शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येचे हब; विमा कंपन्यांचा वाटा कुणा-कुणाला?; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 06:17 IST

कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, तर कधी गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र  सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे.

नागपूर : कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, तर कधी गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र  सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे. हतबल झालेला शेतकरी आत्महत्या करत असून महाराष्ट्र हे शेतकरी आत्महत्येचे हब झाले आहे. नुकसान होऊनही पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देत नाहीत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पीकविम्या कंपन्यांना भरमसाठ नफा होत आहे. या मुजोर विमा कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहेत, या कंपन्यांना सरकार आणि अधिकाऱ्यांचे संरक्षण आहे का ? असा सवाल विचारत विमा कंपन्यांच्या नफ्याचा वाटा कुणा कुणाला मिळाला ? कोण कोण यात वाटेकरी आहेत, असा जोरदार हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार  यांनी सरकारवर केला.

   विधानसभेत नियम १०१ अन्वये विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेवर बोलताना वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली. कांद्याला निर्यात बंदीचा फटका बसला, धानावर २० टक्के निर्यात शुल्क लादले, संत्रा निर्यातीवर बंदी आली. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. तांदळाची निर्यात थांबल्याने विदर्भातील राईस मिलचे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात तुटपुंजी मदत

पुणे जिल्ह्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आणि १९ हजार शेतकऱ्यांसाठी फक्त ११ कोटींची मागणी अधिकाऱ्यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिल्ह्यात पंचनामे होऊन इतकी तुटपुंजी मदत मिळत असेल तर शेतकरी आपली व्यथा कुठे मांडेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मंत्र्यांच्या तालुक्यातच दुष्काळ जाहीर

राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या ४० पैकी ३५ तालुके आमदारांचे असून त्यापैकी २९ तालुके मंत्र्यांचे आहेत. सरकारने तोंड पाहून दुष्काळ जाहीर केला आहे आता सरसकट दुष्काळ जाहीर करून  बागायतीसाठी हेक्टरी १ लाख, जिरायतीसाठी ५० हजार मदत जाहीर करावी, वीज बिले माफ करावे, पीक विमा दिला पाहिजे, पीक कर्जाचे पुनर्गठन करताना ते बिन व्याजी असावे, सरकारने इतर कामे बाजूला ठेवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

यांनीही घेतला सहभाग

    विधानसभेत आ. रईस शेख, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, बालाजी कल्याणकर, बच्चू कडू, नारायण कुचे, प्रकाश साळुंखे, विश्वजीत कदम, समीर कुणावार, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, डाॅ. संजय रायमूलकर, ॲड.आशीष जयस्वाल, राजेश टोपे, योगेश सागर, प्रकाश आबिटकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन