शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
2
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
3
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
7
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
8
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
9
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
10
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
11
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
12
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
13
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
14
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
15
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
16
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
17
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
18
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
19
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
20
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण

महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांकडे का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2023 21:40 IST

Nagpur News बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापनच बौद्धांच्या हाती का नाही? असा सवाल बुद्धगया महाबोधी महाविहारमुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत आनंद महास्थवीर यांनी येथे केला.

ठळक मुद्दे दीक्षाभूमीवर संघयान संकल्प परिषद

नागपूर : प्रत्येक धर्मातील त्यांच्या सर्वोच्च प्रार्थनास्थळाचे व्यवस्थापन हे त्या-त्या धर्माच्या लोकांच्याच हातात असते. असायलाच हवे. मग बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापनच बौद्धांच्या हाती का नाही? असा सवाल बुद्धगया महाबोधी महाविहारमुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत आनंद महास्थवीर यांनी येथे केला.

संघयान संकल्प परिषद आयोजन समितीच्या वतीने दीक्षाभूमीवर २६ जानेवारीपासून तीनदिवसीय संघयान संकल्प परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले असता, पत्रकारांशी बोलत होते. भदंत आनंद महास्थवीर यांनी सांगितले की, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा ऐन भरात आला असता, आंदोलनातीलच काही लोकांनी हे आंदोलन कमजोर केले. त्यामुळे हे आंदोलन पुन्हा गतिशील करायचे आहे. परंतु, यात सर्वसामान्य बौद्ध समाजबांधव सहभागी होत नाहीत, तोपर्यंत याला गती येणार नाही. यासोबतच भिक्खू संघालाही संघटित होण्याची गरज आहे, यासाठीच ही संघयान संकल्प परिषद बोलावण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे, देशात एकच भिक्खू संघ असावा, तसेच १९५६ च्या धम्मक्रांतीच्या महत्त्वावर चर्चा केली जाईल. यात अनेक ठरावसुद्धा मंजूर केले जातील. यात देशभरातील भिक्खू आणि विचारवंत सहभागी होतील. यावेळी मुख्य आयोजक भदंत हर्षबोधी महास्थवीर आणि मुख्य संयोजक भय्याजी खैरकर उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक