शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो ? पावसाची पाठ, दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 11:34 IST

Nagpur News पावसाअभावी कोवळी पिके सुकण्याच्या बेतात असून, दुबार पेरणीच्या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात तर दुबार पेरणीसाठी खतही मिळणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जुलै महिना उजाडला असला तरी पाऊस मात्र रुसल्यासारखा आहे. मागील ४-५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पावसाअभावी कोवळी पिके सुकण्याच्या बेतात असून, दुबार पेरणीच्या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

जिल्ह्यात सरासरी पाऊस चांगला पडला असला तरी पिकांच्या वाढीसाठी पोषक पाऊस नाही. पावणेपाच लाख हेक्टर कृषी क्षेत्रापैकी फक्त ३,५४,६२३ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. उधारीवर पाणी घेऊन पऱ्हे जगविणे सुरू आहे.

आतापर्यंत अपेक्षित पाऊस -२१५.४ मि.मी.

प्रत्यक्ष झालेला पाऊस - २१३.६ मि.मी.

आतापर्यंत झालेली पेरणी - ३,५५,७०५.८८ हेक्टर

 कापसाचे क्षेत्र वाढले, मात्र पावसाचे संकट

जिल्ह्यात कापसाचे सरासरी पेरणी क्षेत्र २,०९,२४९ हेक्टर आहे. मागील वर्षी १,९१,९०५ हेक्टरवर असलेला कापसाचा पेरा यंदा २ लाख ३७५ हेक्टरवर पोहोचला आहे. त्या तुलनेत सोयाबीनचा पेरा मागे पडला आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १,१०,५३२ हेक्टर असले तरी यंदा पेरा फक्त ८९,४९९ हेक्टर आहे. मागील वर्षीपेक्षाही तो जवळपास ४ हजार हेक्टरने कमी आहे. धान रोवणीला पावसाची प्रतीक्षा आहे. फक्त ३ हजार हेक्टरवर रोवणी झाली आहे. कडधान्याच्या पेरणीचे क्षेत्र गतवर्षी ११७ हेक्टर होते. यंदा फक्त ८८ हेक्टर आहे.

.तर दुबार पेरणी

जिल्ह्यातील परिस्थिती धोक्यात आहे. धानासाठी शेतकऱ्यांचे पऱ्हे तयार आहेत. मात्र, रोवणीलायक पाऊसच नाही. फक्त १३ टक्के रोवण्या झाल्या आहेत. पऱ्हाटी आणि सोयाबीन चांगले उगवले असले तरी आता पावसाची गरज आहे. जमिनीच्या ओलाव्यावर पिके तग धरून आहेत. येत्या ४-५ दिवसांत पुरेसा पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते.

 

यंदा हवामान खात्याने पाऊस भरपूर सांगितला होता. आम्ही पहिल्या पावसावर विश्वास ठेवून पेरण्या केल्या असल्या तरी आता पावसाअभावी पिके सुकण्याची शक्यता वाढली आहे. लवकर पाऊस आला नाही तर पिके सुकू शकतात.

- विनोद गायकवाड, तुरकमारी, ता. हिंगणा

आधीच आम्ही शेतकरी आर्थिक संकटात आहोत. अशातच निसर्गही साथ देत नसल्याने संकट निर्माण झाले आहे. उधारीवर स्प्रिंकलर आणून पिके जगविणे सुरू आहे. एक-दोन दिवसांत पावसाची गरज आहे.

- रितेश टेंभे, खानगाव, ता. काटोल

दुबार पेरणीची स्थिती नाही. हवामान विभागाने ४-५ दिवसांत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शेतकऱ्यांनी या दिवसात आंतरमशागतीची कामे उरकून घ्यावीत. चऱ्या काढून घ्याव्यात. यामुळे ओलावा टिकून राहील व येणाऱ्या पावसात पिके सडणार नाहीत.

- मिलिंद शेंडे, अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर

...

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस