शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

संमेलनासाठी दिल्लीने तेव्हा का नकार दिला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 06:22 IST

कौतिकराव ठाले-पाटील यांचा सवाल

प्रवीण खापरे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावरून नाशिक विरुद्ध दिल्ली असा सामना रंगला आहे. दिल्लीसाठी आग्रह धरणाऱ्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी टोला लगावला आहे. दिल्लीला दिल्लीकर नाही तर पुणेकर संमेलन मागत आहेत, अशी टीका ठाले-पाटील यांनी केली आहे.   

९४ व्या साहित्य संमेलनाच्या नियोजित स्थळाबाबत संवैधानिक प्रक्रिया पार न पाडता, हेकेखोरपणा दाखविला जात असल्याचा आरोप साहित्य वर्तुळातून महामंडळाच्या अध्यक्षांवर लावला जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांना उत्तर दिले आहे. दोन वर्षांपूर्वी दिल्लीला संमेलन देण्यात आले होते. तेव्हा दिल्लीकरांनी पत्र पाठवून महामंडळाकडे आयोजनासंदर्भात नकार दर्शवला होता. जेव्हा दिले तेव्हा नकार दर्शवला आणि आता इतका अट्टहास का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीत संमेलनासाठी अडून बसलेले पुण्याचे संजय नहार हे चांगले मित्र आहेत. मात्र, दिल्लीकडून पुढाकार नसताना पुण्याच्या माणसाने हा आग्रह का धरावा, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

‘हे मोदी, गडकरींना खूश करण्यासाठीच!’दिल्लीचा आग्रह धरून बसणारे हे मोदी व गडकरी यांच्या जवळचे आहेत. त्यांना खूश करण्यासाठीच हा सगळा कट असल्याचा गंभीर आरोपही ठाले-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. 

कोरोनापासून कोण संरक्षण करणार?दिल्लीत कोरोनाचा प्रकोप संपता संपेना, अशी स्थिती आहे. त्यामुळे दिल्लीत संमेलनासाठी परवानगी कशी मिळेल, हा प्रश्न आहे. त्यातच संमेलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठी सारस्वत, साहित्य रसिक प्रवास करून येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेची खात्री दिल्ली देईल का?- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन