शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

पीक विम्याची रक्कम अत्यल्प का? शेतकऱ्यांचा संतापजनक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 18:29 IST

यंत्रणेत समन्वयाचा अभाव : उमरेड येथील पीक विमा कार्यालयात एकच कर्मचारी ; याठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कउमरेड : पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती होण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अत्यल्प मिळत असल्याने संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबतच्या तक्रारीही शेतकरी करीत असून, संबंधित यंत्रणेच्या निष्काळजी आणि दुर्लक्षितपणाचा फटका कष्टकऱ्यांना सोसावा लागत असल्याचा आरोप केला जात आहे. 

मागील खरीप हंगामात केवळ एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला. दुसरीकडे निसर्गाच्या असमतोलपणाचा जोरदार फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसल्याने अनेकांच्या उत्पादनात कमालीची झाली. निसर्गाच्या घट लहरीपणामुळे सोयाबीनचा दाणा बारीक झाला. शिवाय कपाशीचेही उत्पादन घटले. दोन्ही पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे याबाबतच्या तक्रारी केल्या. कृषी विभागापर्यंतसुद्धा शेतकरी पोहोचले.

उमरेड तालुक्यातील सोनपुरी येथील राहुल भगवान तागडे यांनी १.६५ हेक्टर आर जमिनीचा विमा केला होता. त्यांनी नुकसानीची भरपाईची संपूर्ण प्रक्रिया आटोपली. सर्वेक्षणही करण्यात आले. त्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम केवळ ३,९९९ रुपये आली. झालेल्या नुकसानीची भरपाई मला मान्य नाही. विमा कंपनीने कष्टकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप राहुल तागडे यांनी केला आहे. राहुल यांचे वडील भगवान तागडे यांनीही १ हेक्टर आर क्षेत्रात सोयाबीन पिकाचा विमा काढला. प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या खात्यात केवळ एक हजार रुपये आले. कुठल्या आधारावर ही तुटपुंजी मदत दिल्या गेली, असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

तालुका कृषी कार्यालयाकडे याबाबतची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. आमच्यावर अन्याय झाला असून, चौकशी करण्यात यावी. योग्य भरपाई मिळावी, अन्यथा उपोषणावर बसण्याचा इशारा राहुल तागडे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्याकडेही तक्रारीचे निवेदन दिल्या गेले.

समन्वयाचा अभाव

  • प्रस्तुत प्रतिनिधीने पीक विम्याच्या नुकसान भरपाईबाबतची आकडेवारी विचारण्यासाठी स्थानिक पीक विम्याचे कार्यालय गाठले. संबंधित कर्मचाऱ्याने माहिती उपलब्ध नसल्याचे कारण सांगत वरिष्ठांना विचारा असे म्हणत टाळले.
  • जिल्हा स्तरावर पीक विम्याचे कर्मचारी राहुल सानसे यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनीही टोलटोलवीची उत्तरे देत कृषी विभागाला विचारा असे म्हणत अधिक बोलण्याचे टाळले. तालुका कृषी कार्यालयाचे कृषी पर्यवेक्षक (सांख्यिकी विभाग) विजय गाणार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी पीक विमा कंपनीकडे बोट दाखवत आमच्याकडे आकडेवारी नसल्याचे सांगितले.
  • एकूणच पीक विमा कंपनीचे 3 कार्यालय आणि कृषी विभागाचे अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप राहुल तागडे यांनी केला आहे. सर्वेक्षणाचे कामही थातूरमातूर केल्या गेल्यानेच ही समस्या उ‌द्भवली, असाही आरोप त्याने केला.

८६२ रुपये आले हो...उमरेड तालुक्यातील सोनपुरी येथीलच विलास ठाकरे यांची १६ एकर शेती आहे. त्यांनी ०.८० हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड केली. प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या खात्यातही केवळ ८६२ रुपये वळती झालेत. १.४५ हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसान भरपाई स्वरूपात केवळ ३ हजार रुपये मिळाले. 

"पीक विमा कार्यालयात शेतकरी गेल्यावर त्यांचे समाधान होत नाही. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही मिळत नाहीत. शिवाय अनेकदा हे कार्यालय बंदसुद्धा असते. सर्वेक्षणाचे कामही थातूरमातूर केल्या गेले. अनेक शेतात संबंधित विभागाचे कर्मचारीही ऑन दि स्पॉट गेलेच नाहीत."- राहुल तागडे, शेतकरी, सोनपुरी, ता. उमरेड

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाfarmingशेतीFarmerशेतकरी