शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

वन्य पशू संरक्षण दिन; वनातील संघटित गुन्हेगारी केव्हाही काढू शकते डोके वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 09:34 IST

Wildlife Nagpur News वन्यजीवांना खरा धोका माणसांपासूनच आहे. एके काळी संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर होती. आता यातील अनेक टोळ्या संपविण्यात यश आले असले तरी संघटित गुन्हेगारी केव्हा डोके वर काढेल, याचा नेम नाही. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात वनातील संघटित गुन्हेगारी आता थंडावली आहे. मात्र ती संपली असे समजून चालणार नाही. ती केव्हाही डोके वर काढू शकते, असा धोक्याचा इशारा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी दिला आहे.वन्य पशू संरक्षण दिनानिमित्त ‘लोकमत’शी ते बोलत होते. ते म्हणाले, वन्यजीवांना खरा धोका माणसांपासूनच आहे. एके काळी संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर होती. आता यातील अनेक टोळ्या संपविण्यात यश आले असले तरी संघटित गुन्हेगारी केव्हा डोके वर काढेल, याचा नेम नाही. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.वन्यजीवांना माणसांपासून धोका असल्याचे सांगताना ते म्हणाले, शेतकऱ्यांकडून आणि शिकाऱ्यांकडून जंगलात तसेच श्ोतशिवारात शिकारीसाठी सापळे लावले जातात. यात रानडुकरांसोबत मोठे प्राणीही अडकतात. शेतकऱ्यांचा हेतू वन्यजीव मारण्याचा नसला तरी धोका येथेच होतो.मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका अधिक आहे. शेतकºयांवर प्राण्यांचे हल्ले वाढले की या घटना घडतात. नागरिकांचा रोष वाढतो. जंगलात तसेच शेतशिवारात विष प्रयोगाच्या घटना घडतात, परिस्थिती स्फोटक बनते. मात्र वनविभागाचे कर्मचारी अशा प्रसंगी योग्य समन्वय राखतात. त्यामुळे बरेचदा यातून योग्य मार्ग निघतो.वन्यजीवांच्या रक्षणासाठी लवकरच शीघ्र बचाव पथक स्थापन केले जाणार आहे. जखमी आणि आजारी प्राण्यांना तातडीने सेवा मिळावी यासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर अधिक सक्षमतेने उभारणे आणि त्यांची संख्या वाढविण्याचा हेतू आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी गुन्हेगारांचा पाठपुरावा केला जाईल. त्यासाठी अधिक मनुष्यबळ उभारण्याची आणि यंत्रणा सक्षम करण्याची वनविभागाची योजना आहे. सध्या प्रायमरी रिस्पॉन्स टीम कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून नियमित कामे होत आहेत. निरीक्षणासाठी अद्ययावत कुटी उभारण्याचे नियोजन आहे. वन्यजीव मित्र संकल्पना अमलात आली असून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. शिकारी टोळ्यांचा उपद्रव रोखण्यासाठी वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये एसटीटीएफ कार्यरत आहे. त्यात अधिक वाढ करणे, त्यांना प्रशिक्षीत करणे, प्रशिक्षणासाठी इमारत उभारणे ही कामे केली जाणार आहेत.वन्यजीवांचे रक्षण करणे ही मानवाची जबाबदारी आहे. त्यासाठी सहजीवन स्वीकारणे हाच पर्याय आहे.- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव