शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मिश्राविरुद्ध पोलीस कारवाई का करीत नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 20:59 IST

सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे संचालक सुनील मिश्रा यांच्याविरुद्ध तक्रार देऊनही पोलीस करावाई करीत नाही. त्यामुळे याप्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

ठळक मुद्देत्रस्त कुलगुरूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लोकमत न्यूज  नेटवर्क नागपूर : सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे संचालक सुनील मिश्रा यांच्याविरुद्ध तक्रार देऊनही पोलीस करावाई करीत नाही. त्यामुळे याप्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.कुलगुरूंच्या या पत्रप्रंपचामुळे आता गणेशपेठ पोलीस सुनील मिश्रा यांच्यावर कारवाई करतात का याकडे लक्ष लागले आहे. पोलीस मिश्रा यांच्याविरुद्ध कारवाई करीत नाही, असे कुलगुरूंनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन ही संस्था सुनील मिश्रा यांची आहे. या संस्थेमधील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विद्यापीठाने चौकशी समिती नियुक्ती केली आहे.या संस्थेची चौकशी करण्यासाठी चंद्रिकापुरे समितीच्या सदस्यांसह काही दिवसांपूर्वी गणेशपेठ परिसरातील सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनच्या कार्यालयात गेले होते. यावेळी चौकशी समितीच्या सदस्यांशी सुनील मिश्रा यांनी वाद घातला होता. या प्रकाराच्या विरोधात नागपूर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सुनील मिश्राच्या विरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात फौजदारी तक्र ार केली. पोलिसांनी मात्र सुनील मिश्राच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे लागले असे कुलगुरूंनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठCrimeगुन्हा