शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ‘डबलडेकर’च्या बांधकामाला विलंब का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 11:00 IST

छत्रपती चौकातील डबलडेकर पुलाच्या बांधकामाची गती संथ आहे. पुलावर एनएचएआय लेव्हलचे कार्य अजूनही पूर्ण झालेले नाही. उड्डाण पूल तोडला तेव्हा अडीच वर्षांत काम पूर्ण होण्याचे संकेत दिले होते. पण मर्यादा संपून आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे.

ठळक मुद्देमनीषनगर आरयूबी बांधकामावर परिणामवाढत्या कोंडीमुळे वाहतुकीला त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती चौकातील डबलडेकर पुलाच्या बांधकामाची गती संथ आहे. पुलावर एनएचएआय लेव्हलचे कार्य अजूनही पूर्ण झालेले नाही. उड्डाण पूल तोडला तेव्हा अडीच वर्षांत काम पूर्ण होण्याचे संकेत दिले होते. पण मर्यादा संपून आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डबलडेकरवर एनएचएआय लेव्हल कामाची गती अजूनही वाढलेली नाही. चार पदरी पुलाच्या मध्यभागातून मनीषनगरकडे जाणाऱ्या सहा पदरी जोडरस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे आरयूबीचे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही.आता विधानसभा निवडणुका अडीच महिन्यांवर असल्यामुळे मनीषनगर आरओबी व आरयूबीला दोन महिन्यात पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. ३.४१ कि.मी. लांब छत्रपती चौक डबलडेकर ८९० कोटी रुपये गुंतवणुकीतून तयार करण्यात येत आहे.पुलाच्या गतीसंदर्भात महामेट्रोचे कार्यकारी संचालक देवेंद्र रामटेककर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी केवळ पुलासंदर्भात आणि काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले. पण नवीन पुलाच्या बांधकामाच्या सुरुवातीला हे काम जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची घोषणा केली होती.बांधकामाला उशीर होत असल्यामुळे या भागातील रहिवासी अणि वर्धा रोडवरून ये-जा करणाºया वाहनचालकांना बराच वेळ रस्त्यावरील कोंडीत उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांना असुविधांचा सामना करावा लागतो. बांधकामासाठी नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे बांधकामाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्याचा त्यांचा हक्क आहे. महामेट्रो ५डी बीम तंत्रज्ञानासंदर्भात अनेक दावे करीत आहे. या तंत्रज्ञानामुळे बांधकाम वेळेत पूर्ण होत असल्याचे महामेट्रोचे मत असतानाच या बांधकामाला उशीर का होत आहे, हा गंभीर प्रश्न आहे.आठ दिवसात तोडला जुना उड्डाण पूलजुना छत्रपती उड्डाण पूल १५ नोव्हेंबर २०१६ पासून तोडण्यास प्रारंभ केला होता आणि आठ दिवसात जमीनदोस्त केला होता. त्याकरिता आधुनिक आणि जड मशीनचा उपयोग केला होता. त्यावेळी लोकांना अनेक महिने लांब फेºया मारून ये-जा करावी लागत होती. पूल तुटताना धूळ आसपासच्या परिसरात उडत होती. जुना पूल १९९८ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला होता. ४०० मीटर लांबीच्या पुलाचे वय ५० वर्ष होते. पण मेट्रोच्या कामासाठी पूल १८ वर्षांतच तोडावा लागला होता.

टॅग्स :Metroमेट्रो