शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

कापसाचे उत्पादन घटूनही दर दबावातच का?

By सुनील चरपे | Updated: April 24, 2023 16:37 IST

सरकीचे दर उतरले : आयात वाढविण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव

सुनील चरपे

नागपूर : चालू आठवड्यात कापसाचे दर प्रति क्विंटल ४५० ते ५०० रुपयांनी तर सरकीचे दर प्रति क्विंटल २०० रुपयांनी उरतले आहेत. चालू हंगामात देशभरातील कापसाचे उत्पादन घटत असल्याचा अंदाज तीन महत्त्वाच्या संस्थांनी व्यक्त केला आहे. कापसाची दरवाढ अपेक्षित असताना कमी उत्पादनाचे भांडवल करून कापड उद्याेग कापसाची आयात वाढविण्यासाठी तसेच कापसावरील ११ टक्के आयात शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या प्रतिक्रिया बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.

‘काॅटन असाेसिएशन ऑफ इंडिया’ने ३७५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला हाेता. हा अंदाज ३२१.५० लाख गाठींवरून घटवून ३०३ लाख गाठींवर आणला आहे. ‘युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अमेरिका’ने त्यांचा कापूस उत्पादन अंदाज ३६२ लाख गाठींवरून नंतर ३३९ लाख गाठी आणि आता ३१३ लाख गाठींवर तर ‘कमिटी ऑफ काॅटन प्राॅडक्शन ॲण्ड कन्झमशन’ने त्यांचा अंदाज ३६५ लाख गाठींवरून ३३७ लाख गाठींवर आणला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात दाेन महिन्यांपासून रुईचे दर ९६ ते ९९ सेंट प्रति पाउंड दरम्यान स्थिर आहेत. भारतात मध्यंतरी सरकीचे दर प्रति क्विंटल ३,३०० रुपयांवर गेल्याने कापसाच्या दराने आठ हजार रुपयांवर मजल मारली हाेती. हे दर २०० ते ३०० रुपयांनी कमी झाल्याने कापसाचे दर परत आठ हजार रुपये प्रति क्विंटलवरून ७,६०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. येत्या महिनाभरात सरकीच्या दरात तेजी येण्याची शक्यता कमी असल्याची माहिती विजय निवल यांच्यासह अन्य जिनिंग-प्रेसिंग मालकांनी दिली. सूत आणि कापडाची मागणी घटल्याने कापसाचे दर दबावात आल्याची माहिती कापड उद्याेजकांनी दिली.

३६.३९ लाख गाठींनी आवक घटली

या हंगामात देशांतर्गत बाजारातील कापसाची आवक ३६.३९ लाख गाठींनी घटली आहे. १ ऑक्टाेबर २०२१ ते १९ एप्रिल २०२२ या काळात देशभरात २५१.५९ लाख गाठी कापूस बाजारात आला हाेता. या हंगामात १ ऑक्टाेबर २०२२ ते १९ एप्रिल २०२३ या काळात २१५.२० लाख गाठी कापूस बाजारात आला.निर्यातीऐवजी आयातीवर भर

सन २०२१-२२ च्या हंगामात भारताने ४८ लाख गाठी कापसाची निर्यात केली हाेती. सन २०२२-२३ च्या हंगामात आजवर किमान २० लाख गाठी कापूस निर्यातीचे साैदे झाले नाहीत. किमान ५० लाख गाठी कापूस निर्यात झाला असता दर आणखी वधारले असते. मात्र, कापसाचे उत्पादन घटत असल्याचे दाखवून आधीच १५ लाख गाठी कापसाची आयात करून दर दबावात आणले आहे. आता कापड उद्याेजक कापसावरील ११ टक्के आयात शुल्क हटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

सध्या अडचणीचा काळ असल्याचे दरवाढीची चिन्हे दिसत नाही. या महिन्यात कापसाची आवक वाढली तर दर कमी हाेतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी न घाबरता मेच्या दुसऱ्या आठवड्यानंतर कापूस विक्रीचे नियाेजन करावे.

- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक, कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य.

बाजारात कापसाची आवक वाढली तर दर कमी हाेणार आहेत. दर खाली येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी बाजारातील कापसाची आवक स्थिर ठेवावी.

- दिलीप ठाकरे, सदस्य, एमसीएक्स-पीएसी (काॅटन).

कापसाची आयात करता यावी, यासाठी कापूस उत्पादन घटल्याची आकडेमाेड केली जात आहे. यातून केंद्र सरकारवर दबाव निर्माण करून आयात शुल्क शून्य करण्याचे प्रयत्न केले जात आहे. खरं तर सरकारने कापसाची निर्यात वाढवायला हवी.

- विजय जावंधिया, शेतकरी नेते.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती