शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या 'अभिजात मराठी' योजनेला राज्याकडून पैसा का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:27 IST

मराठीजनांना दिलेला खुळखुळा तर नाही : श्रीपाद जोशी यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात 'अभिजात भाषा उपक्रम' शीर्षकाने महाराष्ट्र सरकार काय करणार याची प्रसिद्धी चालवली आहे. यावरून केंद्र सरकारची ही योजना असून, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाशी याचा काय संबंध, असा सवाल मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे प्रमुख संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे. यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्राने मराठीला दिलेला अभिजात दर्जा हा केवळ खुळखुळा होता काय, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

श्रीपाद जोशी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री तसेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांना याबाबत पत्र लिहून विचारणा केली आहे. अभिजात मराठी भाषा संशोधन केंद्र स्थापन करण्याची तरतूद ही केंद्राच्या योजनेचा भाग आहे, केंद्राने त्यासाठी निधी दिला आहे का, नसल्यास तो खर्च केंद्राच्या वतीने महाराष्ट्र सरकार स्वतःच कसा काय करू शकणार, मग केंद्र मराठीला अभिजात दर्जा देऊन नेमके करणार काय आहे, असे प्रश्न त्यांनी या पत्रात उपस्थित केले आहेत. अभिजात मराठीच्या विकासासंबंधीची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात हवी, महाराष्ट्रातील अर्थसंकल्पाशी त्याचा काहीच संबंध नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

केंद्राकडून मिळत नाही उत्तर

  • डॉ. जोशी यांनी केंद्राच्या संस्कृती मंत्रालयाला २४ ऑक्टोबरला पत्र पाठवून शासन निर्णय मागितला. त्यानंतर पाच स्मरणपत्रे केंद्रीय मंत्र्यांना पाठविली. मात्र, केंद्राकडून कुठलेच उत्तर मिळाले नाही.
  • केंद्राच्या या योजनेचे लाभ विशद करणाऱ्या शासन निर्णयाची प्रतही अद्याप ना महाराष्ट्र सरकारकडे आहे, ना केंद्राकडे. कागदावर नुसतेच अभिजात भाषा उपक्रम करणार, अभिजात भाषा सप्ताह साजरा करणार, संशोधन केंद्र स्थापन करणार, पारितोषिके देणार हे नुसते लिहून काय होणार आहे, असा सवाल त्यांनी केला.

राज्य सरकार करते केंद्राचा बचाव

  • संघटनेने प्रचंड पाठपुरावा केल्यानंतर केंद्राने ४ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय राजपत्रातील दर्जा मिळाल्याच्या निर्णयाची सूचना तेवढी उपलब्ध झाली.
  • अभिजात दर्जा दिला त्याचे कोणतेच लाभ स्पष्ट करणारा शासन निर्णय केंद्राकडून मिळत नाही.
  • महाराष्ट्र सरकारच मग केंद्राचा बचाव करण्यासाठी आपल्या अर्थसंकल्पात ही संदिग्धता व भ्रम का निर्माण करते आहे, असा सवाल डॉ. जोशी यांनी उपस्थित केला.

"अभिजात दर्जा योजनेचा खर्च महाराष्ट्र सरकारने करण्याचे कोणतेच कारण नाही. केंद्राची योजना आहे. त्याचे लाभ केंद्रानेच द्यायला हवे. महाराष्ट्र सरकारने ते मागायला हवेत."- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळ.

टॅग्स :nagpurनागपूरmarathiमराठी