शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

सोलरपंप व टॅँकरच्या मदतीने भागविणार वन्यजीवांची तृष्णा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 10:48 IST

पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पेंच, बोर प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य तसेच पांढरकवडा परिसरातील वन्यप्राण्यांना उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून वनविभागाने हिट अ‍ॅक्शन प्लॅन राबविला आहे.

ठळक मुद्दे५२९ पाणवठ्यांवर पुरवठावन विभागाचा ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पेंच, बोर प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य तसेच पांढरकवडा परिसरातील वन्यप्राण्यांना उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून वनविभागाने हिट अ‍ॅक्शन प्लॅन राबविला आहे. या क्षेत्रात १७९ नैसर्गिक पाणवठे आहेत व ३५० कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. उन्हाळ्यात हे पाणवठे कोरडे पडू नये, यासाठी सोलरपंप आणि टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.वनविभागातर्फे संरक्षित वनक्षेत्रात प्राण्यांसाठी उपलब्ध पाण्याच्या स्रोतांचा आढावा घेण्यात आला. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक आर.एस. गोवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात १७९ नैसर्गिक व ३५० कृ त्रिम पाणवठ्यांची संख्या आहे. नैसर्गिक जलसाठ्यांपैकी ७६ साठ्यांमध्ये बारमाही पाणी उपलब्ध राहील तर ६२ पाणवठ्यांवर एप्रिल अखेरपर्यंत आणि १६ पाणवठ्यांवर मे अखेरपर्यंत पाणी उपलब्ध राहणार, असा दावा विभागाने केला आहे.वनविभागाने तयार करण्यात आलेल्या पाणवठ्यांमध्ये १२३ पाणवठ्यांवर सोलरपंपद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. संरक्षित क्षेत्रात असलेल्या ३१ बोअरवेलवर सोलरपंप लावण्यात आले आहेत. दरम्यान यामधील अनेक सोलरपंप नादुरुस्त असून त्यांच्या दुरुस्तीचे काम प्रस्तावित असल्याचे विभागाने नमूद केले आहे. १९ पाणवठ्यावर हॅन्डपंपद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.उर्वरित १९८ कृत्रिम पाणवठ्यांपैकी ६१ पाणवठ्यांवर तीन शासकीय टॅँकरद्वारे तर १३७ पाणवठ्यांवर भाड्याने घेतलेल्या ७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एप्रिल ते जून महिन्याच्या कालावधीत कोरडे पडणारे कृत्रिम पाणवठे भरण्यासाठी आणखी २० टॅँकरची आवश्यकता भासणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. एप्रिल महिनाअखेर काही नैसर्गिक पाणवठे कोरडे पडण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आसपासचे कृत्रिम पाणवठे पाण्याने भरण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहितीविभागाने दिली. २०१७-१८ या वर्षात पाणवठे भरण्याकरिता झालेल्या खर्चापेक्षा यावर्षी अधिक खर्च लागणार असल्याचेही वनविभागाने नमूद केले आहे.प्राणी नैसर्गिक साठ्यांचा वापर अधिक करतातवनविभागातर्फे कृत्रिम पाणवठ्यांवर करण्यात येत असलेली व्यवस्था स्वागतार्ह आहे. मात्र निरीक्षणानुसार वन्यप्राणी तहान भागविण्यासाठी नैसर्गिक पाणवठ्यांचा वापर अधिक करीत असल्याचे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे वनविभागाने नैसर्गिक जलसाठ्यांकडे लक्ष देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्राण्यांचा अधिक ओढा असलेल्या नेमक्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी तसेच नैसर्गिक जलसाठ्यांच्या खोदकामासाठी अवैज्ञानिक पद्धतीचा वापर करू नये, अशी अपेक्षा वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली.

टॅग्स :wildlifeवन्यजीव