शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

सुभाषचंद्र बोस यांना अमेरिका, युरोपमध्ये मान्यता का नाही ? अनुज धर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 22:34 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तर देशासाठी प्रचंड त्याग केला. परंतु त्यांनादेखील युरोप व अमेरिकेत मान्यता का मिळू शकली नाही, असा प्रश्न प्रसिद्ध लेखक अनुज धर यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्दे‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील वातावरण हे पाश्चिमात्य धार्जिणे ठेवण्यावरच भर देण्यात आला. अमेरिका, युरोपमध्ये एखाद्या गोष्टीला मान्यता मिळत असेल तरच त्यासाठी पुढाकार घेण्याकडे राजकारण्यांचा कल होता. यातूनच देशातील अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या त्यागाकडे दुर्लक्ष करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तर देशासाठी प्रचंड त्याग केला. परंतु त्यांनादेखील युरोप व अमेरिकेत मान्यता का मिळू शकली नाही, असा प्रश्न प्रसिद्ध लेखक अनुज धर यांनी उपस्थित केला. नागपुरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.आजच्या काळात जर तरुण पिढीपर्यंत स्वातंत्र्यसेनानींचे योगदान पोहोचवायचे असेल तर सिनेमा हे सर्वोत्तम माध्यम आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी प्रचंड छळ सहन केला. मात्र त्यांचादेखील जाहीरपणे अपमान होतो. कुठल्याही स्वातंत्र्यसेनानीचा अशाप्रकारे अपमान करणे योग्य नाही.योगी आदित्यनाथांना नेताजींमध्ये रस नाहीअखिलेश यादव उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘गुमनामी बाबा’ यांच्याशी संबंधित साहित्य व जीवनावर प्रकाश टाकणारे संग्रहालय बनविण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बहुतेक नेताजींच्या जीवनामध्ये रस नाही. म्हणूनच त्यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावले उचललेली नाही, असे अनुज धर यांनी सांगितले.‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी असल्याचे पुरावेदरम्यान, अनुज धर यांनी गुरुवारी ‘मंथन’तर्फे आयोजित ‘इन्साईड सुभाष बोस मिस्ट्री’ या विषयावर व्याख्यान दिले. सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू तैपेईमध्ये विमान दुर्घटनेत झाला नव्हता. तर त्यानंतरही ते ‘गुमनामी बाबा’ बनून राहिले. ‘गुमनामी बाबा’ यांच्या निवासस्थानी मिळालेले पुरावे हेच स्पष्ट करणारे आहेत, असा दावा अनुज धर यांनी केला. सुभाषचंद्र बोस यांचे सत्य समोर यावे ही देशवासीयांची इच्छा होती. मात्र शासनकर्त्यांनी कधीच ही बाब मनावर घेतली नाही. पं.जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात नेताजींच्या कुटुंबीयांवर २० वर्षे पाळत ठेवण्यात आली होती व त्याचे पुरावेदेखील उपलब्ध आहेत. सरकारलादेखील बोस जिवंत असल्याची माहिती होती.‘गुमनामी बाबा’ हे अयोध्या, नीमसर, फैजाबाद, लखनौ व बस्ती येथे राहिले. ते भगवानजी म्हणून ओळखले जायचे व त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करणारे पत्र लिहीले होते. जर सरकारला नेताजींबाबत जाणून घेण्याची इच्छा होती तर ‘डीएनए’ चाचणीच्या माध्यमातूनदेखील ते शक्य होते. ‘गुमनामी बाबा’ व सुभाषचंद्र बोस यांचे हस्ताक्षर एकच असल्याचा निष्कर्ष ‘फॉरेन्सिक’ तज्ज्ञांनी दिला होता. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी माहिती अनुज धर यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन अंकिता देशकर यांनी केले तर रसिका जोशी यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोस