शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन वर्षात राज्यात डेंग्यूचे ३१७ बळी

By admin | Updated: September 19, 2016 02:50 IST

डासांमार्फत पसरणाऱ्या विविध रोगांवर नियंत्रण यावे यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो.

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाला पूर्ण यश नाहीच : हिवतापाचे दीड लाखांहून अधिक रुग्णनागपूर : डासांमार्फत पसरणाऱ्या विविध रोगांवर नियंत्रण यावे यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग, चिकनगुनिया यासारख्या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात या कार्यक्रमाअंतर्गत हवे तसे यश आलेले नाही. गेल्या साडेतीन वर्षात राज्यामध्ये ‘डेंग्यू’मुळे ३१७ नागरिकांना जीव गमवावा लागला. हिवतापाचे तर या कालावधीत दीड लाखाहून अधिक रुग्ण सापडले असून २०८ नागरिकांचा बळी गेला. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही बाब समोर आली आहे.राज्यात डासांमुळे प्रसारित होणाऱ्या रोगांसंदर्भात उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी आरोग्यविभाग सहसंचालकांकडे (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग) माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. २०१३ ते जुलै २०१६ या कालावधीत राज्यात डेंग्यू-हिवताप-हत्तीरोग-चिकनगुनियाचे किती रुग्ण आढळले, किती रुग्णांचा मृत्यू झाला इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१३ ते ३१ जुलै २०१६ या कालावधीत या ४ रोगांचे मिळून १ लाख ९९ हजार ६३९ रुग्ण आढळून आले. यापैकी ५२५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण २०१२ पर्यंत नियंत्रणात यावे व २०१५ सालापर्यंत हत्तीरोगाचे पूर्णपणे निर्मूलन करणे हे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. २००९ सालाच्या तुलनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी २०१३ नंतर रुग्णांचे प्रमाण परत वाढण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे. हत्तीरोगाचे पूर्णपणे निर्मूलन झाले नसून साडेतीन वर्षात ११ हजार ३१९ रुग्ण आढळून आले.(प्रतिनिधी)हिवताप अजूनही धोकादायकचकेंद्र, राज्य शासनाकडून हिवतापावर नियंत्रण यावे यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हिवतापाच्या रुग्णांचे प्रमाण २००९ च्या तुलनेत कमी झाले असले तरी २०१३ नंतर प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारी २०१३ ते जुलै २०१६ या कालावधीत हिवतापाचे १ लाख ६६ हजार २२७ रुग्ण आढळून आले. यात २०८ नागरिकांचा बळी गेला. याच कालावधीत ‘डेंग्यू’चे २१ हजार ८० रुग्ण आढळले व यातील ३१७ जण मरण पावले.२०१६ मध्ये १६ हजारांहून अधिक रुग्ण१ जानेवारी ते ३१ जुलै २०१६ या ७ कालावधीत हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्या, हत्तीरोग या आजारांचे १६ हजार ५४ रुग्ण आढळून आले. यातील तीन रुग्णांचा जीव गेला. यात डेंग्यूचे १,७७८ व हिवतापाचे १२ हजार ५६३ रुग्ण आहेत.