शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

अर्थसंकल्पामुळे अनिवासी भारतीयांकडून विदेशी मुद्रा आवक घटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 03:33 IST

नोकरी-धंद्यासाठी गेलेल्यांनाही प्राप्तिकर भरावा लागणार

- सोपान पांढरीपांडे नागपूर : यावर्षीच्या अर्थसंकल्पाने अनिवासी भारतीय होण्यासाठीचे पात्रता निकष व नियम बदलल्याने देशात येणारी विदेशी मुद्रा आवक घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अर्थसंकल्पात अनिवासी भारतीय होण्यासाठी विदेशातील वास्तव्याचा कालावधी १८० दिवसांवरून २४० दिवस केला आहे. याशिवाय जर अनिवासी भारतीयाने विदेशात रहातांना इतर कुठल्याही देशात प्राप्तिकर भरला नसेल व १२० दिवस भारतात आला नसेल तर तो निवासी भारतीय नागरिक समजला जाईल व त्याला भारतातील प्रचलित दराने प्राप्ति भरावा लागेल.

दुबई, शारजाह, फुजीराह इत्यादी ७ संयुक्त अरब अमिराती, हाँगकाँग, सिंगापूर इत्यादी अनेक देशात प्राप्तिकर आकारलाच जात नाही. त्यामुळे तेथे नोकरी-धंद्यासाठी राहात असलेल्या अनिवासी भारतीयांना या नव्या नियमाने एका फटक्यात निवासी भारतीय बनवून टाकले व त्यांनाही प्रचलित दराप्रमाणे प्राप्तिकर भरावा लागणार आहे. त्यामुळे या अनिवासी भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

देशातील १३० कोटी जनतेपैकी जवळपास ३.५० कोटी नागरिक विदेशात रहातात व हे अनिवासी भारतीय विदेशी मुद्रेचा मोठा स्रोत आहे. जगात सर्वात जास्त म्हणजे ७८६.०९ कोटी डॉलर्स विदेशी मुद्रा अनिवासी भारतीयांकडून आली. त्यापाठोपाठ ६७४.१४ कोटी डॉलर्स चीनमध्ये आले व मेक्सिकोमध्ये ३५६.५९ कोटी डॉलर्स विदेशीचलन आहे. (स्रोत जागतिक बँक कर्ज २०१७-१८) नव्या नियमामुळे भारतात होणारी विदेशी चलनाची आवक घटण्याची शक्यता आहे.

याबाबत लोकमशी बोलतांना मुंबईतील प्रख्यात चार्टर्ड अकाऊंटंट फर्म ए.एन. शहा असोसिएशनचे प्रमुख अशोक शहा यांनी वेगळीच शक्यता व्यक्त केली. जर सरकारने हा नियम बदलला नाही तर अनिवासी भारतीयांना भारतीय नागरिकत्व परत करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्याचे भारताबद्दलचे प्रेम व ममत्व कमी होईल. हे विदेश मुद्रा आवक घटण्यापेक्षा जास्त गंभीर आहे, असे मत शहा यांनी व्यक्त केले.

अनिवासी नागरिकांकडून आलेली विदेश मुद्रा (२०१८)

भारत ७८६.०९ कोटी डॉलर्सचीन ६७४.१४ कोटी डॉलर्समेक्सिको ३५६.५९ कोटी डॉलर्संू

टॅग्स :budget 2020बजेटIndiaभारत