शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येचे हब; विमा कंपन्यांचा वाटा कुणा-कुणाला?; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 06:17 IST

कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, तर कधी गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र  सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे.

नागपूर : कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, तर कधी गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र  सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे. हतबल झालेला शेतकरी आत्महत्या करत असून महाराष्ट्र हे शेतकरी आत्महत्येचे हब झाले आहे. नुकसान होऊनही पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देत नाहीत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पीकविम्या कंपन्यांना भरमसाठ नफा होत आहे. या मुजोर विमा कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहेत, या कंपन्यांना सरकार आणि अधिकाऱ्यांचे संरक्षण आहे का ? असा सवाल विचारत विमा कंपन्यांच्या नफ्याचा वाटा कुणा कुणाला मिळाला ? कोण कोण यात वाटेकरी आहेत, असा जोरदार हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार  यांनी सरकारवर केला.

   विधानसभेत नियम १०१ अन्वये विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेवर बोलताना वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली. कांद्याला निर्यात बंदीचा फटका बसला, धानावर २० टक्के निर्यात शुल्क लादले, संत्रा निर्यातीवर बंदी आली. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. तांदळाची निर्यात थांबल्याने विदर्भातील राईस मिलचे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात तुटपुंजी मदत

पुणे जिल्ह्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आणि १९ हजार शेतकऱ्यांसाठी फक्त ११ कोटींची मागणी अधिकाऱ्यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिल्ह्यात पंचनामे होऊन इतकी तुटपुंजी मदत मिळत असेल तर शेतकरी आपली व्यथा कुठे मांडेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मंत्र्यांच्या तालुक्यातच दुष्काळ जाहीर

राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या ४० पैकी ३५ तालुके आमदारांचे असून त्यापैकी २९ तालुके मंत्र्यांचे आहेत. सरकारने तोंड पाहून दुष्काळ जाहीर केला आहे आता सरसकट दुष्काळ जाहीर करून  बागायतीसाठी हेक्टरी १ लाख, जिरायतीसाठी ५० हजार मदत जाहीर करावी, वीज बिले माफ करावे, पीक विमा दिला पाहिजे, पीक कर्जाचे पुनर्गठन करताना ते बिन व्याजी असावे, सरकारने इतर कामे बाजूला ठेवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

यांनीही घेतला सहभाग

    विधानसभेत आ. रईस शेख, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, बालाजी कल्याणकर, बच्चू कडू, नारायण कुचे, प्रकाश साळुंखे, विश्वजीत कदम, समीर कुणावार, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, डाॅ. संजय रायमूलकर, ॲड.आशीष जयस्वाल, राजेश टोपे, योगेश सागर, प्रकाश आबिटकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन