शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

आज कुणी कृष्ण बनेल का, कालियाचे मर्दन करेल का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:05 IST

‘नागपूर दुर्गा उत्सव २०१९’मध्ये शनिवारी शरयू नृत्य कला मंदिरतर्फे ‘हे नदे... सरिते : दी अनटोल्ड स्टोरी’ भावनृत्यनाटिकेचे अप्रतिम असे सादरीकरण झाले.

ठळक मुद्दे‘हे नदे... सरिते’च्या प्रबोधनयुक्त प्रवाहात श्रोतृवृंद चिंबलोकमत आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचा ‘दुर्गा महोत्सव’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सृष्टी संरक्षणासाठी भगिरथ प्रयत्नातून महादेवाने जटेत धारण करीत गंगेला पृथ्वीवर अलगद सोडले आणि सरितासृष्टीचा नव्याने जन्म झाला. तेव्हापासून ते आजपर्यंतचा सुरेल, लयकारी, अवखळ प्रवास नृत्याभिनयातून अलहिदा सादर झाला. जणू श्रोतृवृंदाने अनायसे त्या प्रवासात स्वत:ला झोकून दिले. या प्रवासात ‘हे नदे... सरिते, तुझा त्रिवार जयजयकार’ असा अव्यक्त भाव मनामनातून व्यक्त होत होता.लोकमत आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने पूर्व लक्ष्मीनगर येथील व्हॉलिबॉल क्रीडांगणात सुरू असलेल्या ‘नागपूर दुर्गा उत्सव २०१९’मध्ये शनिवारी शरयू नृत्य कला मंदिरतर्फे ‘हे नदे... सरिते : दी अनटोल्ड स्टोरी’ भावनृत्यनाटिकेचे अप्रतिम असे सादरीकरण झाले. कथ्थक नृत्य साधिका सोनिया परचुरे यांची संकल्पना आणि लेखनातून आकाराला आलेल्या या भावनृत्यनाटिकेचे निवेदन प्रख्यात अभिनेत्री रेणुका शहाणे यांचे आहे. ‘गंगा सिंधू सरस्वतीच यमुना’ या मंगलाष्टकातील सरितावंदनाने सुरू झालेल्या या नृत्याविष्कारातून महादेव शिव, श्रीकृष्ण, नर्मदा-शोण-जोहिल्या प्रणय प्रसंग, श्रीराम-गोदावरी आदी प्रसंगातून सरितासृष्टीचा प्रवास हृदयाला भिडेल अशातºहेने सादर झाला. यातून वर्तमान वैश्विक प्रदूषणाचा मुद्दादेखील अधोरेखित करीत महाभारतातील ‘कालिया मर्दन’शी लीलया जोडण्यात आला. ‘जागो रे राजकुमार, जमूना में गेंद डालो’ या सुरेख गीतावरील नृत्याभिनयातून वर्तमान नदी प्रदूषणाची भयंकर अशा स्थितीला अंकित करण्यात आले. द्वापर युगात कालियाच्या वास्तव्याने आणि त्याच्या विष फुत्कारणातून यमुना नदी प्रदूषित झाली होती. त्या प्रदूषणापासून मुक्ती मिळविण्यासाठी बाल कृष्णाने मुद्दामहून चेंडू यमुनेत टाकला आणि चेंडू काढण्याच्या बहाण्याने कालियाचे मर्दन करीत यमुनेला मुक्त केले. वर्तमानात कारखानदारी म्हणजेच कालिया. त्याच्या मर्दनासाठी कुणीतरी कृष्ण बनावा आणि चेंडू यमुनेत टाकावा.. अशी आर्त हाक यावेळी करण्यात आली.यासोबतच नदीच्या सुकुमार तरल भावनेचे वर्ण प्रेयसी-प्रियकर या उदाहरणातून करण्यात आले. प्रेयसी नदी जेव्हा वळणावळणातून नखरेल वाहते तेव्हा ती प्रियकर सूर्यदेवाला रिझविण्याचा प्रयत्न करते. अशात सूर्यदेवाचा संदेशवाहक असलेला सूर्यफूल दोघांमधील दुवा ठरतो. सूर्यदेवाचा संदेश मिळताच हर्षोल्लासिक होऊन नदी बाष्प उधळते आणि सूर्यातपाचा स्पर्श होताच त्या बाष्पाचे मेघगर्जनेत रूपांतरण होऊन वर्षाऋतू सुरू होतो. अशा मेघनेचे वेगवेगळ्या उदाहरणांतून वर्णनात्मक प्रवास सुखावणारा होता.वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचा सन्मानया कार्यक्रमासाठी मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला. या ज्येष्ठ नागरिकांच्याच हस्ते दुर्गामातेची आरती करण्यात आली.

टॅग्स :NatakनाटकNavratriनवरात्री