शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

सुभाषचंद्र बोस यांना अमेरिका, युरोपमध्ये मान्यता का नाही ? अनुज धर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 22:34 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तर देशासाठी प्रचंड त्याग केला. परंतु त्यांनादेखील युरोप व अमेरिकेत मान्यता का मिळू शकली नाही, असा प्रश्न प्रसिद्ध लेखक अनुज धर यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्दे‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील वातावरण हे पाश्चिमात्य धार्जिणे ठेवण्यावरच भर देण्यात आला. अमेरिका, युरोपमध्ये एखाद्या गोष्टीला मान्यता मिळत असेल तरच त्यासाठी पुढाकार घेण्याकडे राजकारण्यांचा कल होता. यातूनच देशातील अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या त्यागाकडे दुर्लक्ष करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तर देशासाठी प्रचंड त्याग केला. परंतु त्यांनादेखील युरोप व अमेरिकेत मान्यता का मिळू शकली नाही, असा प्रश्न प्रसिद्ध लेखक अनुज धर यांनी उपस्थित केला. नागपुरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.आजच्या काळात जर तरुण पिढीपर्यंत स्वातंत्र्यसेनानींचे योगदान पोहोचवायचे असेल तर सिनेमा हे सर्वोत्तम माध्यम आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी प्रचंड छळ सहन केला. मात्र त्यांचादेखील जाहीरपणे अपमान होतो. कुठल्याही स्वातंत्र्यसेनानीचा अशाप्रकारे अपमान करणे योग्य नाही.योगी आदित्यनाथांना नेताजींमध्ये रस नाहीअखिलेश यादव उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘गुमनामी बाबा’ यांच्याशी संबंधित साहित्य व जीवनावर प्रकाश टाकणारे संग्रहालय बनविण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बहुतेक नेताजींच्या जीवनामध्ये रस नाही. म्हणूनच त्यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावले उचललेली नाही, असे अनुज धर यांनी सांगितले.‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी असल्याचे पुरावेदरम्यान, अनुज धर यांनी गुरुवारी ‘मंथन’तर्फे आयोजित ‘इन्साईड सुभाष बोस मिस्ट्री’ या विषयावर व्याख्यान दिले. सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू तैपेईमध्ये विमान दुर्घटनेत झाला नव्हता. तर त्यानंतरही ते ‘गुमनामी बाबा’ बनून राहिले. ‘गुमनामी बाबा’ यांच्या निवासस्थानी मिळालेले पुरावे हेच स्पष्ट करणारे आहेत, असा दावा अनुज धर यांनी केला. सुभाषचंद्र बोस यांचे सत्य समोर यावे ही देशवासीयांची इच्छा होती. मात्र शासनकर्त्यांनी कधीच ही बाब मनावर घेतली नाही. पं.जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात नेताजींच्या कुटुंबीयांवर २० वर्षे पाळत ठेवण्यात आली होती व त्याचे पुरावेदेखील उपलब्ध आहेत. सरकारलादेखील बोस जिवंत असल्याची माहिती होती.‘गुमनामी बाबा’ हे अयोध्या, नीमसर, फैजाबाद, लखनौ व बस्ती येथे राहिले. ते भगवानजी म्हणून ओळखले जायचे व त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करणारे पत्र लिहीले होते. जर सरकारला नेताजींबाबत जाणून घेण्याची इच्छा होती तर ‘डीएनए’ चाचणीच्या माध्यमातूनदेखील ते शक्य होते. ‘गुमनामी बाबा’ व सुभाषचंद्र बोस यांचे हस्ताक्षर एकच असल्याचा निष्कर्ष ‘फॉरेन्सिक’ तज्ज्ञांनी दिला होता. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी माहिती अनुज धर यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन अंकिता देशकर यांनी केले तर रसिका जोशी यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोस