शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

पीक विम्याची रक्कम अत्यल्प का? शेतकऱ्यांचा संतापजनक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 18:29 IST

यंत्रणेत समन्वयाचा अभाव : उमरेड येथील पीक विमा कार्यालयात एकच कर्मचारी ; याठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कउमरेड : पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती होण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अत्यल्प मिळत असल्याने संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबतच्या तक्रारीही शेतकरी करीत असून, संबंधित यंत्रणेच्या निष्काळजी आणि दुर्लक्षितपणाचा फटका कष्टकऱ्यांना सोसावा लागत असल्याचा आरोप केला जात आहे. 

मागील खरीप हंगामात केवळ एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला. दुसरीकडे निसर्गाच्या असमतोलपणाचा जोरदार फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसल्याने अनेकांच्या उत्पादनात कमालीची झाली. निसर्गाच्या घट लहरीपणामुळे सोयाबीनचा दाणा बारीक झाला. शिवाय कपाशीचेही उत्पादन घटले. दोन्ही पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे याबाबतच्या तक्रारी केल्या. कृषी विभागापर्यंतसुद्धा शेतकरी पोहोचले.

उमरेड तालुक्यातील सोनपुरी येथील राहुल भगवान तागडे यांनी १.६५ हेक्टर आर जमिनीचा विमा केला होता. त्यांनी नुकसानीची भरपाईची संपूर्ण प्रक्रिया आटोपली. सर्वेक्षणही करण्यात आले. त्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम केवळ ३,९९९ रुपये आली. झालेल्या नुकसानीची भरपाई मला मान्य नाही. विमा कंपनीने कष्टकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप राहुल तागडे यांनी केला आहे. राहुल यांचे वडील भगवान तागडे यांनीही १ हेक्टर आर क्षेत्रात सोयाबीन पिकाचा विमा काढला. प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या खात्यात केवळ एक हजार रुपये आले. कुठल्या आधारावर ही तुटपुंजी मदत दिल्या गेली, असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

तालुका कृषी कार्यालयाकडे याबाबतची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. आमच्यावर अन्याय झाला असून, चौकशी करण्यात यावी. योग्य भरपाई मिळावी, अन्यथा उपोषणावर बसण्याचा इशारा राहुल तागडे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्याकडेही तक्रारीचे निवेदन दिल्या गेले.

समन्वयाचा अभाव

  • प्रस्तुत प्रतिनिधीने पीक विम्याच्या नुकसान भरपाईबाबतची आकडेवारी विचारण्यासाठी स्थानिक पीक विम्याचे कार्यालय गाठले. संबंधित कर्मचाऱ्याने माहिती उपलब्ध नसल्याचे कारण सांगत वरिष्ठांना विचारा असे म्हणत टाळले.
  • जिल्हा स्तरावर पीक विम्याचे कर्मचारी राहुल सानसे यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनीही टोलटोलवीची उत्तरे देत कृषी विभागाला विचारा असे म्हणत अधिक बोलण्याचे टाळले. तालुका कृषी कार्यालयाचे कृषी पर्यवेक्षक (सांख्यिकी विभाग) विजय गाणार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी पीक विमा कंपनीकडे बोट दाखवत आमच्याकडे आकडेवारी नसल्याचे सांगितले.
  • एकूणच पीक विमा कंपनीचे 3 कार्यालय आणि कृषी विभागाचे अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप राहुल तागडे यांनी केला आहे. सर्वेक्षणाचे कामही थातूरमातूर केल्या गेल्यानेच ही समस्या उ‌द्भवली, असाही आरोप त्याने केला.

८६२ रुपये आले हो...उमरेड तालुक्यातील सोनपुरी येथीलच विलास ठाकरे यांची १६ एकर शेती आहे. त्यांनी ०.८० हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड केली. प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या खात्यातही केवळ ८६२ रुपये वळती झालेत. १.४५ हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसान भरपाई स्वरूपात केवळ ३ हजार रुपये मिळाले. 

"पीक विमा कार्यालयात शेतकरी गेल्यावर त्यांचे समाधान होत नाही. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही मिळत नाहीत. शिवाय अनेकदा हे कार्यालय बंदसुद्धा असते. सर्वेक्षणाचे कामही थातूरमातूर केल्या गेले. अनेक शेतात संबंधित विभागाचे कर्मचारीही ऑन दि स्पॉट गेलेच नाहीत."- राहुल तागडे, शेतकरी, सोनपुरी, ता. उमरेड

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाfarmingशेतीFarmerशेतकरी