शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना सांभाळणाऱ्या आजींची गायनिक टेस्ट कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:26 IST

६० वर्षांच्या वरील अंगणवाडी सेविकांना सेवा देण्यासाठी शासनाने फिटनेस टेस्ट आवश्यक केली आहे. यासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून फिटनेसचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. यासाठी त्यांची गायनिक टेस्ट करण्यात येत आहे. या टेस्टवर अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी आक्षेप घेतला असून, ६० वर्षांच्या वयात महिला आजी होतात. आई-वडिलांपेक्षाही आजी मुलांना चांगल्याप्रकारे सांभाळू शकते. मग मुलांना सांभाळणाऱ्या आजींची गायनिक टेस्ट कशाला, असा सवाल अंगणवाडी कर्मचारी संघटनेने शासनाला केला आहे.

ठळक मुद्देअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सवाल : फिटनेसच्या प्रमाणपत्रासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ६० वर्षांच्या वरील अंगणवाडी सेविकांना सेवा देण्यासाठी शासनाने फिटनेस टेस्ट आवश्यक केली आहे. यासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून फिटनेसचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. यासाठी त्यांची गायनिक टेस्ट करण्यात येत आहे. या टेस्टवर अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी आक्षेप घेतला असून, ६० वर्षांच्या वयात महिला आजी होतात. आई-वडिलांपेक्षाही आजी मुलांना चांगल्याप्रकारे सांभाळू शकते. मग मुलांना सांभाळणाऱ्या आजींची गायनिक टेस्ट कशाला, असा सवाल अंगणवाडी कर्मचारी संघटनेने शासनाला केला आहे.अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे ६५ वर्ष आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत जेव्हापासून अंगणवाड्या सुरू झाल्या, तेव्हापासून कधीही अंगणवाडी सेविकांकडून फिटनेस प्रमाणपत्र घेण्यात आले नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधन वाढीसाठी केलेल्या आंदोलनामुळे शासनाने त्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष केले. शासनाच्या या निर्णयाला परत संघटनांनी विरोध केल्यामुळे ६५ वय कायम ठेवण्यात आले. पण ६० वर्षानंतर त्यांच्याकडून फिटनेस प्रमाणपत्र मागण्यात आले. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे खेड्यापाड्यातून अंगणवाडी कर्मचारी फिटनेस प्रमाणपत्रासाठी मेयो व मेडिकल रुग्णालयात येत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या या महिलांना प्रमाणपत्रासाठी किमान ८ ते १० दिवस लागत आहे. त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट करवून घेण्यात येत आहे. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांना प्रकल्प कार्यालयाला द्यायचे आहे. फिटनेस प्रमाणपत्रासाठी वेळ लागत असल्यामुळे प्रकल्पस्तरावरील कार्यालयातील अधिकारी त्यांना सुटी घेण्यास सांगत आहे.अंगणवाडीमध्ये शून्य ते सहा वयोगटाच्या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण, पोषण आहार, गर्भवती मातांना सेवा पुरविणे, स्तनदा मातांना सेवा देण्याचे काम सेविका व मदतनीसांच्या माध्यमातून करण्यात येते. अंगणवाडीत कुठलेही अवजड उचलणे ठेवण्याचे काम नाही. मुलांचा सांभाळ करणे, हे मुख्य काम येथे होते. शासनाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची विडंबना शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केल्याची घोषणा केली, परंतु अद्यापही मानधनवाढ दिलेली नाही. अंगणवाड्यांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती बंद केली आहे. आजपर्र्यंत कधीही न झालेली फिटनेस टेस्ट ६० वर्षाच्या वरच्या कर्मचाऱ्यांना द्यावी लागत आहे. त्यासाठी त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे, वेळ आणि पैसाही खर्च होत आहे. त्यातच गायनिक टेस्ट करून शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांची विडंबना करीत आहे.चंदा मेंढे, सचिव, अंगणवाडी कर्मचारी संघटना, सीटू,

टॅग्स :nagpurनागपूर