शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

कृषी विद्यापीठाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 20:56 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संपूर्ण देशात नावलौकिक आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या विद्यापीठाची जमीन आहे, मात्र जमिनीचा लिलाव होत असल्याची माहिती दुर्दैवी आहे.

ठळक मुद्देकृषी पदवीधारक आमदारांचा सत्कार : अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजि. मित्र परिवारचा पुढाकार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संपूर्ण देशात नावलौकिक आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या विद्यापीठाची जमीन आहे, मात्र जमिनीचा लिलाव होत असल्याची माहिती दुर्दैवी आहे. या जमिनीचे रक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी संशोधनाचे कार्य अधिक विस्तारित व्हावे व विद्यापीठाचा विकास व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून आर्थिक तरतूद करण्यास सांगणार असल्याचा विश्वास विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजिनीअर्स मित्र परिवाराच्या वतीने कृषी पदवीधारक आमदारांचा सत्कार समारंभ आज पंजाबराव देशमुख स्मृती स्मारक परिसराच्या आवारात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कृषी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री अनिल देशमुख, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, रजिस्ट्रार प्रकाश कडू, माजी कुलगुरू शरद निंबाळकर, दिलीप चौधरी, देवानंद पंचभाई, संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहितकर, सचिव प्रणय पराते, डॉ. सुनील सहतपुरे, मिलिंद राऊत आदी उपस्थित होते. यावेळी आमदार अशोक पवार, मनोहर चंद्रिकापुरे, श्यामसुंदर शिंदे, सुलभा खोडके, शेखर निकम, शिरीष चौधरी या कृषी पदवीधारक आमदारांचा सत्कार करण्यात आला.नाना पटोले पुढे म्हणाले, नवीन पिढी शेतीपासून दूर जात आहे, हे वाईट चित्र आहे. त्यामुळे लौकिक असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला शेतकऱ्यांना नवीन संशोधनाचा, नवीन तंत्रज्ञानाचा फायदा मिळवून देण्यासोबतच, तरुण पिढीला शेतीकडे वळवण्याचे महत्त्वाचे काम करावं लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. संघटनतर्फे विद्यार्थी व शेतकऱ्यांकरिता खुले अध्ययन केंद्र उभारण्याकरिता आर्थिक साहाय्य करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कृषिमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले, सध्या शेती हा राज्यासमोरील गंभीर प्रश्न आहे. शेती आणि शेतकºयांच्या परिस्थितीत बदल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार केला पाहिजे. यासाठी हे सुशिक्षित शेतकरी आमदार राज्यातील शेतकºयांना मार्गदर्शन करण्याचा विडा उचलतील, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राला निश्चित विकासाच्या मार्गावर पुढे नेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता मी न्यायाधीश आहे : पटोलेशेतीचे, बेरोजगाराचे प्रश्न उचलल्याने आता विधानसभा अध्यक्ष म्हणून संधी मिळाली. पण मी आता कोणत्या पार्टीचा नेता नाही तर न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे, त्यामुळे सगळ्यांचे ऐकून घ्यावे लागते. महाराष्ट्र हे बेरोजगारांचे राज्य झाले आहे आणि बेरोजगार तरुणांना न्याय देणे गरजेचे आहे. हे सरकार त्यांचे प्रश्न सोडवेल व महाराष्ट्राला पुन्हा पुढे नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेagricultureशेतीuniversityविद्यापीठ