शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

वन्य पशू संरक्षण दिन; वनातील संघटित गुन्हेगारी केव्हाही काढू शकते डोके वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 09:34 IST

Wildlife Nagpur News वन्यजीवांना खरा धोका माणसांपासूनच आहे. एके काळी संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर होती. आता यातील अनेक टोळ्या संपविण्यात यश आले असले तरी संघटित गुन्हेगारी केव्हा डोके वर काढेल, याचा नेम नाही. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात वनातील संघटित गुन्हेगारी आता थंडावली आहे. मात्र ती संपली असे समजून चालणार नाही. ती केव्हाही डोके वर काढू शकते, असा धोक्याचा इशारा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी दिला आहे.वन्य पशू संरक्षण दिनानिमित्त ‘लोकमत’शी ते बोलत होते. ते म्हणाले, वन्यजीवांना खरा धोका माणसांपासूनच आहे. एके काळी संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर होती. आता यातील अनेक टोळ्या संपविण्यात यश आले असले तरी संघटित गुन्हेगारी केव्हा डोके वर काढेल, याचा नेम नाही. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.वन्यजीवांना माणसांपासून धोका असल्याचे सांगताना ते म्हणाले, शेतकऱ्यांकडून आणि शिकाऱ्यांकडून जंगलात तसेच श्ोतशिवारात शिकारीसाठी सापळे लावले जातात. यात रानडुकरांसोबत मोठे प्राणीही अडकतात. शेतकऱ्यांचा हेतू वन्यजीव मारण्याचा नसला तरी धोका येथेच होतो.मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका अधिक आहे. शेतकºयांवर प्राण्यांचे हल्ले वाढले की या घटना घडतात. नागरिकांचा रोष वाढतो. जंगलात तसेच शेतशिवारात विष प्रयोगाच्या घटना घडतात, परिस्थिती स्फोटक बनते. मात्र वनविभागाचे कर्मचारी अशा प्रसंगी योग्य समन्वय राखतात. त्यामुळे बरेचदा यातून योग्य मार्ग निघतो.वन्यजीवांच्या रक्षणासाठी लवकरच शीघ्र बचाव पथक स्थापन केले जाणार आहे. जखमी आणि आजारी प्राण्यांना तातडीने सेवा मिळावी यासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर अधिक सक्षमतेने उभारणे आणि त्यांची संख्या वाढविण्याचा हेतू आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी गुन्हेगारांचा पाठपुरावा केला जाईल. त्यासाठी अधिक मनुष्यबळ उभारण्याची आणि यंत्रणा सक्षम करण्याची वनविभागाची योजना आहे. सध्या प्रायमरी रिस्पॉन्स टीम कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून नियमित कामे होत आहेत. निरीक्षणासाठी अद्ययावत कुटी उभारण्याचे नियोजन आहे. वन्यजीव मित्र संकल्पना अमलात आली असून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. शिकारी टोळ्यांचा उपद्रव रोखण्यासाठी वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये एसटीटीएफ कार्यरत आहे. त्यात अधिक वाढ करणे, त्यांना प्रशिक्षीत करणे, प्रशिक्षणासाठी इमारत उभारणे ही कामे केली जाणार आहेत.वन्यजीवांचे रक्षण करणे ही मानवाची जबाबदारी आहे. त्यासाठी सहजीवन स्वीकारणे हाच पर्याय आहे.- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव