शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

कृषी विद्यापीठाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 20:56 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संपूर्ण देशात नावलौकिक आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या विद्यापीठाची जमीन आहे, मात्र जमिनीचा लिलाव होत असल्याची माहिती दुर्दैवी आहे.

ठळक मुद्देकृषी पदवीधारक आमदारांचा सत्कार : अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजि. मित्र परिवारचा पुढाकार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संपूर्ण देशात नावलौकिक आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या विद्यापीठाची जमीन आहे, मात्र जमिनीचा लिलाव होत असल्याची माहिती दुर्दैवी आहे. या जमिनीचे रक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी संशोधनाचे कार्य अधिक विस्तारित व्हावे व विद्यापीठाचा विकास व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून आर्थिक तरतूद करण्यास सांगणार असल्याचा विश्वास विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजिनीअर्स मित्र परिवाराच्या वतीने कृषी पदवीधारक आमदारांचा सत्कार समारंभ आज पंजाबराव देशमुख स्मृती स्मारक परिसराच्या आवारात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कृषी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री अनिल देशमुख, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, रजिस्ट्रार प्रकाश कडू, माजी कुलगुरू शरद निंबाळकर, दिलीप चौधरी, देवानंद पंचभाई, संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहितकर, सचिव प्रणय पराते, डॉ. सुनील सहतपुरे, मिलिंद राऊत आदी उपस्थित होते. यावेळी आमदार अशोक पवार, मनोहर चंद्रिकापुरे, श्यामसुंदर शिंदे, सुलभा खोडके, शेखर निकम, शिरीष चौधरी या कृषी पदवीधारक आमदारांचा सत्कार करण्यात आला.नाना पटोले पुढे म्हणाले, नवीन पिढी शेतीपासून दूर जात आहे, हे वाईट चित्र आहे. त्यामुळे लौकिक असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला शेतकऱ्यांना नवीन संशोधनाचा, नवीन तंत्रज्ञानाचा फायदा मिळवून देण्यासोबतच, तरुण पिढीला शेतीकडे वळवण्याचे महत्त्वाचे काम करावं लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. संघटनतर्फे विद्यार्थी व शेतकऱ्यांकरिता खुले अध्ययन केंद्र उभारण्याकरिता आर्थिक साहाय्य करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कृषिमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले, सध्या शेती हा राज्यासमोरील गंभीर प्रश्न आहे. शेती आणि शेतकºयांच्या परिस्थितीत बदल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार केला पाहिजे. यासाठी हे सुशिक्षित शेतकरी आमदार राज्यातील शेतकºयांना मार्गदर्शन करण्याचा विडा उचलतील, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राला निश्चित विकासाच्या मार्गावर पुढे नेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता मी न्यायाधीश आहे : पटोलेशेतीचे, बेरोजगाराचे प्रश्न उचलल्याने आता विधानसभा अध्यक्ष म्हणून संधी मिळाली. पण मी आता कोणत्या पार्टीचा नेता नाही तर न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे, त्यामुळे सगळ्यांचे ऐकून घ्यावे लागते. महाराष्ट्र हे बेरोजगारांचे राज्य झाले आहे आणि बेरोजगार तरुणांना न्याय देणे गरजेचे आहे. हे सरकार त्यांचे प्रश्न सोडवेल व महाराष्ट्राला पुन्हा पुढे नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेagricultureशेतीuniversityविद्यापीठ