शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

आधी गुलाबी स्वप्नं अन् आता पोकळ घोषणा; राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेत अंबादास दानवेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 06:19 IST

शेतकरी व बेरोजगारांचे प्रश्न, माता-भगिनींचे संरक्षण करण्यास सरकार कमी पडल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : सत्तेत येण्यासाठी सरकारने मोठी गुलाबी स्वप्न दाखवली. मात्र प्रत्यक्षात सत्तेत आल्यावर सरकारने केलेल्या घोषणा या पोकळ निघाल्या. शेतकरी व बेरोजगारांचे प्रश्न, माता-भगिनींचे संरक्षण करण्यास सरकार कमी पडल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केली.

सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालत असल्याचा दावा केला जातो, दुसरीकडे सरकारला मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ महिन्यांपूर्वी उभारलेल्या पुतळ्याचे संरक्षण करता आले नाही. महायुतीने प्रकाशित केलेल्या जाहिरातींमध्ये राजश्री शाहू महाराजांचा फोटोचा विसर सरकारला पडला. महायुती सरकारच्या काळात महिला, मुलींवर अत्याचार होत असताना शिवरायांच्या कोणत्या विचारांचे पालन केले जाते असा सवाल दानवे यांनी केला. १ जुलै २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२४ या महायुती सरकारच्या कार्यकाळात ६७४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असेही ते म्हणाले.

राज्य सरकार आश्वासने पूर्ण करणार : दरेकर 

राज्यपालाच्या भाषणावरील अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना भाजपचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, लाडक्या बहिणींना शासनाने १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला पुढे नेण्याचे काम केले आहे. सरकारने जनतेला दिलेले आश्वासन राज्यपालांच्या अभिभाषणातून जनतेपर्यंत पोहोचवले आहे. राज्य सरकार संवेदनशील असून तिन्ही नेते नेतृत्व करत आहेत. सरकार महिला, युवक, कामगार, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांना मदत करत आहे.

'लाडकी बहीण' ठरली जायंट किलर : मिटकरी 

अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारचे कौतुक केले. कापूस, धान आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान दिले. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले. नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून विदर्भात सिंचनाला चालना देण्यात येत आहे. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाफेड खरेदी केंद्रे लवकरच सुरू करावीत अशी मागणी केली. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAmbadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाVidhan Parishadविधान परिषद