शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

गडकिल्ल्यांचे पावित्र्य मोडल्यास १ लाख दंड, दोन वर्षांपर्यंत शिक्षा; सुधारणा विधेयकाला विधान परिषदेत मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 09:37 IST

अभिजित वंजारी म्हणाले, गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन झाले पाहिजे, परंतु यात आपण नापास ठरलो आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महाराष्ट्रातील गड किल्ले, धार्मिक स्थळे, पुरातन मंदिरे महाराष्ट्राच्या इतिहासाचा ठेवा आहे. अशा महत्त्वाच्या स्मारकांचे जतन झाले पाहिजे. गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग होण्याच्या घटना घडतात, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. गडकिल्ल्यांचे पावित्र्य घालणाऱ्यांना दोन वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंड केला जाणार आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधान परिषदेत प्राचीन स्मारके व पुराणवास्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक २०२४ मांडताना दिली. या विधेयकाला विधान परिषदेत मंजुरी देण्यात आली.

प्राचीन स्मारके व धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखले गेले पाहिजे, यासाठी कायदा अधिक कठोर व्हावा, परंतु येथील मनुष्यबळाचा प्रश्न निकाली काढावा, अशी सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चर्चेदरम्यान केली. अॅड. अभिजित वंजारी म्हणाले, गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन झाले पाहिजे, परंतु यात आपण नापास ठरलो आहे. सदस्य शशिकांत शिंदे यांनी गड किल्ले व प्राचीन वास्तूंचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनFortगडVidhan Parishadविधान परिषद