शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

कधी मिळेल स्थायी पत्ता?

By admin | Updated: September 5, 2016 02:39 IST

लाखो लोकांची पत्रे त्यांच्या योग्य पत्त्यावर पोहोचविणाऱ्या पोस्ट आॅफिसलाच सध्या स्थायी पत्त्याच्या शोधात भटकावे लागत आहे.

जरीपटका पोस्ट आॅफिसचे दोन महिन्यात दोन ठिकाणी स्थानांतरण : आता उप्पलवाडीच्या आश्रयालानागपूर : लाखो लोकांची पत्रे त्यांच्या योग्य पत्त्यावर पोहोचविणाऱ्या पोस्ट आॅफिसलाच सध्या स्थायी पत्त्याच्या शोधात भटकावे लागत आहे. वाचायला विचित्र वाटत असले तरी हे खरे आहे. जरीपटक्यातील पोस्ट आॅफिसचे दोन महिन्यात दोन ठिकाणी स्थानांतरण झाले आहे. मागच्या ६० वर्षांचा इतिहास पाहिला तर या कार्यालयाने तब्बल सात ठिकाणचा प्रवास केला आहे. सध्या या आॅफिसला उप्पलवाडीत शिफ्ट केले जात आहे. परंतु हे ठिकाणसुद्धा स्थायी नाही. अनेक असुविधा असलेल्या ठिकाणी या पोस्ट आॅफिसला स्थानांतरित केल्याने स्थानीय नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. अखेर या प्रकाराची चौकशी करण्यात आली. यात नागरिकांना असुविधा होत असल्याचे लक्षात आल्यावर तत्काळ या पोस्ट आॅफिसला दुसरीकडे स्थानांतरित करण्यात आले. अनेक वर्षाआधीपर्यंत हे पोस्ट आॅफिस जरीपटका बस स्टॉपजवळ होते. यानंतर सेतिया चौक आणि नंतर अ‍ॅड. ममतानी सत्संग हॉलजवळ व सात वर्षांआधी या पोस्ट आॅफिसला महात्मा गांधी शाळेजवळील समता भवनात स्थानांतरित करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षानंतर घरमालकाने भाडे वाढवून मागितले व न वाढवून दिल्यास घर रिकामे करण्याचा तगादा लावला. यानंतर मशीन मोहल्ला येथे एक जागा निवडून प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पोस्ट आफिसमोठी जागा असलेल्या समता भवनचे भाडे ८००० रुपये होते आणि मशीन मोहल्ला येथील छोट्या जागेचे भाडे १९ हजार ५०० इतके ठरवण्यात आले. समता भवनातून मशीन मोहल्ला येथे एका रात्रीत कार्यालयाचे स्थानांतरण करण्यात आले. या प्रकाराने स्थानिक नागरिक व एजंट नाराज झाले. मशीन मोहल्ला येथील पोस्ट आफिसमध्ये एजंटस्नी पैसे जमा करणे बंद केले. यानंतर बेझनबागेत दोन नवीन कांऊटर सुरू करण्यात आले. (प्रतिनिधी)