शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

म्हणूनच निर्ढावतात क्रूरकर्मे आणि घोषणांच्या पावसात अश्रू जातात वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 11:55 IST

Hathras, Gang rape, Nagpur News हाथरस प्रकरणाने देश ढवळून निघाला आहे. देशात यापूर्वी दिल्लीच्या निर्भया आणि हैदराबादच्या प्रकरणानेही अशीच संतापाची लाट निर्माण केली होती.

ठळक मुद्देशिक्षा तर दूरच, सुनावणीलाही सुरुवात नाही

नरेश डोंगरे!लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हाथरस बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणामुळे पुन्हा एकदा देशभर संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवू, दोषींना कठोरात कठोर आणि लवकरात लवकर शिक्षा केली जाईल, अशी घोषणा होईल. प्रत्यक्षात पीडित परिवाराला तातडीने न्याय मिळणार नाही. होय, ही सर्वसामान्यांची भावनाच नाही तर यापूर्वीच्या अशाच घटनांतून आलेला त्यांचा अनुभव आहे.हाथरस प्रकरणाने देश ढवळून निघाला आहे. देशात यापूर्वी दिल्लीच्या निर्भया आणि हैदराबादच्या प्रकरणानेही अशीच संतापाची लाट निर्माण केली होती. नागपुरात मोनिका किरणापुरे, कांचन मेश्राम, सानिका थुगावकर तर हिंगणघाट (वर्धा) मध्ये अंकिता जळीतकांडाने देशभर संतापाची लाट उसळवली होती. प्रत्येक वेळी उफाळून आलेला जनक्षोभ शांत करण्यासाठी ‘या प्रकरणाचा’ तातडीने निकाल लावू, आरोपींना फासावर टांगू, अशी भाषा वापरण्यात येते. प्रत्यक्षात असे काहीही होत नाही. राजकीय घोषणांच्या पुरात पीडित परिवाराचे अश्रु वाहून जातात. कोर्टकचेऱ्यामध्ये तारखांच्या बांधावर न्याय अडकतो. महिनोन्महिने या केसच बोर्डावर येत नाहीत. एखाद्या प्रकरणात शिक्षा सुनावली तरी त्याची वर्षानुवर्षे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच गुंड निर्ढावतात. देशभर खळबळ उडवून देणाºया नागपूर विदर्भातील खालील तीन प्रकरणातून त्याची प्रचिती यावी.१ जुलै २०१८ च्या रात्री ७.४५ च्या सुमारास आरोपी हेमनानीने सानिकाला तिच्या मामाच्या कार्यालयात गाठले. ‘तू माझ्याशी संबंध का तोडले’ असा प्रश्न करीत त्याने तिच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूचे सपासप घाव घालून तिला संपविले होते. आता या प्रकरणाला अडीच वर्षे झाली. अद्याप या प्रकरणात आरोपीला शिक्षा झालेली नाही.१८ डिसेंबर २००५ ला लोणारा (कळमेश्वर)च्या कांचन मेश्रामला राकेश मनोहर कांबळे आणि अमरसिंग किसनसिंग ठाकूर या नराधम गुंडांनी तिच्या नातेवाईकांसमोरून उचलून नेले. उभा गाव जमा झाला असताना त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिची शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली होती. न्यायालयाने जून २०१३ मध्ये त्यांना फाशीची सुनावली. मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.३० दिवसांत न्याय !हिंगणघाटच्या अंकिता नामक प्राध्यापिकेला ३ फेब्रुवारी २०२० ला नराधम विकेश नगराळे याने जिवंत पेटवले होते. या जळीतकांडाने देशभर संतापाची लाट उसळली होती. संतप्त लोकभावना लक्षात घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कायद्याचा अभ्यास करून या जळीत कांडातील क्रूरकर्म्याचा ३० दिवसांच्या आत कायदेशिर निकाल लावण्याचे प्रयत्न केले जातील. जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) हा खटला चालवून मृत अंकिता आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय दिला जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र असे काहीही झाले नाही. हे प्रकरण हिंगणघाटच्या सत्र न्यायालयात पडून आहे. दोषारोपपत्र दाखल होऊन १८० दिवस झाले परंतू त्याची अद्याप सुनावणीही सुरू झालेली नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी