शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी क्षेत्रांसाठी वैद्यकीय तज्ज्ञ का मिळत नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:03 IST

आपल्या देशात ११ कोटींहून अधिक वनवासी व आदिवासी नागरिक आहेत. आदिवासी क्षेत्रांत आरोग्य, शिक्षणाची समस्या आहे व तेथे वैद्यकीय तज्ज्ञांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. परंतु आदिवासी क्षेत्रांसाठी वैद्यकीय तज्ज्ञ का मिळत नाही, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी उपस्थित केला. संघाच्या अजनी विभागातर्फे ‘सेवादर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देभय्याजी जोशींचा सवाल : संघाच्या अजनी विभागाचा सेवादर्शन कार्यक्रम संपन्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशात ११ कोटींहून अधिक वनवासी व आदिवासी नागरिक आहेत. आदिवासी क्षेत्रांत आरोग्य, शिक्षणाची समस्या आहे व तेथे वैद्यकीय तज्ज्ञांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. परंतु आदिवासी क्षेत्रांसाठी वैद्यकीय तज्ज्ञ का मिळत नाही, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी उपस्थित केला. संघाच्या अजनी विभागातर्फे ‘सेवादर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.तुकाराम सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमाला संघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे, लोककल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, अजनी भाग संघचालक सुभाष देशकर प्रामुख्याने उपस्थित होते. आदिवासी क्षेत्रांसाठी वैद्यकीय तर नियुक्त करण्यात येतात, मात्र ते तेथे जातच नाहीत. एकाच दिवशी जाऊनमहिनाभराच्या सह्या मारण्याचे प्रकारदेखील दिसून येतात. शिक्षण क्षेत्रातदेखील अशीच अवस्था आहे. शाळा आहेत, पण शिक्षण नाही, असे चित्र आहे. समाजातील भटके लोक, गरीब, आदिवासी, अस्पृश्य यांच्या सेवेसाठी काम करण्याची आवश्यकता आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना पैशाची कमतरता भासत नाही, मात्र काम करणाºयांची जास्त प्रमाणात गरज आहे. लोककल्याण समिती हा मार्ग मिळवून देते, असे प्रतिपादन भय्याजी जोशी यांनी केले. वीरेंद्र मल्होत्रा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अजनी भागात चालणारे विविध सेवाप्रकल्प, सेवाव्रती तसेच वैद्यकीय तज्ज्ञांचे काम तसेच ज्यांना या कार्यामुळे लाभ झाला, अशा विविध लोकांनी आपले मनोगत मांडले तर लहान मुलांनी जनजागृतीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. सुजाता सरागे आणि वैशाली बोबडे यांनी संचालन केले.सेवेचे विषय भाषणाचा नाहीयावेळी भय्याजी जोशी यांनी सेवा नेमकी कशी करावी, यावर प्रकाश टाकला. भाषणे देणे किंवा कथा सांगणे हा सेवेचा विषय नाही. सेवा करताना अडचणीतून जाण्याची तयारी हवी. सेवा म्हणजे निधी गोळा करण्याचादेखील विषय नाही. ज्यांच्यासाठी काम करायचे आहे, त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. असे केले तरच कामाचा आनंद मिळेल, निराशा येणार नाही व आपुलकीतूनच परिवर्तन घडल्याचे दिसून येईल, असे मत भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर