शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अर्थसंकल्पामुळे अनिवासी भारतीयांकडून विदेशी मुद्रा आवक घटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 03:33 IST

नोकरी-धंद्यासाठी गेलेल्यांनाही प्राप्तिकर भरावा लागणार

- सोपान पांढरीपांडे नागपूर : यावर्षीच्या अर्थसंकल्पाने अनिवासी भारतीय होण्यासाठीचे पात्रता निकष व नियम बदलल्याने देशात येणारी विदेशी मुद्रा आवक घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अर्थसंकल्पात अनिवासी भारतीय होण्यासाठी विदेशातील वास्तव्याचा कालावधी १८० दिवसांवरून २४० दिवस केला आहे. याशिवाय जर अनिवासी भारतीयाने विदेशात रहातांना इतर कुठल्याही देशात प्राप्तिकर भरला नसेल व १२० दिवस भारतात आला नसेल तर तो निवासी भारतीय नागरिक समजला जाईल व त्याला भारतातील प्रचलित दराने प्राप्ति भरावा लागेल.

दुबई, शारजाह, फुजीराह इत्यादी ७ संयुक्त अरब अमिराती, हाँगकाँग, सिंगापूर इत्यादी अनेक देशात प्राप्तिकर आकारलाच जात नाही. त्यामुळे तेथे नोकरी-धंद्यासाठी राहात असलेल्या अनिवासी भारतीयांना या नव्या नियमाने एका फटक्यात निवासी भारतीय बनवून टाकले व त्यांनाही प्रचलित दराप्रमाणे प्राप्तिकर भरावा लागणार आहे. त्यामुळे या अनिवासी भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

देशातील १३० कोटी जनतेपैकी जवळपास ३.५० कोटी नागरिक विदेशात रहातात व हे अनिवासी भारतीय विदेशी मुद्रेचा मोठा स्रोत आहे. जगात सर्वात जास्त म्हणजे ७८६.०९ कोटी डॉलर्स विदेशी मुद्रा अनिवासी भारतीयांकडून आली. त्यापाठोपाठ ६७४.१४ कोटी डॉलर्स चीनमध्ये आले व मेक्सिकोमध्ये ३५६.५९ कोटी डॉलर्स विदेशीचलन आहे. (स्रोत जागतिक बँक कर्ज २०१७-१८) नव्या नियमामुळे भारतात होणारी विदेशी चलनाची आवक घटण्याची शक्यता आहे.

याबाबत लोकमशी बोलतांना मुंबईतील प्रख्यात चार्टर्ड अकाऊंटंट फर्म ए.एन. शहा असोसिएशनचे प्रमुख अशोक शहा यांनी वेगळीच शक्यता व्यक्त केली. जर सरकारने हा नियम बदलला नाही तर अनिवासी भारतीयांना भारतीय नागरिकत्व परत करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्याचे भारताबद्दलचे प्रेम व ममत्व कमी होईल. हे विदेश मुद्रा आवक घटण्यापेक्षा जास्त गंभीर आहे, असे मत शहा यांनी व्यक्त केले.

अनिवासी नागरिकांकडून आलेली विदेश मुद्रा (२०१८)

भारत ७८६.०९ कोटी डॉलर्सचीन ६७४.१४ कोटी डॉलर्समेक्सिको ३५६.५९ कोटी डॉलर्संू

टॅग्स :budget 2020बजेटIndiaभारत