शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पत्नी, मुलांनी दगड-विटांनी ठेचले : घरगुती वादातून ईसमाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:57 IST

दुसऱ्या महिलेसोबत राहणाऱ्या एका व्यक्तीची त्याची पहिली पत्नी आणि दोन मुलांनी दगड-विटांनी ठेचून हत्या केली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेंडा चौक परिसरात गुरुवारी रात्री ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देनागपूरच्या महाल भागात थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुसऱ्या महिलेसोबत राहणाऱ्या एका व्यक्तीची त्याची पहिली पत्नी आणि दोन मुलांनी दगड-विटांनी ठेचून हत्या केली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेंडा चौक परिसरात गुरुवारी रात्री ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. रवी अडूळकर (वय ५१) असे मृताचे नाव आहे तर त्याची हत्या करण्याच्या आरोपात पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले, त्यांची नावे उषा रवी अडूळकर, मुलगा अक्षय (वय २२) आणि अभिषेक (वय २५) अशी आहेत. 

रवी अडूळकरचे महालमधील झेंडा चौक परिसरात निवासस्थान आहे. त्याला अक्षय आणि अभिषेक ही तरुण मुले आहेत. त्याची वडिलोपार्जित चांगली मालमत्ता असून, तीन चार दुकानेही बाजारपेठेत आहेत. त्यातून रवीला किरायाच्या रुपात मोठी रक्कम यायची. बाहेरख्याली वृत्तीच्या रवीने अनेक वर्षांपासून पत्नीचा अक्षरश: छळ चालवला होता. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला आणि मुलांना मारहाणही करायचा. त्यामुळे पत्नीने त्याच्याविरुद्ध चार वर्षांपूर्वी छळाची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी कलम ४९८ अन्वये रवीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशात रवीने दुसºया एका महिलेसोबत संसार थाटला होता. तो तिच्यासोबत हिंगणा परिसरात राहायचा. त्याने वाºयावर सोडल्याने पत्नी आणि मुलांचे हाल होते. ते कसेबसे आपला उदरनिर्वाह करायचे. दरम्यान, पत्नी उषाने दाखल केलेल्या प्रकरणाची आज कोर्टात तारीख होती. तेथे हजर झाल्यानंतर रवीच्या मनात काय आले माहीत नाही. तो गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास रागाने तणतणतच पत्नी उषाकडे आला. त्याने तिला नको त्या भाषेत शिवीगाळ सुरू केली. यावेळी दोन्ही मुलांनी त्याची समजूत घालून त्याला निघून जाण्यास सांगितले. मात्र, रवी ऐकायला तयार नव्हता. तो उषाला मारहाण करू लागला. त्यामुळे पत्नी उषा, अक्षय आणि अभिषेकने त्याचा प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात त्याला हातात येईल तो दगड, विटांचे तुकडे उचलून ठेचणे सुरू केले. डोक्यावर अनेक वार झाल्याने रवी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. त्यांनी मायलेकांची कशीबशी समजूत काढली. त्यानंतर कोतवाली पोलिसांना कळविले.कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती कळताच परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणिकर यांनीही घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, रवीला डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.बायको-पोरांची केली होती कोंडीगजबजलेल्या भागात ही अनपेक्षित घटना घडल्याने शेजारीच नव्हे तर परिसरातील रहिवाशांमध्येही प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. रवीचे वर्तन चांगले नव्हते. त्याने पत्नी आणि तरुण मुलांना एकाकी सोडून त्यांची आर्थिक व मानसिक कोंडी केली होती. पती किंवा वडिलांचे कर्तव्य तो पार पाडत नव्हता. मात्र, पत्नी आणि मुलांवर आपला अधिकार दाखवून त्यांचा तो छळ करायचा. घराच्या मुख्य दाराने जाण्यायेण्यासही त्याने मनाई केली होती. विरोध केला असता त्यांना नेहमीच मारहाण करायचा. पत्नी मुख्य दाराने येत जात असल्याचे पाहून आज त्याने घराचा जिना तोडणे सुरू केले. त्याचे हे वर्तन सहन करण्यापलिकडचे होते. त्यामुळे पत्नी व मुलांच्या संतापाचा भडका उडाला व तो निर्घृणपणे मारला गेला.मुलांचेही भवितव्य काळोखातकौटुंबिक कलह कोणत्या थराला जाऊ शकतो, त्याचे हे प्रकरण थरारक उदाहरण ठरावे. संशयी आणि बाहेरख्याली वृत्तीच्या रवी अडूळकरने दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध जोडून पत्नी आणि मुलाला आधी वाऱ्यावर सोडले. आता तो स्वत: मारला गेला तर त्याच्या हत्येच्या आरोपात त्याच्या पत्नीसोबत मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही दिवसानंतर त्यांची कारागृहात रवानगी होईल. त्यामुळे आधी पत्नीचे आणि आता दोन्ही तरुण मुलांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनMahalमहालnagpurनागपूर