शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
2
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
3
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
4
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
5
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
6
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
7
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
8
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
9
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
11
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
12
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
13
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
14
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
15
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
16
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
17
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
18
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
19
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
20
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर

कवि गुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला ‘बूस्टर डोज’ मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 10:33 IST

संस्कृत विद्यापीठाला नवसंजीवनी देण्यासाठी आता राज्य शासनाच्या पुढाकाराची आवश्यकता असून राज्यातील दुसऱ्या केंद्रीय विद्यापीठाचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय विद्यापीठासाठी राज्य शासनाच्या पुढाकाराची गरजकेंद्रीय पातळीवर पाठवावा लागणार प्रस्ताव

योगेश पांडे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : मध्य भारतातील महत्त्वाचे विद्यापीठ मानण्यात येणाऱ्या कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा व्याप फार मोठा नाही. मात्र देशाच्या संस्कृती व परंपरेशी जुळलेल्या संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी शासकीय प्रोत्साहनाची आवश्यकता आहे. याच भावनेतून या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासंदर्भातील प्रस्ताव विद्यापीठात पारित झाला आहे. संस्कृत विद्यापीठाला नवसंजीवनी देण्यासाठी आता राज्य शासनाच्या पुढाकाराची आवश्यकता असून राज्यातील दुसऱ्या केंद्रीय विद्यापीठाचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.संस्कृत विद्यापीठाचे महत्त्व लक्षात घेता, याला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळणे आवश्यक आहे अशी मागणी गेल्या काही काळापासून जोर पकडते आहे. कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा, या आशयाचा प्रस्ताव मागील महिन्यात विद्यापीठाच्या विद्वत् परिषदेत संमत झाला. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याला अंतिम मान्यता देखील देण्यात आली.मात्र केवळ विद्यापीठात हा प्रस्ताव मंजूर होऊन काहीही फायदा नाही. या प्रस्तावाचा मसुदा तयार झाल्यानंतर तो राज्य शासनाला पाठवावा लागणार आहे. राज्य शासनाकडून हा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात येत असतो. त्यामुळे मंत्रालयात या प्रस्तावाची फाईल किती गंभीरतेने घेतली जाते, यावर केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळणार की नाही हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

संस्कृतच्या प्रचार-प्रसाराला मिळेल बळदेशभरात अपवाद सोडले तर संस्कृत विद्यापीठांची स्थिती फारशी चांगली नाही. रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाला उच्च शिक्षणाच्या विविध नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसह अनेकांना वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करण्यास मदत होऊन त्याचा फायदा शिक्षण क्षेत्राला होईल. संस्कृतच्या प्रचार-प्रसाराला बळ मिळेल.

इतर विद्यापीठांशी तुलना नकोकेंद्रीय विद्यापीठासंदर्भातील मसुदा तयार करण्याची जबाबदारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.कमलसिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेमार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल. केंद्रीय विद्यापीठासंदर्भात धोरण बदलले असले तरी संस्कृत विद्यापीठ हे इतर राज्य विद्यापीठांपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे त्यांच्याशी तुलना करणे योग्य होणार नाही. भाषेच्या प्रचार-प्रसाराची आवश्यकता लक्षात घेता केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा विद्यापीठाला विकासाच्या मार्गावर नेईल, असे मत प्रभारी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केले.

टॅग्स :educationशैक्षणिक