शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

आदिवासी क्षेत्रांसाठी वैद्यकीय तज्ज्ञ का मिळत नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:03 IST

आपल्या देशात ११ कोटींहून अधिक वनवासी व आदिवासी नागरिक आहेत. आदिवासी क्षेत्रांत आरोग्य, शिक्षणाची समस्या आहे व तेथे वैद्यकीय तज्ज्ञांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. परंतु आदिवासी क्षेत्रांसाठी वैद्यकीय तज्ज्ञ का मिळत नाही, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी उपस्थित केला. संघाच्या अजनी विभागातर्फे ‘सेवादर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देभय्याजी जोशींचा सवाल : संघाच्या अजनी विभागाचा सेवादर्शन कार्यक्रम संपन्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशात ११ कोटींहून अधिक वनवासी व आदिवासी नागरिक आहेत. आदिवासी क्षेत्रांत आरोग्य, शिक्षणाची समस्या आहे व तेथे वैद्यकीय तज्ज्ञांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. परंतु आदिवासी क्षेत्रांसाठी वैद्यकीय तज्ज्ञ का मिळत नाही, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी उपस्थित केला. संघाच्या अजनी विभागातर्फे ‘सेवादर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.तुकाराम सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमाला संघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे, लोककल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, अजनी भाग संघचालक सुभाष देशकर प्रामुख्याने उपस्थित होते. आदिवासी क्षेत्रांसाठी वैद्यकीय तर नियुक्त करण्यात येतात, मात्र ते तेथे जातच नाहीत. एकाच दिवशी जाऊनमहिनाभराच्या सह्या मारण्याचे प्रकारदेखील दिसून येतात. शिक्षण क्षेत्रातदेखील अशीच अवस्था आहे. शाळा आहेत, पण शिक्षण नाही, असे चित्र आहे. समाजातील भटके लोक, गरीब, आदिवासी, अस्पृश्य यांच्या सेवेसाठी काम करण्याची आवश्यकता आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना पैशाची कमतरता भासत नाही, मात्र काम करणाºयांची जास्त प्रमाणात गरज आहे. लोककल्याण समिती हा मार्ग मिळवून देते, असे प्रतिपादन भय्याजी जोशी यांनी केले. वीरेंद्र मल्होत्रा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अजनी भागात चालणारे विविध सेवाप्रकल्प, सेवाव्रती तसेच वैद्यकीय तज्ज्ञांचे काम तसेच ज्यांना या कार्यामुळे लाभ झाला, अशा विविध लोकांनी आपले मनोगत मांडले तर लहान मुलांनी जनजागृतीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. सुजाता सरागे आणि वैशाली बोबडे यांनी संचालन केले.सेवेचे विषय भाषणाचा नाहीयावेळी भय्याजी जोशी यांनी सेवा नेमकी कशी करावी, यावर प्रकाश टाकला. भाषणे देणे किंवा कथा सांगणे हा सेवेचा विषय नाही. सेवा करताना अडचणीतून जाण्याची तयारी हवी. सेवा म्हणजे निधी गोळा करण्याचादेखील विषय नाही. ज्यांच्यासाठी काम करायचे आहे, त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. असे केले तरच कामाचा आनंद मिळेल, निराशा येणार नाही व आपुलकीतूनच परिवर्तन घडल्याचे दिसून येईल, असे मत भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर