शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ‘डबलडेकर’च्या बांधकामाला विलंब का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 11:00 IST

छत्रपती चौकातील डबलडेकर पुलाच्या बांधकामाची गती संथ आहे. पुलावर एनएचएआय लेव्हलचे कार्य अजूनही पूर्ण झालेले नाही. उड्डाण पूल तोडला तेव्हा अडीच वर्षांत काम पूर्ण होण्याचे संकेत दिले होते. पण मर्यादा संपून आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे.

ठळक मुद्देमनीषनगर आरयूबी बांधकामावर परिणामवाढत्या कोंडीमुळे वाहतुकीला त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती चौकातील डबलडेकर पुलाच्या बांधकामाची गती संथ आहे. पुलावर एनएचएआय लेव्हलचे कार्य अजूनही पूर्ण झालेले नाही. उड्डाण पूल तोडला तेव्हा अडीच वर्षांत काम पूर्ण होण्याचे संकेत दिले होते. पण मर्यादा संपून आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डबलडेकरवर एनएचएआय लेव्हल कामाची गती अजूनही वाढलेली नाही. चार पदरी पुलाच्या मध्यभागातून मनीषनगरकडे जाणाऱ्या सहा पदरी जोडरस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे आरयूबीचे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही.आता विधानसभा निवडणुका अडीच महिन्यांवर असल्यामुळे मनीषनगर आरओबी व आरयूबीला दोन महिन्यात पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. ३.४१ कि.मी. लांब छत्रपती चौक डबलडेकर ८९० कोटी रुपये गुंतवणुकीतून तयार करण्यात येत आहे.पुलाच्या गतीसंदर्भात महामेट्रोचे कार्यकारी संचालक देवेंद्र रामटेककर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी केवळ पुलासंदर्भात आणि काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले. पण नवीन पुलाच्या बांधकामाच्या सुरुवातीला हे काम जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची घोषणा केली होती.बांधकामाला उशीर होत असल्यामुळे या भागातील रहिवासी अणि वर्धा रोडवरून ये-जा करणाºया वाहनचालकांना बराच वेळ रस्त्यावरील कोंडीत उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांना असुविधांचा सामना करावा लागतो. बांधकामासाठी नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे बांधकामाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्याचा त्यांचा हक्क आहे. महामेट्रो ५डी बीम तंत्रज्ञानासंदर्भात अनेक दावे करीत आहे. या तंत्रज्ञानामुळे बांधकाम वेळेत पूर्ण होत असल्याचे महामेट्रोचे मत असतानाच या बांधकामाला उशीर का होत आहे, हा गंभीर प्रश्न आहे.आठ दिवसात तोडला जुना उड्डाण पूलजुना छत्रपती उड्डाण पूल १५ नोव्हेंबर २०१६ पासून तोडण्यास प्रारंभ केला होता आणि आठ दिवसात जमीनदोस्त केला होता. त्याकरिता आधुनिक आणि जड मशीनचा उपयोग केला होता. त्यावेळी लोकांना अनेक महिने लांब फेºया मारून ये-जा करावी लागत होती. पूल तुटताना धूळ आसपासच्या परिसरात उडत होती. जुना पूल १९९८ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला होता. ४०० मीटर लांबीच्या पुलाचे वय ५० वर्ष होते. पण मेट्रोच्या कामासाठी पूल १८ वर्षांतच तोडावा लागला होता.

टॅग्स :Metroमेट्रो