शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन वर्षात राज्यात डेंग्यूचे ३१७ बळी

By admin | Updated: September 19, 2016 02:50 IST

डासांमार्फत पसरणाऱ्या विविध रोगांवर नियंत्रण यावे यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो.

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाला पूर्ण यश नाहीच : हिवतापाचे दीड लाखांहून अधिक रुग्णनागपूर : डासांमार्फत पसरणाऱ्या विविध रोगांवर नियंत्रण यावे यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग, चिकनगुनिया यासारख्या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात या कार्यक्रमाअंतर्गत हवे तसे यश आलेले नाही. गेल्या साडेतीन वर्षात राज्यामध्ये ‘डेंग्यू’मुळे ३१७ नागरिकांना जीव गमवावा लागला. हिवतापाचे तर या कालावधीत दीड लाखाहून अधिक रुग्ण सापडले असून २०८ नागरिकांचा बळी गेला. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही बाब समोर आली आहे.राज्यात डासांमुळे प्रसारित होणाऱ्या रोगांसंदर्भात उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी आरोग्यविभाग सहसंचालकांकडे (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग) माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. २०१३ ते जुलै २०१६ या कालावधीत राज्यात डेंग्यू-हिवताप-हत्तीरोग-चिकनगुनियाचे किती रुग्ण आढळले, किती रुग्णांचा मृत्यू झाला इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१३ ते ३१ जुलै २०१६ या कालावधीत या ४ रोगांचे मिळून १ लाख ९९ हजार ६३९ रुग्ण आढळून आले. यापैकी ५२५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण २०१२ पर्यंत नियंत्रणात यावे व २०१५ सालापर्यंत हत्तीरोगाचे पूर्णपणे निर्मूलन करणे हे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. २००९ सालाच्या तुलनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी २०१३ नंतर रुग्णांचे प्रमाण परत वाढण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे. हत्तीरोगाचे पूर्णपणे निर्मूलन झाले नसून साडेतीन वर्षात ११ हजार ३१९ रुग्ण आढळून आले.(प्रतिनिधी)हिवताप अजूनही धोकादायकचकेंद्र, राज्य शासनाकडून हिवतापावर नियंत्रण यावे यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हिवतापाच्या रुग्णांचे प्रमाण २००९ च्या तुलनेत कमी झाले असले तरी २०१३ नंतर प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारी २०१३ ते जुलै २०१६ या कालावधीत हिवतापाचे १ लाख ६६ हजार २२७ रुग्ण आढळून आले. यात २०८ नागरिकांचा बळी गेला. याच कालावधीत ‘डेंग्यू’चे २१ हजार ८० रुग्ण आढळले व यातील ३१७ जण मरण पावले.२०१६ मध्ये १६ हजारांहून अधिक रुग्ण१ जानेवारी ते ३१ जुलै २०१६ या ७ कालावधीत हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्या, हत्तीरोग या आजारांचे १६ हजार ५४ रुग्ण आढळून आले. यातील तीन रुग्णांचा जीव गेला. यात डेंग्यूचे १,७७८ व हिवतापाचे १२ हजार ५६३ रुग्ण आहेत.