शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांकडे का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2023 21:40 IST

Nagpur News बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापनच बौद्धांच्या हाती का नाही? असा सवाल बुद्धगया महाबोधी महाविहारमुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत आनंद महास्थवीर यांनी येथे केला.

ठळक मुद्दे दीक्षाभूमीवर संघयान संकल्प परिषद

नागपूर : प्रत्येक धर्मातील त्यांच्या सर्वोच्च प्रार्थनास्थळाचे व्यवस्थापन हे त्या-त्या धर्माच्या लोकांच्याच हातात असते. असायलाच हवे. मग बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापनच बौद्धांच्या हाती का नाही? असा सवाल बुद्धगया महाबोधी महाविहारमुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत आनंद महास्थवीर यांनी येथे केला.

संघयान संकल्प परिषद आयोजन समितीच्या वतीने दीक्षाभूमीवर २६ जानेवारीपासून तीनदिवसीय संघयान संकल्प परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले असता, पत्रकारांशी बोलत होते. भदंत आनंद महास्थवीर यांनी सांगितले की, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा ऐन भरात आला असता, आंदोलनातीलच काही लोकांनी हे आंदोलन कमजोर केले. त्यामुळे हे आंदोलन पुन्हा गतिशील करायचे आहे. परंतु, यात सर्वसामान्य बौद्ध समाजबांधव सहभागी होत नाहीत, तोपर्यंत याला गती येणार नाही. यासोबतच भिक्खू संघालाही संघटित होण्याची गरज आहे, यासाठीच ही संघयान संकल्प परिषद बोलावण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे, देशात एकच भिक्खू संघ असावा, तसेच १९५६ च्या धम्मक्रांतीच्या महत्त्वावर चर्चा केली जाईल. यात अनेक ठरावसुद्धा मंजूर केले जातील. यात देशभरातील भिक्खू आणि विचारवंत सहभागी होतील. यावेळी मुख्य आयोजक भदंत हर्षबोधी महास्थवीर आणि मुख्य संयोजक भय्याजी खैरकर उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक