शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

पेपरफुटी विरोधातील कायद्याची घोषणा हवेतच; आश्वासनाला चार महिने उलटले

By दीपक भातुसे | Updated: December 12, 2023 05:39 IST

प्रारूप ठरविण्यासाठी समितीही नाही

दीपक भातुसेनागपूर : शासकीय नोकरभरतीच्या परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटी, कॉपी, तसेच इतर गैरप्रकारांना पायबंद घालण्यासाठी कडक कायदा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. हिवाळी अधिवेशनात कायदा येईल, अशी आशा उमेदवारांना होती. मात्र, चार महिने उलटूनही कायद्याचे प्रारूप तयार करण्याबाबतची समितीही अजून स्थापन झालेली  नाही. त्यामुळे हा कायदा करणार कधी, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. 

उत्तराखंड आणि झारखंडसारख्या राज्यांनी याबाबत कडक कायदा केला आहे. आपल्या राज्यातही असा कडक कायदा झाला तर नोकरभरतीच्या परीक्षांमधील गैरप्रकार टळतील आणि प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी भावना या विद्यार्थ्यांची आहे. 

 यासंदर्भात आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने गत ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनीही पेपरफुटी विरोधातील कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. 

झारखंडने केला कडक कायदा 

झारखंड सरकारच्या कायद्यानुसार स्पर्धा परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्यास १० कोटी रुपये दंड आणि जन्मठेपेपर्यंतची शिक्षा अशी तरतूद आहे. 

स्पर्धा परीक्षेत फसवणूक करताना उमेदवार पकडला गेल्यास त्याला एक वर्षाचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे, तर दुसऱ्यांदा पकडल्यास तीन वर्षांचा कारावास आणि १० लाख रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन चार महिने काही होत नसेल तर अधिकाऱ्यांवरच कारवाई व्हायला हवी. याबाबत पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. 

- बच्चू कडू, आमदार, प्रहार जनशक्ती पक्ष  

सरळसेवेच्या पदभरतीत पेपर फुटत आहेत, घोटाळे होत आहेत. याला आळा घालण्यासाठी उत्तराखंड, झारखंडच्या धर्तीवर पेपरफुटीचा कायदा आणून त्यात कडक शिक्षा असायला हवी. - महेश बडे, स्टुडंटस् राइटस् असोसिएशन

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन