शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

बेडवर पत्नीचा मृतदेह, गाव  ३०० किलोमीटर दूर आणि खिशात केवळ ५० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 11:37 IST

Nagpur News रुग्णालयाच्या बेडवर मृतदेह आणि ३०० किलोमीटर दूर गाव, खिशात केवळ ५० रुपये, काय करावे, या चिंतेत ते होते. याची माहिती मेडिकलच्या सामाजिक सेवा विभागाला मिळताच ते धावून आले. तेच त्यांचे नातेवाईक झाले. अंत्यस्कारही पार पाडला.

ठळक मुद्देमेडिकलचा सामाजिक सेवा विभागच झाले आप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कॅन्सरग्रस्त पत्नीच्या उपचारात होते नव्हते ते सर्व खर्च झाले. उपचार सुरू असताना पोटच्या मुलामुलींनी ढुंकूनही पाहिले नाही. मृत्यूनंतर ते येतील, अंत्यसंस्कार करतील, या भाबड्या आशेवर गरीब वडील होते. परंतु यासाठीही त्यांनी नकार दिला. पत्नीच्या जाण्याच्या दु:खापेक्षा आप्तेष्टांनी दिलेल्या नकाराचे दु:ख त्या वडिलांना डोंगराएवढे भासत होते. रुग्णालयाच्या बेडवर मृतदेह आणि ३०० किलोमीटर दूर गाव, खिशात केवळ ५० रुपये, काय करावे, या चिंतेत ते होते. याची माहिती मेडिकलच्या सामाजिक सेवा विभागाला मिळताच ते धावून आले. तेच त्यांचे नातेवाईक झाले. अंत्यस्कारही पार पाडला.

नलिनी बोरकर, वय वर्ष ६१ त्या मृत महिलेचे नाव. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एका खेडेगावातील ही महिला. कुटुंबात दोन विवाहित मुले आणि एक विवाहित मुलगी. नातवंडांचा गोतावळा आणि जीवापाड प्रेम करणारा पती. एक सामान्य आर्थिक पार्श्वभूमी असलेला परिवार. पण मागील एका वर्षापासून नलिनीचे पती किशनराव बोरकर पत्नीच्या उपचारासाठी सरकारी रुग्णालयाचे उंबरठे झिजवत होते. आणि शेवटी निदान झाले, पत्नीला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने घेरल्याचे. पूर्वीच आर्थिक स्थिती कमकुवत आणि त्यात हा आजार. कुटुंबातील जवळपास सर्वच लोकांनी नलिनीबाबत अपेक्षा सोडून दिल्या होत्या. खुद्द नलिनीदेखील होणाऱ्या त्रासापासून जणू ईश्वराशी मृत्यूच दान मागत होत्या.

परंतु पतीने जिद्द सोडली नव्हती. आपल्याला करता येईल तेवढे सर्वच करायचे, असे त्यांनी ठरविले होते. घरापासून जवळपास ३०० किलोमीटर दूर हे दाम्पत्य सोबतीला तिसरा कुणाचाच आधार नसताना मेडिकलला पोहचले. उपचार सुरू झाले. परंतु नियतीला मान्य होते तेच झाले. तिचा मृत्यू झाला. तिच्या जाण्याने किशनराव ढसाढसा रडले, पण ही वेळ रडण्याची नव्हती. गावाकडे फोन करून त्यांनी आपल्या मुलाला, मुलीला त्यांच्या आईचा निधनाची वार्ता दिली. परंतु त्यांनी मृतदेह घेऊन जाण्यास आणि अंत्यसंस्कारास नकार दिला. खिशात होते नव्हते सर्व पैसे उपचारासाठी खर्च झाले.

आता रिकाम्या खिशाने गावाकडे हा मृतदेह न्यायचा तरी कसा, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पत्नीच्या जाण्याच्या दु:खापेक्षा आपल्या आप्तेष्टांनी दिलेल्या नकार त्यांना बोचत होता. याची माहिती मेडिकलमधील समाजसेवा विभागाला मिळाली. त्यांनीही कुटुंबीयांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही. जिथे तिच्या जाण्याचे कुणाला दु:ख नाही तर तिथे नलिनीला नेण्यात काय अर्थ आहे? असे म्हणत शेवटी येथेच नलिनीवर अंत्यसंस्कार करण्याचा पतीने निश्चय केला. यात मेडिकलचे सामाजिक अधीक्षक श्याम पांजला, प्रदीप पडवी, अधिराज सोमकुंवर, सेवा फाऊंडेशनचे प्रतिनिधी पुरुषोत्तम भोसले, स्नेहांचल संस्थेच्या इंद्रायणी पवार यांनी पुढाकार घेतला. शवविच्छेदनगृहातून मृतदेह घाटावर नेण्यापासून ते अंत्यसंस्कार पार पाडून घराकडे परतण्यासाठी या सर्वांनी एक आप्त म्हणून मदत केली.

टॅग्स :Socialसामाजिक