शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

आदिवासी क्षेत्रांसाठी वैद्यकीय तज्ज्ञ का मिळत नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:03 IST

आपल्या देशात ११ कोटींहून अधिक वनवासी व आदिवासी नागरिक आहेत. आदिवासी क्षेत्रांत आरोग्य, शिक्षणाची समस्या आहे व तेथे वैद्यकीय तज्ज्ञांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. परंतु आदिवासी क्षेत्रांसाठी वैद्यकीय तज्ज्ञ का मिळत नाही, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी उपस्थित केला. संघाच्या अजनी विभागातर्फे ‘सेवादर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देभय्याजी जोशींचा सवाल : संघाच्या अजनी विभागाचा सेवादर्शन कार्यक्रम संपन्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशात ११ कोटींहून अधिक वनवासी व आदिवासी नागरिक आहेत. आदिवासी क्षेत्रांत आरोग्य, शिक्षणाची समस्या आहे व तेथे वैद्यकीय तज्ज्ञांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. परंतु आदिवासी क्षेत्रांसाठी वैद्यकीय तज्ज्ञ का मिळत नाही, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी उपस्थित केला. संघाच्या अजनी विभागातर्फे ‘सेवादर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.तुकाराम सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमाला संघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे, लोककल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, अजनी भाग संघचालक सुभाष देशकर प्रामुख्याने उपस्थित होते. आदिवासी क्षेत्रांसाठी वैद्यकीय तर नियुक्त करण्यात येतात, मात्र ते तेथे जातच नाहीत. एकाच दिवशी जाऊनमहिनाभराच्या सह्या मारण्याचे प्रकारदेखील दिसून येतात. शिक्षण क्षेत्रातदेखील अशीच अवस्था आहे. शाळा आहेत, पण शिक्षण नाही, असे चित्र आहे. समाजातील भटके लोक, गरीब, आदिवासी, अस्पृश्य यांच्या सेवेसाठी काम करण्याची आवश्यकता आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना पैशाची कमतरता भासत नाही, मात्र काम करणाºयांची जास्त प्रमाणात गरज आहे. लोककल्याण समिती हा मार्ग मिळवून देते, असे प्रतिपादन भय्याजी जोशी यांनी केले. वीरेंद्र मल्होत्रा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अजनी भागात चालणारे विविध सेवाप्रकल्प, सेवाव्रती तसेच वैद्यकीय तज्ज्ञांचे काम तसेच ज्यांना या कार्यामुळे लाभ झाला, अशा विविध लोकांनी आपले मनोगत मांडले तर लहान मुलांनी जनजागृतीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. सुजाता सरागे आणि वैशाली बोबडे यांनी संचालन केले.सेवेचे विषय भाषणाचा नाहीयावेळी भय्याजी जोशी यांनी सेवा नेमकी कशी करावी, यावर प्रकाश टाकला. भाषणे देणे किंवा कथा सांगणे हा सेवेचा विषय नाही. सेवा करताना अडचणीतून जाण्याची तयारी हवी. सेवा म्हणजे निधी गोळा करण्याचादेखील विषय नाही. ज्यांच्यासाठी काम करायचे आहे, त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. असे केले तरच कामाचा आनंद मिळेल, निराशा येणार नाही व आपुलकीतूनच परिवर्तन घडल्याचे दिसून येईल, असे मत भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर