शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शाळा-महाविद्यालयांना लागणार का ‘ब्रेक’? ठरू शकतात ‘कोरोना’चे ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:00 IST

Nagpur News नागपुरात शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘कोरोना’चा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी ‘ब्रेक’ मिळणार का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाकडे पालकांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘कोरोना’ नियंत्रणात आल्याने शासनाने शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, आता विदर्भात व विशेषत: नागपुरात परत ‘पॉझिटिव्ह’ची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांत नावापुरतेच ‘सोशल डिस्टन्सिंग’ व इतर निर्देशांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘कोरोना’चा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी ‘ब्रेक’ मिळणार का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

शासन निर्णयानुसार अगोदर शाळा सुरू करण्यात आल्या. आता तर पाचवीपासूनच्या शाळादेखील सुरू झाल्या असून, वर्गदेखील नियमित होत आहेत. नागपूर जिल्ह्यातील दोन हजार ७८० शाळांमध्ये पाचवी ते दहावीच्या साडेसहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. त्यातील अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थिती लावत आहेत. मात्र, अनेक शाळांत विद्यार्थी ‘मास्क’ लावत नसल्याचे दिसून आले आहे.

दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात विद्यापीठाशी संलग्नित सुमारे तीनशे महाविद्यालये असून, तेथे लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिले दोन दिवस विद्यार्थ्यांची वर्गखोल्यांतील उपस्थिती संमिश्र राहिली. अनेक महाविद्यालयांत विद्यार्थी आले, मात्र ते वर्गखोलीत न जाता परिसरातच घुटमळत असल्याचे निदर्शनास आले. त्यातही ‘सोशल डिस्टन्सिंग’ वगैरे बाबी जास्त गंभीरतेने पाळल्या जात नसल्याने धोका संभवण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात परत ‘कोरोना’चे आकडे वाढत असताना आता तातडीने उपाययोजना करून शाळा-महाविद्यालयांना ‘ब्रेक’ लावण्यात यावा, अशी मागणी काही पालकांकडून करण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात जिल्हा प्रशासन किंवा विद्यापीठाने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. , जिल्हा प्रशासन पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, सध्या तरी शाळा बंद करण्याचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठाची भूमिका, जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करणार

शासनाच्या निर्देशांनुसार आम्ही महाविद्यालयांत प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली. जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला अद्याप तात्पुरता ‘ब्रेक’ घेण्याचे कुठलेही निर्देश आलेले नाही. स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचेच विद्यापीठ पालन करेल, असे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस