शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अर्थसंकल्पामुळे अनिवासी भारतीयांकडून विदेशी मुद्रा आवक घटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 03:33 IST

नोकरी-धंद्यासाठी गेलेल्यांनाही प्राप्तिकर भरावा लागणार

- सोपान पांढरीपांडे नागपूर : यावर्षीच्या अर्थसंकल्पाने अनिवासी भारतीय होण्यासाठीचे पात्रता निकष व नियम बदलल्याने देशात येणारी विदेशी मुद्रा आवक घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अर्थसंकल्पात अनिवासी भारतीय होण्यासाठी विदेशातील वास्तव्याचा कालावधी १८० दिवसांवरून २४० दिवस केला आहे. याशिवाय जर अनिवासी भारतीयाने विदेशात रहातांना इतर कुठल्याही देशात प्राप्तिकर भरला नसेल व १२० दिवस भारतात आला नसेल तर तो निवासी भारतीय नागरिक समजला जाईल व त्याला भारतातील प्रचलित दराने प्राप्ति भरावा लागेल.

दुबई, शारजाह, फुजीराह इत्यादी ७ संयुक्त अरब अमिराती, हाँगकाँग, सिंगापूर इत्यादी अनेक देशात प्राप्तिकर आकारलाच जात नाही. त्यामुळे तेथे नोकरी-धंद्यासाठी राहात असलेल्या अनिवासी भारतीयांना या नव्या नियमाने एका फटक्यात निवासी भारतीय बनवून टाकले व त्यांनाही प्रचलित दराप्रमाणे प्राप्तिकर भरावा लागणार आहे. त्यामुळे या अनिवासी भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

देशातील १३० कोटी जनतेपैकी जवळपास ३.५० कोटी नागरिक विदेशात रहातात व हे अनिवासी भारतीय विदेशी मुद्रेचा मोठा स्रोत आहे. जगात सर्वात जास्त म्हणजे ७८६.०९ कोटी डॉलर्स विदेशी मुद्रा अनिवासी भारतीयांकडून आली. त्यापाठोपाठ ६७४.१४ कोटी डॉलर्स चीनमध्ये आले व मेक्सिकोमध्ये ३५६.५९ कोटी डॉलर्स विदेशीचलन आहे. (स्रोत जागतिक बँक कर्ज २०१७-१८) नव्या नियमामुळे भारतात होणारी विदेशी चलनाची आवक घटण्याची शक्यता आहे.

याबाबत लोकमशी बोलतांना मुंबईतील प्रख्यात चार्टर्ड अकाऊंटंट फर्म ए.एन. शहा असोसिएशनचे प्रमुख अशोक शहा यांनी वेगळीच शक्यता व्यक्त केली. जर सरकारने हा नियम बदलला नाही तर अनिवासी भारतीयांना भारतीय नागरिकत्व परत करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्याचे भारताबद्दलचे प्रेम व ममत्व कमी होईल. हे विदेश मुद्रा आवक घटण्यापेक्षा जास्त गंभीर आहे, असे मत शहा यांनी व्यक्त केले.

अनिवासी नागरिकांकडून आलेली विदेश मुद्रा (२०१८)

भारत ७८६.०९ कोटी डॉलर्सचीन ६७४.१४ कोटी डॉलर्समेक्सिको ३५६.५९ कोटी डॉलर्संू

टॅग्स :budget 2020बजेटIndiaभारत