शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विधी विद्यापीठांना निधी वाटप करताना भेदभाव का केला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 22:48 IST

राज्यातील तीन महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठांना कमीजास्त निधी वाटप करणे राज्य सरकारवर शेकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे प्रकरण गंभीरतेने घेऊन निधी वाटपात भेदभाव का केला, अशी विचारणा सरकारला केली आहे तसेच, यावर येत्या सोमवारपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाची सरकारला विचारणा : सोमवारपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील तीन महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठांना कमीजास्त निधी वाटप करणे राज्य सरकारवर शेकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे प्रकरण गंभीरतेने घेऊन निधी वाटपात भेदभाव का केला, अशी विचारणा सरकारला केली आहे तसेच, यावर येत्या सोमवारपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला आहे.संबंधित प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या प्रतिज्ञापत्राकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, राज्य सरकारने २०१६-१७ या आर्थिक वर्षात मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला ९ कोटी ५९ लाख ९८ हजार ४४६ रुपये तर, नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला ४ कोटी ५६ लाख ३५ हजार ५४२ रुपये दिले. तसेच, २०१७-१८ या आर्थिक वर्षात मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला १८ कोटी २९ लाख ८३ हजार २५९ रुपये, नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला ४ कोटी ४६ हजार रुपये तर, औरंगाबाद येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला २ कोटी ७१ लाख ६५ हजार रुपये वाटप केले. निधी वितरणातील हा भेदभाव न्यायालयाला खटकला. त्यामुळे सरकारला यावर स्पष्टीकरण मागण्यात आले.त्या आदेशाचे पालननागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला शैक्षणिक व प्रशासकीय खर्चासाठी ३ कोटी रुपये देण्यात यावे, असा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०१८ रोजी विद्यापीठाला दीड कोटी रुपये देण्यात आले. गेल्या ७ मार्च रोजी न्यायालयाने उर्वरित रक्कम एक आठवड्यात देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, सरकारने विद्यापीठाला १३ मार्च रोजी ८० लाख ४६ हजार तर, १५ मार्च रोजी ७० लाख रुपये देऊन न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले.बार असोसिएशनची याचिकायासंदर्भात हायकोर्ट बार असोसिएशनने २०१६ मध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. दरम्यान, न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे हे विद्यापीठ २०१६-२०१७ सत्रापासून कार्यान्वित झाले. विद्यापीठ कॅम्पसकरिता वारंगा येथे ७५ एकर जमीन देण्यात आली. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह मिळाले. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. असोसिएशनतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक कामकाज पहात आहेत.

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर