शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात का आवळला जातोय 'बोलीभाषे'चा गळा ? 'युनेस्को'च्या अहवालाने धक्कादायक वास्तव समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 12:55 IST

Nagpur : मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळाल्याने राज्याचा गौरव वाढला असला तरी 'युनेस्को'च्या ताज्या अहवालाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणातील आणखी काही गंभीर उणिवा चव्हाट्यावर आणल्या आहेत.

बालाजी देवर्जनकर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळाल्याने राज्याचा गौरव वाढला असला तरी 'युनेस्को'च्या ताज्या अहवालाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणातील आणखी काही गंभीर उणिवा चव्हाट्यावर आणल्या आहेत. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि ओडिशासारखी राज्ये आपल्या मातृभाषेचे जतन करण्यासाठी शिक्षणात जे प्रयोग करत आहेत, त्या तुलनेत महाराष्ट्रात मात्र अभिजात मराठी आणि स्थानिक बोली यांच्यातील दरी रुंदावत चालली आहे. यावर अहवालाने नेमके बोट ठेवले आहे.

अहवालात ओडिशा राज्याचा विशेष गौरव करण्यात आला आहे. ओडिशाने २१ आदिवासी बोलीभाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार केली आहेत. तिथे मुलांना बोलीभाषेतूनच प्राथमिक शिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातही ६० हून अधिक समृद्ध बोलीभाषा श्वास घेत आहेत. सध्या देशात मराठीसह ११ भाषांना अभिजात दर्जा आहे. मात्र, युनेस्कोच्या मते, मूल्यमापन मात्र आजही प्रमाण भाषेतनच होते. 

धोरण चकाचक, अंमलबजावणी पोकळ !

मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याच्या उत्सवात मश्गूल असलेल्या धोरणकर्त्यांना युनेस्कोने आरसाच दाखवला आहे. राज्यात निर्माण झालेली डिजिटल विषमता भयंकर असून, डिजिटल साधनांमध्ये स्थानिक बोलींचा समावेश नसल्याने ७० टक्के ग्रामीण विद्यार्थी मुख्य प्रवाहाच्या मागे फेकले गेले आहेत. तामिळनाडू आणि कर्नाटकसारखी राज्ये आपल्या शिक्षकांना बोलीभाषेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देत असताना महाराष्ट्र मात्र शिक्षकांना या भाषिक युद्धात कोणत्याही प्रशिक्षणाविना उतरवत आहे.

तंत्रज्ञानाचा 'सावत्र' व्यवहार

निपुण' कार्यक्रमांतर्गत मुलांना त्यांच्या बोलीभाषेसह स्वीकारणे किती आवश्यक आहे, हे यंत्रणेला समजले असले तरी अंमलबजावणीत मोठा अडथळा आहे. या चाचण्या मोबाइल अॅपवर होतात. मुले भाषा आणि गणिताची उत्तरे त्यांच्या स्थानिक बोलीतील उच्चारणांनुसार देतात; मात्र अॅपला केवळ प्रमाण मराठीत उत्तर अपेक्षित असल्याने उत्तर योग्य असूनही 'अल्गोरिदम' त्यांना चूक ठरवते.महाराष्ट्रात वन्हाडी, खानदेशी, मराठवाडी, कोल्हापुरी, पुणेरी, नागपुरी अशा वैविध्यपूर्ण बोली आहेत. पोटबोलींची संख्या तीनशेवर आहे. बोलीभाषेचे इतके वैविध्य देशात इतरत्र कुठेही नाही. दुर्दैवाने, महाराष्ट्रातच बोलींशी असा सावत्र व्यवहार सुरू आहे.

काय बदल हवे आहेत?

शाळांच्या पाट्या मराठीत करून किंवा कागदी परिपत्रके काढून मातृभाषा धोरण यशस्वी होणार नाही. त्यासाठी 'लोकल टू ग्लोबल' संकल्पना राबविण्यासाठी पाठ्यपुस्तकांत स्थानिक संदर्भआणि बोलीभाषेतील शब्दांचा सन्मानाने समावेश हवा. प्राथमिक स्तरावर मुलांच्या स्वतःच्या भाषेत उत्तर देण्याचे स्वातंत्र्य असावे. ओडिशाच्या धर्तीवर राज्यात भाषिक आराखडा तयार करायला हवा.

"महाराष्ट्राने 'अभिजात' दर्जाच्या भिंती नक्कीच बांधाव्यात, पण त्याआधी बोर्लीच्या भक्कम पायावर उभ्या असलेल्या ग्रामीण पोरांचा गळा घोटणे थांबवावे. पाया कच्चा ठेवून शिखरावर सोन्याचा कळस चढवू नये."- शिक्षणतज्ज्ञ, शैक्षणिक धोरण अभ्यास गट

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's Dialects Face Threat: UNESCO Report Highlights Educational Disparities

Web Summary : UNESCO's report reveals Maharashtra's neglect of local dialects in education despite Marathi's 'elite' status. While states like Odisha promote mother tongues, Maharashtra lags, widening the gap between standard Marathi and regional dialects, disadvantaging rural students in digital learning. Experts call for integrating dialects into education and curriculum.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरmarathiमराठी