शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विना हेल्मेट : नागपुरात २४८ चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:30 IST

शहरात सुरू असलेल्या ‘ई चालान’ प्रणालीमुळे बहुसंख्य दुचाकीचालक हेल्मेट घालायला लागले आहेत, काही प्रमाणात वाहतुकीचे नियमही पाळले जात आहे, परंतु अजूनही काही वाहन चालक नियमांना बगल देत स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात आणत आहे. बुधवारी अशा २४८ वाहन चालकांवर वाहतूक परिमंडळ सीताबर्डीने कारवाई केली. विशेष म्हणजे, विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चालकांचे पोलिसांनी समुपदेशनही केले.

ठळक मुद्देवाहतूक परिमंडळ सीताबर्डी : दुचाकी चालकांचे समुपदेशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सुरू असलेल्या ‘ई चालान’ प्रणालीमुळे बहुसंख्य दुचाकीचालक हेल्मेट घालायला लागले आहेत, काही प्रमाणात वाहतुकीचे नियमही पाळले जात आहे, परंतु अजूनही काही वाहन चालक नियमांना बगल देत स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात आणत आहे. बुधवारी अशा २४८ वाहन चालकांवर वाहतूक परिमंडळ सीताबर्डीने कारवाई केली. विशेष म्हणजे, विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चालकांचे पोलिसांनी समुपदेशनही केले.पोलीस उपआयुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे नुकतीच शहर वाहतूक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी सर्व वाहतूक परिमंडळ कार्यालयांना नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या वाहन चालकांवर जास्तीत जास्त कारवाई करण्याचे आदेश दिले. सोबतच कारवाई करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावूनही सांगा, अशा सूचनाही केल्या. याची दखल घेत वाहतूक परिमंडळ सीताबर्डीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी बुधवारी पंचशील चौक, महाराजबाग चौक, झिरो मॉईल व भरतनगर अमरावती रोड या भागात पथक तैनात करून विशेष मोहीम राबवली. यात विना हेल्मेटसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४८ चालकांवर कारवाई करण्यात आली. भांडारकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर विशेष कारवाई करण्यात आली. ही कारवाई यापुढेही सतत सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले. ही कारवाई भांडारकर यांच्यासह सहपोलीस निरीक्षक सोनटक्के, विनोद वाघ, तायडे, बागडे, राजमोहन सिंग यांच्यासह २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस