शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधी गुलाबी स्वप्नं अन् आता पोकळ घोषणा; राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेत अंबादास दानवेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 06:19 IST

शेतकरी व बेरोजगारांचे प्रश्न, माता-भगिनींचे संरक्षण करण्यास सरकार कमी पडल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : सत्तेत येण्यासाठी सरकारने मोठी गुलाबी स्वप्न दाखवली. मात्र प्रत्यक्षात सत्तेत आल्यावर सरकारने केलेल्या घोषणा या पोकळ निघाल्या. शेतकरी व बेरोजगारांचे प्रश्न, माता-भगिनींचे संरक्षण करण्यास सरकार कमी पडल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केली.

सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालत असल्याचा दावा केला जातो, दुसरीकडे सरकारला मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ महिन्यांपूर्वी उभारलेल्या पुतळ्याचे संरक्षण करता आले नाही. महायुतीने प्रकाशित केलेल्या जाहिरातींमध्ये राजश्री शाहू महाराजांचा फोटोचा विसर सरकारला पडला. महायुती सरकारच्या काळात महिला, मुलींवर अत्याचार होत असताना शिवरायांच्या कोणत्या विचारांचे पालन केले जाते असा सवाल दानवे यांनी केला. १ जुलै २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२४ या महायुती सरकारच्या कार्यकाळात ६७४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असेही ते म्हणाले.

राज्य सरकार आश्वासने पूर्ण करणार : दरेकर 

राज्यपालाच्या भाषणावरील अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना भाजपचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, लाडक्या बहिणींना शासनाने १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला पुढे नेण्याचे काम केले आहे. सरकारने जनतेला दिलेले आश्वासन राज्यपालांच्या अभिभाषणातून जनतेपर्यंत पोहोचवले आहे. राज्य सरकार संवेदनशील असून तिन्ही नेते नेतृत्व करत आहेत. सरकार महिला, युवक, कामगार, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांना मदत करत आहे.

'लाडकी बहीण' ठरली जायंट किलर : मिटकरी 

अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारचे कौतुक केले. कापूस, धान आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान दिले. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले. नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून विदर्भात सिंचनाला चालना देण्यात येत आहे. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाफेड खरेदी केंद्रे लवकरच सुरू करावीत अशी मागणी केली. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAmbadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाVidhan Parishadविधान परिषद