शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

केंद्र सरकारच्या 'अभिजात मराठी' योजनेला राज्याकडून पैसा का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:27 IST

मराठीजनांना दिलेला खुळखुळा तर नाही : श्रीपाद जोशी यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात 'अभिजात भाषा उपक्रम' शीर्षकाने महाराष्ट्र सरकार काय करणार याची प्रसिद्धी चालवली आहे. यावरून केंद्र सरकारची ही योजना असून, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाशी याचा काय संबंध, असा सवाल मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे प्रमुख संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे. यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्राने मराठीला दिलेला अभिजात दर्जा हा केवळ खुळखुळा होता काय, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

श्रीपाद जोशी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री तसेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांना याबाबत पत्र लिहून विचारणा केली आहे. अभिजात मराठी भाषा संशोधन केंद्र स्थापन करण्याची तरतूद ही केंद्राच्या योजनेचा भाग आहे, केंद्राने त्यासाठी निधी दिला आहे का, नसल्यास तो खर्च केंद्राच्या वतीने महाराष्ट्र सरकार स्वतःच कसा काय करू शकणार, मग केंद्र मराठीला अभिजात दर्जा देऊन नेमके करणार काय आहे, असे प्रश्न त्यांनी या पत्रात उपस्थित केले आहेत. अभिजात मराठीच्या विकासासंबंधीची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात हवी, महाराष्ट्रातील अर्थसंकल्पाशी त्याचा काहीच संबंध नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

केंद्राकडून मिळत नाही उत्तर

  • डॉ. जोशी यांनी केंद्राच्या संस्कृती मंत्रालयाला २४ ऑक्टोबरला पत्र पाठवून शासन निर्णय मागितला. त्यानंतर पाच स्मरणपत्रे केंद्रीय मंत्र्यांना पाठविली. मात्र, केंद्राकडून कुठलेच उत्तर मिळाले नाही.
  • केंद्राच्या या योजनेचे लाभ विशद करणाऱ्या शासन निर्णयाची प्रतही अद्याप ना महाराष्ट्र सरकारकडे आहे, ना केंद्राकडे. कागदावर नुसतेच अभिजात भाषा उपक्रम करणार, अभिजात भाषा सप्ताह साजरा करणार, संशोधन केंद्र स्थापन करणार, पारितोषिके देणार हे नुसते लिहून काय होणार आहे, असा सवाल त्यांनी केला.

राज्य सरकार करते केंद्राचा बचाव

  • संघटनेने प्रचंड पाठपुरावा केल्यानंतर केंद्राने ४ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय राजपत्रातील दर्जा मिळाल्याच्या निर्णयाची सूचना तेवढी उपलब्ध झाली.
  • अभिजात दर्जा दिला त्याचे कोणतेच लाभ स्पष्ट करणारा शासन निर्णय केंद्राकडून मिळत नाही.
  • महाराष्ट्र सरकारच मग केंद्राचा बचाव करण्यासाठी आपल्या अर्थसंकल्पात ही संदिग्धता व भ्रम का निर्माण करते आहे, असा सवाल डॉ. जोशी यांनी उपस्थित केला.

"अभिजात दर्जा योजनेचा खर्च महाराष्ट्र सरकारने करण्याचे कोणतेच कारण नाही. केंद्राची योजना आहे. त्याचे लाभ केंद्रानेच द्यायला हवे. महाराष्ट्र सरकारने ते मागायला हवेत."- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळ.

टॅग्स :nagpurनागपूरmarathiमराठी