शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांमुळे कंपनी एक महिना बंद कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:16 IST

औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यास कंपनी दोन वा तीन दिवस बंद ठेवून पुन्हा सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. पण तसे होताना दिसत नाही. कंपनी पूर्णपणे बंद करणार नाही, अशी ग्वाहीही जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांना भेट देऊन केली होती. त्यानंतरही अधिकारी कामगारांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करीत आहेत. हे क्वारंटाईन जवळपास २८ दिवसांचे असल्याने कंपनीत कामावर कुणीही कामगार राहत नाहीत. त्यामुळे कंपनी पूर्णपणे बंद पडत आहे.

ठळक मुद्देउद्योजकांना त्रास : कामगार देतात ईएसआयसीकडे सुटीचा अर्ज

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यास कंपनी दोन वा तीन दिवस बंद ठेवून पुन्हा सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. पण तसे होताना दिसत नाही. कंपनी पूर्णपणे बंद करणार नाही, अशी ग्वाहीही जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांना भेट देऊन केली होती. त्यानंतरही अधिकारी कामगारांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करीत आहेत. हे क्वारंटाईन जवळपास २८ दिवसांचे असल्याने कंपनीत कामावर कुणीही कामगार राहत नाहीत. त्यामुळे कंपनी पूर्णपणे बंद पडत आहे. ही बाब हिंगणा एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत कोरोनाबाधितामुळे ड्युरवेल्ड आणि हसीफ फार्मा या दोन कंपन्यांमध्ये घडली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी हिंगणा एमआयडीसीच्या पदाधिकाऱ्यांसोबत या संदर्भात संवाद साधला होता. कंपनी पूर्णपणे बंद होणार नाही, असे आश्वासन दिले होते. पण कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास १४ दिवस इन्स्टिट्युशनल आणि १४ दिवस होम क्वारंटाईन असे एकूण कामगारांना २८ दिवस क्वारंटाईन व्हावे लागते. त्यामुळे कंपन्यांमधील काम पूर्णपणे ठप्प पडत असल्याचा उद्योजकांचा सूर आहे.कामगार ईएसआयसीमध्ये करतात सुटीचे अर्जएखाद्या कंपनीत कामगार कोरोनाबाधित निघाल्यास कामगार क्वारंटाईनसह ईएसआयसीमध्ये सुटीचे अर्ज करतात. शिवाय क्वारंटाईनच्या नावाखाली कामावर येत नाहीत. त्यामुळे कंपनी बंद करावी लागते. ही वेळ कंपनीवर येऊ नये.चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, हिंगणा एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन.अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावाकोरोनाबाधितामुळे एखादी कंपनी बंद पडू नये याकरिता अधिकाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा. रुग्णावर उपचार करून संबंधित कामगारांची तपासणी करून कामावर येण्यास सांगावे. शिवाय संपूर्ण परिसर सॅनिटाईझ्ड करून दोन ते तीन दिवसात कंपनी सुरू करावी.प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशन.कंपनीच्या विकासात कोरोनाची बाधानागपूर जिल्ह्यात सध्या २५५० उद्योग सुरू असल्याची नोंद आहे. या उद्योगांमध्ये ५५ हजारांच्या आसपास कामगार काम करीत असून ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कंपनीत विविध वस्त्यांमधून कामगार येत असल्याने मालकाने त्यांची नियमानुसार तपासणी करणे आवश्यक आहे. जर एखाद्या कंपनीत कोरोना रुग्ण निघाल्यास कंपनी दोन ते तीन दिवसाऐवजी अनेक दिवसांसाठी बंद होते. प्रशासनाने संपूर्ण परिसर सॅनिटाईज्ड करून कंपनी लवकरात लवकर कशी सुरू होईल, यावर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे काही उद्योजकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सध्या कमी कामगार संख्येत उत्पादन सुरू असून कंपन्याही सरासरी ६० ते ७० टक्के क्षमतेने सुरू आहेत.उत्पादन होईलच, प्रारंभी जीव महत्त्वाचाहिंगणा येथील कारखान्यात कोरोनाचे जास्त रुग्ण मिळाल्याने कंपनी सुरू होण्यास उशीर झाला. पण एखाद्या कंपनीत कोरोना रुग्ण आढळून येत असेल तर असोसिएशनच्या अध्यक्षांसोबत संपर्क साधून जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक आहे. सॅनिटायझेशन, कामगारांच्या सुट्यांमध्ये भ्रष्टाचार होऊ नये. एका युनिटसाठी पूर्ण कंपनी बंद होऊ नये. सर्वांनी हेल्पलाईन क्रमांकाच्या संपर्कात राहावे आणि संपूर्ण नियमांचे पालन करावे.सुरेश राठी, अध्यक्ष, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMIDCएमआयडीसी