागपुरात ‘हेल्मेट’ सक्ती अनेक दिवसांपासून आहेच. शिवाय ‘कोरोना’ काळात शहरात अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात ५ ऑगस्टपासून विविध वाहनात प्रवासी नेण्यासाठी सूट देण्यात आली आहे. दुचाकी चालकासोबत १ जण प्रवास करू शकण्यास मुभा देण्यात आली असून हेल्मेट व मास्क घालणे अनिवार्य आहे. या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते.‘लोकमत’च्या चमूने शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये पाहणी केली असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे. कधी ‘ट्रिपल सीट’ कधी विना ‘हेल्मेट’ वाºयाच्या वेगाशी स्पर्धा करताना मृत्यूलाच आमंत्रण देण्याचा प्रकार सर्रास पहायला मिळाला. काही चौकांमध्ये तर वाहतूक पोलीस ‘मास्क’ नसलेल्यांवर कारवाई करत होते. मात्र ‘हेल्मेट’ न घातलेल्यांना साधी विचारणादेखील होत नव्हती.प्रतापनगर, शंकरनगर चौकप्रतापनगर, शंकरनगर चौकात ‘लोकमत’च्या चमूने पाहणी केली असता अनेक जण विना ‘हेल्मेट’चेच दिसून आले. या चौकात सतत वाहतूक पोलीस तैनात असतात. मात्र कुणावरही कारवाई होत नव्हती.पोलीस दादा, तुम्हीसुद्धा!

कायद्याचे पालन करणे व त्यातून जनतेसमोर आदर्श घालून देणे ही पोलिसांची जबाबदारीच आहे. मात्र शहरातील काही ठिकाणी पोलिसच विना ‘हेल्मेट’ दुचाकी चालविताना ‘लोकमत’च्या चमूला दिसून आले. नियम तोडणाºया सामान्य जनतेवरच कारवाई होत नसताना ‘हेल्मेट’ न घालणाºया पोलिसांना कोण विचारणा करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.बाजारपेठ, गर्दीच्या ठिकाणी ‘हेल्मेट’ नाहीचइतवारी, महाल, गांधीबाग इत्यादी बाजारपेठांच्या भागांमध्ये तर अनेक दुचाकीचालक ना ‘मास्क’, ना ‘हेल्मेट’ असे दिसून आले. या भागात वाहतूक पोलीस असून नसल्यासारखेच असतात. ‘कोरोना’ काळातदेखील बाजारपेठांमध्ये गर्दी वाढते आहे. अशा ठिकाणी जास्त खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र नागरिकांमध्ये यासंदर्भात उदासीनता दिसून आली.और क्या क्या पहने...लॉ कॉलेज चौकात सहा तरुण तीन वेगवेगळ्या दुचाक्यांवर चालले होते. त्यांच्याकडे तोंडावर अर्धवट लावलेले ‘मास्क’ होते, मात्र ‘हेल्मेट’ नव्हते. त्यांना विचारणा केली असता अगोदरच ‘मास्क’ लावून कंटाळा आला आहे. आणखी काय काय घालायचे असे उत्तर त्यांनी दिले.‘हेल्मेट’ चक्क गाडीलाकार्यालय सुरू होण्याच्या वेळेत ‘लोकमत’ चमूने दक्षिण नागपुरातील काही चौकात पाहणी केली असता अजबच प्रकार पहायला मिळाला. चेहº यावर ‘मास्क’ तर दिसून येत होते. शिवाय सोबत ‘हेल्मेट’देखील होते. मात्र ‘हेल्मेट’ डोक्यावर घालायच्या ऐवजी ते गाडीला लटकवले होते.अचानक का थंडावली ‘हेल्मेट’ कारवाई ?‘कोरोना’ काळाच्या अगोदर ‘हेल्मेट’संदर्भात जागोजागी कारवाई व्हायची. मात्र ‘कोरोना’चा संसर्ग सुरू झाल्यानंतर या कारवाईला ब्रेकच लागला. जानेवारी २०१९ ते जून २०२० या कालावधीत हेल्मेट न घालता दुचाकी चालविण्याप्रकरणी १ लाख ७४ हजार ९१२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून २ कोटी ४१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत कारवाई थंडावल्याचेच चित्र होते. अद्यापही तीच स्थिती आहे.‘हेल्मेट’ न घालणे मृत्यूलाच निमंत्रण देण्यासारखेजानेवारी ते जुलै या काळात ३०३ अपघात झाले. त्यात ९१ प्राणांतिक अपघात झाले असून ४४ दुचाकीस्वारांचा समावेश होता. यातील बहुतांश चालकांनी हेल्मेट घातले नसल्याचे किंवा हेल्मेटचा दर्जा योग्य नसल्याचे समोर आले आहे. मार्च ते मे या तीन महिन्यात १३ दुचाकीस्वारांचे अपघातात मृत्यू झाले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर