शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

‘विंग्ज आॅफ सक्सेस’ : आदित्य डोकवाल, राधा ठेंगडी, निधी सूचक शाखानिहाय ‘टॉपर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:02 IST

बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दात गुणवंतांचे कौतुक सुरू होते. बारावीच्या निकालाने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या पंखांना नवे बळ मिळाले असून अनेक ठिकाणी यशाचे ‘सेलिब्रेशन’ दिसून आले.

ठळक मुद्देबारावीच्या निकालात यशाची बरसात : नागपूर जिल्ह्याचा निकाल ८९ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दात गुणवंतांचे कौतुक सुरू होते. बारावीच्या निकालाने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या पंखांना नवे बळ मिळाले असून अनेक ठिकाणी यशाचे ‘सेलिब्रेशन’ दिसून आले.विज्ञान शाखेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य डोकवाल (९८ टक्के) याने नागपूरसह विदर्भात अव्वल क्रमांक पटकाविला. त्याच्यापाठोपाठ त्याच महाविद्यालयाचा योगेंद्र हुमने (९७.५४ टक्के) हा दुसरा क्रमांकावर राहिला. तिसऱ्या क्रमांकावर सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अनमोल अरोडा (९७.४० टक्के) हा आहे.वाणिज्य शाखेत सी.बी.आदर्श विद्यामंदिरची विद्यार्थिनी निधी सूचक हिने ९६.३० टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सोनल भट व श्रेया दांडेकर या दोघी ९५.३८ टक्के गुणांसह संयुक्तपणे दुसºया क्रमांकावर राहिल्या. याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी भार्गवी वनकर हिने ९५.२३ टक्के गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला आहे.कला शाखेतदेखील मुलींचाच वरचष्मा असून ‘एलएडी’ महाविद्यालयाच्या राधा ठेंगडी हिने ९७ टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक मिळविला आहे. याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी अनन्या आचार्य हिने ९३ टक्के गुण प्राप्त करत दुसरा क्रमांक पटकाविला तर हिस्लॉप महाविद्यालयाची विद्यार्थिनी जुही चौधरी ही ९२ टक्के गुणांसह तृतीय क्रमांकावर राहिली.विभाग, जिल्ह्यात विद्यार्थिनींचीच बाजीनागपूर विभागातून ८१,११२ पैकी ७३,८१४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होणाºयांचे प्रमाण ८४.२४ टक्के इतके आहे. नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर ३१,६७९ पैकी २९,५२७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९३.२१ टक्के इतके आहे. गेल्या वर्षापेक्षा ही आकडेवारी १.३९ टक्क्यांनी अधिक आहे. नागपूर जिल्ह्यातून ८६.३३ टक्के मुले उत्तीर्ण झाली. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.७२ टक्के इतका राहिला.विज्ञान शाखा१ आदित्य डोकवाल डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९८.०० %२ योगेंद्र हुमने डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९७.५४ %३ अनमोल अरोडा सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय ९७.४० %वाणिज्य शाखा१ निधी सूचक सी.बी.आदर्श विद्यामंदिर ९६.३० %२ सोनल भट डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९५.३८ %२ श्रेया दांडेकर डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९५.३८ %३ अंजू थॉमस जी.एस.वाणिज्य महाविद्यालय ९५.२३ %कला शाखा१ राधा ठेंगडी एलएडी महाविद्यालय ९७.०० %२ अनन्या आचार्य एलएडी महाविद्यालय ९३.०० %३ जुही चौधरी हिस्लॉप महाविद्यालय ९२.०० %नागपूर जिल्ह्यातील उत्तीर्णांची टक्केवारी            सहभागी       उत्तीर्ण           टक्केवारीविद्यार्थी ३२,५०४       २८,०६१        ८६.३३विद्यार्थिनी ३१,६७९    २९,५२७      ९३.२१एकूण ६४,१८३      ५७,५८८         ८९.७२उपराजधानीतील उत्तीर्णांची टक्केवारी               सहभागी        उत्तीर्ण           टक्केवारीविद्यार्थी १९,८६३          १७,५८८         ८८.५५विद्यार्थिनी १९,७८४     १८,६५८        ९४.९७एकूण ३९,६४७          ३६,२४६        ९१.४२

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८nagpurनागपूर